शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कमळ, केवडा, पत्रींची किंमत कडाडली; कोरोनाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 20:36 IST

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मंडई परिसरात नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडाली होती दरवर्षीच्या तुलनेत १०-२० टक्के मालाचीच आवक

ठळक मुद्देफुले, पत्री, दुर्वा असे साहित्य घेऊन अनेक शेतकरी, फुलविक्रेते खेडेगावातून येतात पुण्यात दरवर्षीच्या तुलनेत १०-२० टक्के मालाचीच आवक

 पुणे : कोरोनाच्या संकटामुळे यंदाच्या गणेशोत्सवाला महागाईचा मोठा फटका बसला आहे. पूजेसाठी लागणारी फुले, पत्री, दुर्वा असे सर्वच साहित्य दर वर्षीपेक्षा दुपटीने महाग झाले आहे. गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला कमळाचे एक फूल ५० रुपये, पत्री आणि दुर्वांची जुडी प्रत्येकी ५० रुपये, झेंडू, शेवंतीची फुले ८० रुपये पाव, केवडा पान ४० रुपये या दराने पूजेच्या साहित्याची विक्री झाली. लॉकडाऊनमुळे दर वर्षीच्या तुलनेत १०-२० टक्के मालाचीच आवक झाल्याचे फुलविक्रेत्यांनी सांगितले.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मंडई परिसरात नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडाली होती. केळीचे खुंट, पत्री, दुर्वा, झेंडूची फुले, शेवंतीची फुले, कमळ, केवडा या साहित्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली. यंदाचे पूजेच्या साहित्याचे दर पाहून अनेकांनी आश्चर्य तर काही जणांनी नाराजीही व्यक्त केली. मर्यादित साहित्य आणि चढा दर असे चित्र मंडई परिसरात पहायला मिळाले. दर वर्षी पत्री, दुर्वा १०-२० रुपयांना मिळतात, तर कमळ २०-२५ रुपयांपर्यंत मिळते. यंदाच्या किमती मात्र शब्दश: गगनाला भिडल्या आहेत.

फुलविक्रेत्या पूजा शिर्के म्हणाल्या, ‘गेले पाच महिने लॉकडाऊन असल्याने, लोक घराबाहेर पडत नसल्याने आणि मंदिरे बंद असल्याने व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने व्यवसायात थोडी तेजी आली आहे. मात्र, सर्वच साहित्य यंदा आम्हीही मार्केट यार्डमधून चढ्या दराने खरेदी केले. फुलांचे दर ऐकून ग्राहक राग व्यक्त करत आहेत. मात्र, आमचाही इलाज नाही. गेल्या ४० वर्षांपासून आम्ही या व्यवसायात आहोत. एवढी महागाई आजवर कधीच पाहिली नव्हती.’----------------------फुले, पत्री, दुर्वा असे साहित्य घेऊन अनेक शेतकरी, फुलविक्रेते खेडेगावातून पुण्यात येतात. पत्री, दुर्वा असे साहित्य पानशेत, खडकवासला, मुळशी अशा जवळच्या ठिकाणांहून येते. कमळांची आवक मुंबईतून होते. केवडा लातूर, उस्मानाबाद, पंढरपूर, उदगीर अशा ठिकाणांहून येतो. लॉकडाऊनमुळे शेतकरी पुण्यार यायला घाबरत आहेत, त्यामुळे साहित्याची १०-२० टक्केच आवक झाली आहे. यंदा शेतकऱ्यांचे चार-पाच महिन्यांत मोठे नुकसान झाले आहे. अनेकांची लागवड वाया गेली आहे, तर अनेकांनी व्यवसाय होणार नाही, या भीतीने लागवडच केलेली नाही. त्यामुळे यंदा महागाईने उच्चांक गाठला आहे.- सुहास सरपाले, सरपाले फ्लॉवर मर्चंट

टॅग्स :PuneपुणेGanesh Mahotsavगणेशोत्सवcorona virusकोरोना वायरस बातम्याFarmerशेतकरीbusinessव्यवसाय