शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
4
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
5
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
6
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
7
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
8
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
9
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
10
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
11
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
12
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
13
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
14
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
15
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
16
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
17
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
18
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
19
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
20
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट

हरवला चिमण्यांचा निवारा

By admin | Updated: March 19, 2015 22:54 IST

काका प्लीज आमच्या साठी थोडेसे पाणी घराच्या बाहेर ठेवा ना! आणि बरोबर असलेला चिमणीचा फोटो असा संदेश मार्च महिना सुरू झाल्यापासून व्हाट्स अ‍ॅपच्या माध्यमातून फिरतो आहे.

बारामती : काका प्लीज आमच्या साठी थोडेसे पाणी घराच्या बाहेर ठेवा ना! आणि बरोबर असलेला चिमणीचा फोटो असा संदेश मार्च महिना सुरू झाल्यापासून व्हाट्स अ‍ॅपच्या माध्यमातून फिरतो आहे. या संदेशाची शुक्रवारी (दि.२० ) असलेल्या चिमणी दिनाच्या निमित्ताने पुन्हा आठवण झाली आहे.अगदी दशकभरापूर्वी चिमणी हा पक्षी आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भागच होता. मात्र आता वाढते शहरीकरण, प्रदूषण, सिमेंट-क्राँक्रिटीकरणामध्ये या चिमण्या तग धरू शकत नाही. त्यांचे प्रमाण शहरी भागात बरेच कमी झाले आहे. यामुळेच ‘ गेल्या चिमण्या कुणीकडे ’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे़ चिमण्यांच्या गरजा तशा फारच कमी असतात. त्यांना हवी असते फक्त घरटं करण्याइतपत एक छोटीशी जागा़ कधी मग ती फोटोच्या पाठीमागे, भिंतीच्या फटीत, दरवाजाच्यावर किंवा जिथे जागा मिळेल तिथे ही चिमणी राहते. कधी विहिरीमधील छिद्रांमध्येही ती तिचा आसरा शोधते. मात्र आता शहरीकरणाच्या गराड्यात या चिमण्यांना उपलब्ध असलेली माळवदाची घरे किंवा रामकाटी बाभळींचे प्रमाण कमी झाले आहे. चिमण्या सर्वांत जास्त संख्येने राहात असलेल्या रामकाटी बाभळींची कत्तल करण्यात येत असल्याचे चित्र आहे.आजच्या घरबांधणी पद्धतीत बिचाऱ्या चिमणीला जागाच नाही. अंगण नाही, अंगणात दाणा नाही, बाग आहे; पण अळ्या वा कीड नाही. असलीच तर ती कीटकनाशकांच्या प्रादुभार्वाने दूषित. हवेतही वाहनांच्या धुराचे प्रदूषण! मग चिमणी राहणार कुठे? शहरात राहीलच कशासाठी? हेही चिमण्यांची संख्या कमी होण्याचे महत्त्वाचे कारण आहेच. चिमण्यांचा नैसर्गिक अधिवासच नष्ट होत चालल्याने चिमण्या स्थलांतरित होत चालल्या आहेत.आता उन्हाळा सुरू झाला आहे. या बरोबरच सर्वांनी फार काही नाही पण एक वाटी पाणी पिण्यासाठी ठेवू शकतो. या एक वाटी पाण्याने जर आपण चिमण्यांची तहान भागवू शकला तर खऱ्या अर्थाने चिमणी दिन साजरा करण्यात येईल, असे मत बारामतीतील निसर्गप्रेमी फै य्याज शेख यांनी व्यक्त केले.मागील २० ते ३० वर्षांत चिमण्यांच्या संख्येत ६० टक्क्यांपेक्षा अधिक घट दिसून येत आहे. चिमणी नेहमी सुरक्षित आसरा शोधत असते. तिचा नैसर्गिक अधिवास असलेल्या काटेरी झाडांची संख्या कमी होत चालल्याने चिमण्यांचा निवारा हरवतोय. या वाढत्या शहरीकरणामध्ये चिमण्यांना राहायलाच जागा नसल्याने त्यांची संख्या घटत चालली असल्याचे चित्र दिसत आहे. आपल्याला त्यांचा नैसर्गिक अधिवास जपणे महत्त्वाचे आहे़ - डॉ. महेश गायकवाड, निसर्गतज्ज्ञ