शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

कमी सौर वादळांमुळे मान्सूनवर परिणाम शक्य : किरणकुमार जोहरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 12:14 IST

२०१८ या वर्षाप्रमाणेच २०१९ आणि २०२० या वर्षात कमी सौर धुमारे आणि कमी चुंबकीय वादळे होण्याची माहिती उपलब्ध होत आहे़

ठळक मुद्दे मान्सूनचा अभ्यास करताना व अंदाज वर्तवितांना सूर्यावरील घडामोडींचा अभ्यास अतिशय महत्वाचासौर वादळांचा विचार केला तर भारतीय नैऋत्य मान्सून हा कमजोर होण्याची दाट शक्यता सौर आवर्तनाचे २२ आणि २३ क्रमांकांच्या आवर्तनाच्यावेळी अनुक्रमे १९८६ आणि २००९ मध्ये अशाच प्रकारे दुष्काळ

पुणे : सूर्यावरील सौर धुमारे आणि चुंबकीय वादळे यांचा परिणाम भारतीय मान्सूनवर होत असल्याचे गेल्या काही वर्षांच्या अभ्यासातून दिसून आले आहे़. २०१८ या वर्षाप्रमाणेच २०१९ आणि २०२० या वर्षात कमी सौर धुमारे आणि कमी चुंबकीय वादळे होण्याची माहिती उपलब्ध होत आहे़. त्यामुळे त्याचा विपरित परिणाम पुढील दोन वर्षे मॉन्सूनवर होण्याची शक्यता असल्याचा अंदाज मॉन्सूनचे अभ्यासक किरणकुमार जोहरे यांनी व्यक्त केला आहे़. याबाबत किरणकुमार जोहरे म्हणाले, सूर्याकडून आलेली ऊर्जा केवळ उष्णतेच्या स्वरूपातच नव्हे तर विद्युत चुंबकीय क्षेत्रात देखील बदल घडवून आणते. पृथ्वीचे चुंबकीय आवरण वातावरण संतुलनाचे कार्य करते. जितके सौर डाग जास्त, तितकी सौर वादळे जास्त व परिणामी सूर्याकडून पृथ्वीकडे येणारी ऊर्जा जास्त असे ढोबळमानाने म्हणता येईल. मान्सूनचा अभ्यास करताना व अंदाज वर्तवितांना सूर्यावरील घडामोडींचा अभ्यास अतिशय महत्वाचा आहे. २०१८ वर्षाप्रमाणे वर्ष २०१९ आणि २०२० हे २४ क्रमांकाच्या आवर्तनाचे (सायकल) व किमान सौर (सोलर मिनिमा) डागांच्या वादळांचे वर्ष आहे. बेल्जियमच्या सोलार इन्फ्लुअन्सेस डाटा अ‍ॅनालिसीस सेंटर, (सीआयडीसी) या संस्थेच्या डाटाचे विश्लेषण करताना अनेक गोष्टी समोर आल्या आहेत़. यामुळे कमी सौर वादळाचे धुमारे (फ्लेम) निघाल्याची माहिती मिळते. नजीकच्या काळात हे कमी सौर धुमारे व कमी चुंबकिय वादळे होण्याची आहे. याचा थेट परिणाम मॉन्सूनवर होतो असे अभ्यासात आढळले आहे. जर सौर वादळांचा विचार केला तर भारतीय नैऋत्य मान्सून हा कमजोर होण्याची दाट शक्यता दिसून येते. कारण भारतीय भूभाग आणि या भूभागाजवळील सागराच्या पृष्ठभागाचे तापमान यातील आवश्यक फरक कमी झाल्याने मान्सून उशिरा आणि कमजोर होऊ शकेल, जो मध्य भारतात दुष्काळी परिस्थिती देखील निर्माण करू शकतो. २०१९ आणि २०२० वर्षी काळजी घेण्याची गरज आहे. यापूर्वी सौर आवर्तनाचे २२ आणि २३ क्रमांकांच्या आवर्तनाच्यावेळी अनुक्रमे १९८६ आणि २००९ मध्ये अशाच प्रकारे दुष्काळ पडला होता़. भारतीय मॉन्सूनचा अंदाज व्यक्त करताना भारतीय हवामान विभाग सूर्यावरील घडामोडीचा विचार करीत नाहीत़. त्यामुळे त्यांचे अंदाज चुकण्याची अधिक शक्यता असते़ २०१८ मध्ये या कारणामुळेच त्यांचा अंदाज चुकल्याचे जोहरे यांनी सांगितले़.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र