शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

कमी सौर वादळांमुळे मान्सूनवर परिणाम शक्य : किरणकुमार जोहरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 12:14 IST

२०१८ या वर्षाप्रमाणेच २०१९ आणि २०२० या वर्षात कमी सौर धुमारे आणि कमी चुंबकीय वादळे होण्याची माहिती उपलब्ध होत आहे़

ठळक मुद्दे मान्सूनचा अभ्यास करताना व अंदाज वर्तवितांना सूर्यावरील घडामोडींचा अभ्यास अतिशय महत्वाचासौर वादळांचा विचार केला तर भारतीय नैऋत्य मान्सून हा कमजोर होण्याची दाट शक्यता सौर आवर्तनाचे २२ आणि २३ क्रमांकांच्या आवर्तनाच्यावेळी अनुक्रमे १९८६ आणि २००९ मध्ये अशाच प्रकारे दुष्काळ

पुणे : सूर्यावरील सौर धुमारे आणि चुंबकीय वादळे यांचा परिणाम भारतीय मान्सूनवर होत असल्याचे गेल्या काही वर्षांच्या अभ्यासातून दिसून आले आहे़. २०१८ या वर्षाप्रमाणेच २०१९ आणि २०२० या वर्षात कमी सौर धुमारे आणि कमी चुंबकीय वादळे होण्याची माहिती उपलब्ध होत आहे़. त्यामुळे त्याचा विपरित परिणाम पुढील दोन वर्षे मॉन्सूनवर होण्याची शक्यता असल्याचा अंदाज मॉन्सूनचे अभ्यासक किरणकुमार जोहरे यांनी व्यक्त केला आहे़. याबाबत किरणकुमार जोहरे म्हणाले, सूर्याकडून आलेली ऊर्जा केवळ उष्णतेच्या स्वरूपातच नव्हे तर विद्युत चुंबकीय क्षेत्रात देखील बदल घडवून आणते. पृथ्वीचे चुंबकीय आवरण वातावरण संतुलनाचे कार्य करते. जितके सौर डाग जास्त, तितकी सौर वादळे जास्त व परिणामी सूर्याकडून पृथ्वीकडे येणारी ऊर्जा जास्त असे ढोबळमानाने म्हणता येईल. मान्सूनचा अभ्यास करताना व अंदाज वर्तवितांना सूर्यावरील घडामोडींचा अभ्यास अतिशय महत्वाचा आहे. २०१८ वर्षाप्रमाणे वर्ष २०१९ आणि २०२० हे २४ क्रमांकाच्या आवर्तनाचे (सायकल) व किमान सौर (सोलर मिनिमा) डागांच्या वादळांचे वर्ष आहे. बेल्जियमच्या सोलार इन्फ्लुअन्सेस डाटा अ‍ॅनालिसीस सेंटर, (सीआयडीसी) या संस्थेच्या डाटाचे विश्लेषण करताना अनेक गोष्टी समोर आल्या आहेत़. यामुळे कमी सौर वादळाचे धुमारे (फ्लेम) निघाल्याची माहिती मिळते. नजीकच्या काळात हे कमी सौर धुमारे व कमी चुंबकिय वादळे होण्याची आहे. याचा थेट परिणाम मॉन्सूनवर होतो असे अभ्यासात आढळले आहे. जर सौर वादळांचा विचार केला तर भारतीय नैऋत्य मान्सून हा कमजोर होण्याची दाट शक्यता दिसून येते. कारण भारतीय भूभाग आणि या भूभागाजवळील सागराच्या पृष्ठभागाचे तापमान यातील आवश्यक फरक कमी झाल्याने मान्सून उशिरा आणि कमजोर होऊ शकेल, जो मध्य भारतात दुष्काळी परिस्थिती देखील निर्माण करू शकतो. २०१९ आणि २०२० वर्षी काळजी घेण्याची गरज आहे. यापूर्वी सौर आवर्तनाचे २२ आणि २३ क्रमांकांच्या आवर्तनाच्यावेळी अनुक्रमे १९८६ आणि २००९ मध्ये अशाच प्रकारे दुष्काळ पडला होता़. भारतीय मॉन्सूनचा अंदाज व्यक्त करताना भारतीय हवामान विभाग सूर्यावरील घडामोडीचा विचार करीत नाहीत़. त्यामुळे त्यांचे अंदाज चुकण्याची अधिक शक्यता असते़ २०१८ मध्ये या कारणामुळेच त्यांचा अंदाज चुकल्याचे जोहरे यांनी सांगितले़.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र