शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
4
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
5
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
6
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
7
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
8
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
9
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
10
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
11
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
12
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
13
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
14
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
15
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
16
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
17
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
18
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
19
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
20
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...

कमी सौर वादळांमुळे मान्सूनवर परिणाम शक्य : किरणकुमार जोहरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 12:14 IST

२०१८ या वर्षाप्रमाणेच २०१९ आणि २०२० या वर्षात कमी सौर धुमारे आणि कमी चुंबकीय वादळे होण्याची माहिती उपलब्ध होत आहे़

ठळक मुद्दे मान्सूनचा अभ्यास करताना व अंदाज वर्तवितांना सूर्यावरील घडामोडींचा अभ्यास अतिशय महत्वाचासौर वादळांचा विचार केला तर भारतीय नैऋत्य मान्सून हा कमजोर होण्याची दाट शक्यता सौर आवर्तनाचे २२ आणि २३ क्रमांकांच्या आवर्तनाच्यावेळी अनुक्रमे १९८६ आणि २००९ मध्ये अशाच प्रकारे दुष्काळ

पुणे : सूर्यावरील सौर धुमारे आणि चुंबकीय वादळे यांचा परिणाम भारतीय मान्सूनवर होत असल्याचे गेल्या काही वर्षांच्या अभ्यासातून दिसून आले आहे़. २०१८ या वर्षाप्रमाणेच २०१९ आणि २०२० या वर्षात कमी सौर धुमारे आणि कमी चुंबकीय वादळे होण्याची माहिती उपलब्ध होत आहे़. त्यामुळे त्याचा विपरित परिणाम पुढील दोन वर्षे मॉन्सूनवर होण्याची शक्यता असल्याचा अंदाज मॉन्सूनचे अभ्यासक किरणकुमार जोहरे यांनी व्यक्त केला आहे़. याबाबत किरणकुमार जोहरे म्हणाले, सूर्याकडून आलेली ऊर्जा केवळ उष्णतेच्या स्वरूपातच नव्हे तर विद्युत चुंबकीय क्षेत्रात देखील बदल घडवून आणते. पृथ्वीचे चुंबकीय आवरण वातावरण संतुलनाचे कार्य करते. जितके सौर डाग जास्त, तितकी सौर वादळे जास्त व परिणामी सूर्याकडून पृथ्वीकडे येणारी ऊर्जा जास्त असे ढोबळमानाने म्हणता येईल. मान्सूनचा अभ्यास करताना व अंदाज वर्तवितांना सूर्यावरील घडामोडींचा अभ्यास अतिशय महत्वाचा आहे. २०१८ वर्षाप्रमाणे वर्ष २०१९ आणि २०२० हे २४ क्रमांकाच्या आवर्तनाचे (सायकल) व किमान सौर (सोलर मिनिमा) डागांच्या वादळांचे वर्ष आहे. बेल्जियमच्या सोलार इन्फ्लुअन्सेस डाटा अ‍ॅनालिसीस सेंटर, (सीआयडीसी) या संस्थेच्या डाटाचे विश्लेषण करताना अनेक गोष्टी समोर आल्या आहेत़. यामुळे कमी सौर वादळाचे धुमारे (फ्लेम) निघाल्याची माहिती मिळते. नजीकच्या काळात हे कमी सौर धुमारे व कमी चुंबकिय वादळे होण्याची आहे. याचा थेट परिणाम मॉन्सूनवर होतो असे अभ्यासात आढळले आहे. जर सौर वादळांचा विचार केला तर भारतीय नैऋत्य मान्सून हा कमजोर होण्याची दाट शक्यता दिसून येते. कारण भारतीय भूभाग आणि या भूभागाजवळील सागराच्या पृष्ठभागाचे तापमान यातील आवश्यक फरक कमी झाल्याने मान्सून उशिरा आणि कमजोर होऊ शकेल, जो मध्य भारतात दुष्काळी परिस्थिती देखील निर्माण करू शकतो. २०१९ आणि २०२० वर्षी काळजी घेण्याची गरज आहे. यापूर्वी सौर आवर्तनाचे २२ आणि २३ क्रमांकांच्या आवर्तनाच्यावेळी अनुक्रमे १९८६ आणि २००९ मध्ये अशाच प्रकारे दुष्काळ पडला होता़. भारतीय मॉन्सूनचा अंदाज व्यक्त करताना भारतीय हवामान विभाग सूर्यावरील घडामोडीचा विचार करीत नाहीत़. त्यामुळे त्यांचे अंदाज चुकण्याची अधिक शक्यता असते़ २०१८ मध्ये या कारणामुळेच त्यांचा अंदाज चुकल्याचे जोहरे यांनी सांगितले़.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र