शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

गळतीमुळे कांबरे तलाव पडला कोरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 03:01 IST

गळतीमुळे भोर तालुक्यातील कांबरे येथील गिºहे वस्तीजवळील पाझर तलाव कोरडा पडला आहे. मागील काही महिन्यांपासून लागलेल्या गळतीमुळे तलावात एकही थेंब पाणी शिल्लक राहिले नाही. त्यामुळे तलावाच्या ओलिताखाली शेती करणाºया शेतकºयांची अडचण झाली आहे. पिकाला पाणी द्यायचे कोठून? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नसरापूर - गळतीमुळे भोर तालुक्यातील कांबरे येथील गिºहे वस्तीजवळील पाझर तलाव कोरडा पडला आहे. मागील काही महिन्यांपासून लागलेल्या गळतीमुळे तलावात एकही थेंब पाणी शिल्लक राहिले नाही. त्यामुळे तलावाच्या ओलिताखाली शेती करणाºया शेतकºयांची अडचण झाली आहे. पिकाला पाणी द्यायचे कोठून? असा प्रश्न निर्माण झाला आहे.शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न आ वासून उभा राहिला आहे. त्याकरिता कांबरे येथील ग्रामस्थांनी हा बंधारा ताबडतोब दुरुस्त करून या बंधाºयातून होणारी पाण्याची गळती थांबवावी, अशी मागणी केली आहे. या मागणीकरिता अनेक दिवसांपासून सरकारदरबारी खेटे घालूनही शेतकºयांच्या पदरी काहीही पडत नाही. शासनाकडून कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना केली गेलेली नाही. सन २००२मधील दुष्काळात या टंचाईग्रस्त कांबरे (भोर)येथील गिºहेवस्तीजवळील पाझर तलाव जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बांधण्यात आला होता. या बंधाºयात आता पूर्ण गळती झाल्याने संपूर्ण तलावात खडखडाट आहे. तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.शेतकºयांसाठी जीवनदायी असलेला पाझर तलाव कोरडा पडला असल्याने दुष्काळाची छाया कांबरे गावावर पसरली आहे. येथील शेतकºयांच्या या पाझर तलावासाठी मोठ्या प्रमाणात जमीन संपादन होऊनही कांबरेकरांच्या पदरी निराशाच पडली आली आहे. तलावाच्या पाण्यावरच शेतकºयांची पिके, जनावरांचा पाणीप्रश्न अवलंबून आहे.पाणीगळतीमुळे शेतकरीवर्ग हतबल झाला आहे. या वेळी कृषी उत्पन्न समितीचे माजी संचालक उत्तम कोंढाळकर, उपसरपंच विशाल कोंढाळकर, बाबासो गिºहे, रामदास गिºहे, सुभान यादव, रघुनाथ यादव, तानाजी पवार, दादासो कोंढाळकर, श्रीरंग कोंढाळकर, मारुती नाईलकर, बाळासाहेब सुतार, दशरथ गिºहे पाझर तलाव गळती थांबविण्याची मागणी करीत आहेत. कांबरे येथील पाझर तलावाची गळती लवकरात लवकर न काढल्यास ग्रामस्थांनी आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.या तलावाची पाणी साठवण क्षमता मोठी असली, तरी पावसाळ्यानंतर मात्र पाण्याची आवश्यकता असते त्याच वेळी हा पाझर तलाव कोरडा पडला आहे. पाझर तलावाकरिता या गावातील प्रत्येक शेतकºयाने आपली जमीन देऊ केली आहे.शेतकºयांनी त्यांनी जमीन जरी बंधाºयाकरिता दिली असली तरी मात्र या बंधाºयाचा पिकांसाठी काहीही उपयोग झालेला नाही. स्थानिकांनी जिल्हा परिषद व आमदारांकडे वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे.कांबरे येथील शेतजमीन डोंगरात व डोंगरकिनारी असल्याने हलकी व खडकाळ प्रकारातील आहे. डोंगराशेजारी वसलेल्या वाड्यावस्ती, शेती व पिण्याचा पाण्याचा प्रश्न या तलावामुळे सुटू शकणार आहे. हा पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यास या भागातील शेतकºयांच्या जमिनीला या तलावातील पाण्याचा फार मोठा फायदा होईल.जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सन २००९मध्ये गळती दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. तरीही या तलावाची गळती बंद होऊ शकली नाही. दोन वर्षांपासून पाझर तलावाची तळभागातूनच गळती झाल्याने सध्या तलाव कोरडा पडला आहे.कांबरे येथील पाझर तलाव हा राज्य सरकारच्या स्थानिकस्तर योजनेतून बांधला आहे. त्याची दुरुस्ती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झाली होती. या मूळच्या कामातील दोष असेल तर तरीही दुरुस्तीनंतर गळती थांबत नाही. या दुरुस्तीला पाच वर्षे पूर्ण झाली असतील तरच पुन्हा दुरुस्तीचे नियोजन करता येईल. अद्याप ग्रामस्थांची आमच्याकडे मागणी आलेली नाही. त्यांनी मागणी केल्यास त्याचा विचार केला जाईल.- वाय. आर. हसनाळे,अभियंता, छोटे पाटबंधारे विभाग

टॅग्स :PuneपुणेDamधरण