शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कमळ, केवडा, पत्रींची किंमत कडाडली; कोरोनाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 20:36 IST

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मंडई परिसरात नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडाली होती दरवर्षीच्या तुलनेत १०-२० टक्के मालाचीच आवक

ठळक मुद्देफुले, पत्री, दुर्वा असे साहित्य घेऊन अनेक शेतकरी, फुलविक्रेते खेडेगावातून येतात पुण्यात दरवर्षीच्या तुलनेत १०-२० टक्के मालाचीच आवक

 पुणे : कोरोनाच्या संकटामुळे यंदाच्या गणेशोत्सवाला महागाईचा मोठा फटका बसला आहे. पूजेसाठी लागणारी फुले, पत्री, दुर्वा असे सर्वच साहित्य दर वर्षीपेक्षा दुपटीने महाग झाले आहे. गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला कमळाचे एक फूल ५० रुपये, पत्री आणि दुर्वांची जुडी प्रत्येकी ५० रुपये, झेंडू, शेवंतीची फुले ८० रुपये पाव, केवडा पान ४० रुपये या दराने पूजेच्या साहित्याची विक्री झाली. लॉकडाऊनमुळे दर वर्षीच्या तुलनेत १०-२० टक्के मालाचीच आवक झाल्याचे फुलविक्रेत्यांनी सांगितले.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मंडई परिसरात नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडाली होती. केळीचे खुंट, पत्री, दुर्वा, झेंडूची फुले, शेवंतीची फुले, कमळ, केवडा या साहित्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली. यंदाचे पूजेच्या साहित्याचे दर पाहून अनेकांनी आश्चर्य तर काही जणांनी नाराजीही व्यक्त केली. मर्यादित साहित्य आणि चढा दर असे चित्र मंडई परिसरात पहायला मिळाले. दर वर्षी पत्री, दुर्वा १०-२० रुपयांना मिळतात, तर कमळ २०-२५ रुपयांपर्यंत मिळते. यंदाच्या किमती मात्र शब्दश: गगनाला भिडल्या आहेत.

फुलविक्रेत्या पूजा शिर्के म्हणाल्या, ‘गेले पाच महिने लॉकडाऊन असल्याने, लोक घराबाहेर पडत नसल्याने आणि मंदिरे बंद असल्याने व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने व्यवसायात थोडी तेजी आली आहे. मात्र, सर्वच साहित्य यंदा आम्हीही मार्केट यार्डमधून चढ्या दराने खरेदी केले. फुलांचे दर ऐकून ग्राहक राग व्यक्त करत आहेत. मात्र, आमचाही इलाज नाही. गेल्या ४० वर्षांपासून आम्ही या व्यवसायात आहोत. एवढी महागाई आजवर कधीच पाहिली नव्हती.’----------------------फुले, पत्री, दुर्वा असे साहित्य घेऊन अनेक शेतकरी, फुलविक्रेते खेडेगावातून पुण्यात येतात. पत्री, दुर्वा असे साहित्य पानशेत, खडकवासला, मुळशी अशा जवळच्या ठिकाणांहून येते. कमळांची आवक मुंबईतून होते. केवडा लातूर, उस्मानाबाद, पंढरपूर, उदगीर अशा ठिकाणांहून येतो. लॉकडाऊनमुळे शेतकरी पुण्यार यायला घाबरत आहेत, त्यामुळे साहित्याची १०-२० टक्केच आवक झाली आहे. यंदा शेतकऱ्यांचे चार-पाच महिन्यांत मोठे नुकसान झाले आहे. अनेकांची लागवड वाया गेली आहे, तर अनेकांनी व्यवसाय होणार नाही, या भीतीने लागवडच केलेली नाही. त्यामुळे यंदा महागाईने उच्चांक गाठला आहे.- सुहास सरपाले, सरपाले फ्लॉवर मर्चंट

टॅग्स :PuneपुणेGanesh Mahotsavगणेशोत्सवcorona virusकोरोना वायरस बातम्याFarmerशेतकरीbusinessव्यवसाय