शहरं
Join us  
Trending Stories
1
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
2
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
3
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
4
नेते आणि गुन्हेगार कसे ब्लॅक मनीला व्हाईट मनी बनवतात; ED च्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट
5
अलर्ट! गुगल वाचू शकतं तुमचे WhatsApp मेसेज; फक्त 'ही' सेटिंग्ज बदलून राहा सेफ
6
पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेली महिला, १० तास चालला मृत्यूशी संघर्ष, अखेर ६० किमी अंतरावर झाली सुखरूप सुटका
7
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
8
Vivo X200 FE: विवोच्या नव्या फोनची बाजारात दहशत; थेट अ‍ॅपलशी स्पर्धा? गुगल, सॅमसंगनेही डोक्याला लावला हात!
9
शेजारच्या देशात एअरस्ट्राईक, ड्रोन-मिसाइलच्या सहाय्यानं जबरदस्त हल्ला; भारतानं दिलं उत्तर!
10
Countries Without Rivers: जगातल्या 'या' ६ देशांमध्ये एकही नदी नाही! मग, कशी भागवतात लोकांची तहान?
11
“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?
12
धक्कादायक! यावर्षी १.१२ कोटी SIP बंद, गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांपासून दूर पळतायत? काय आहे कारण?
13
ज्याच्या नावाने थरथर कापायचे लोक, त्याचा सडलेला मृतदेह सापडला?; कॉन्डमच्या साठ्यामुळे उलगडले रहस्य
14
चवीच्या नादात खाताय जास्त मीठ; महामारीसारखे पसरतात 'हे' आजार, धडकी भरवणारा रिपोर्ट
15
Indian Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹२९,३२५ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
16
Air India Plane Crash :'विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती, आताच निष्कर्ष काढू नका', AAIB अहवालावर एअर इंडियाच्या सीईओंचे विधान
17
'बॉलिवूडपेक्षाही मराठी सिनेमा भारी', नवाजुद्दीन सिद्दीकी अन् जयदीप अहलावत यांची प्रतिक्रिया चर्चेत
18
Ola Electric Mobility Q1 Results: निव्वळ तोटा वाढून ४२८ कोटींवर पोहोचला; नफाही ५० टक्क्यांनी कमी झाला, तरीही शेअरमध्ये १६ टक्क्यांची तेजी
19
पहलगाम हल्ला मोठी सुरक्षा चूक; घटनेची पूर्ण जबाबदारी माझी; मनोज सिन्हांचे मोठे वक्तव्य
20
Gold Silver Price 14 July: चांदीनं तोडले सर्व रेकॉर्ड, एका झटक्यात ₹३४८३ ची वाढ; सोन्यातही मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

हरवला चिमण्यांचा निवारा

By admin | Updated: March 19, 2015 22:54 IST

काका प्लीज आमच्या साठी थोडेसे पाणी घराच्या बाहेर ठेवा ना! आणि बरोबर असलेला चिमणीचा फोटो असा संदेश मार्च महिना सुरू झाल्यापासून व्हाट्स अ‍ॅपच्या माध्यमातून फिरतो आहे.

बारामती : काका प्लीज आमच्या साठी थोडेसे पाणी घराच्या बाहेर ठेवा ना! आणि बरोबर असलेला चिमणीचा फोटो असा संदेश मार्च महिना सुरू झाल्यापासून व्हाट्स अ‍ॅपच्या माध्यमातून फिरतो आहे. या संदेशाची शुक्रवारी (दि.२० ) असलेल्या चिमणी दिनाच्या निमित्ताने पुन्हा आठवण झाली आहे.अगदी दशकभरापूर्वी चिमणी हा पक्षी आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भागच होता. मात्र आता वाढते शहरीकरण, प्रदूषण, सिमेंट-क्राँक्रिटीकरणामध्ये या चिमण्या तग धरू शकत नाही. त्यांचे प्रमाण शहरी भागात बरेच कमी झाले आहे. यामुळेच ‘ गेल्या चिमण्या कुणीकडे ’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे़ चिमण्यांच्या गरजा तशा फारच कमी असतात. त्यांना हवी असते फक्त घरटं करण्याइतपत एक छोटीशी जागा़ कधी मग ती फोटोच्या पाठीमागे, भिंतीच्या फटीत, दरवाजाच्यावर किंवा जिथे जागा मिळेल तिथे ही चिमणी राहते. कधी विहिरीमधील छिद्रांमध्येही ती तिचा आसरा शोधते. मात्र आता शहरीकरणाच्या गराड्यात या चिमण्यांना उपलब्ध असलेली माळवदाची घरे किंवा रामकाटी बाभळींचे प्रमाण कमी झाले आहे. चिमण्या सर्वांत जास्त संख्येने राहात असलेल्या रामकाटी बाभळींची कत्तल करण्यात येत असल्याचे चित्र आहे.आजच्या घरबांधणी पद्धतीत बिचाऱ्या चिमणीला जागाच नाही. अंगण नाही, अंगणात दाणा नाही, बाग आहे; पण अळ्या वा कीड नाही. असलीच तर ती कीटकनाशकांच्या प्रादुभार्वाने दूषित. हवेतही वाहनांच्या धुराचे प्रदूषण! मग चिमणी राहणार कुठे? शहरात राहीलच कशासाठी? हेही चिमण्यांची संख्या कमी होण्याचे महत्त्वाचे कारण आहेच. चिमण्यांचा नैसर्गिक अधिवासच नष्ट होत चालल्याने चिमण्या स्थलांतरित होत चालल्या आहेत.आता उन्हाळा सुरू झाला आहे. या बरोबरच सर्वांनी फार काही नाही पण एक वाटी पाणी पिण्यासाठी ठेवू शकतो. या एक वाटी पाण्याने जर आपण चिमण्यांची तहान भागवू शकला तर खऱ्या अर्थाने चिमणी दिन साजरा करण्यात येईल, असे मत बारामतीतील निसर्गप्रेमी फै य्याज शेख यांनी व्यक्त केले.मागील २० ते ३० वर्षांत चिमण्यांच्या संख्येत ६० टक्क्यांपेक्षा अधिक घट दिसून येत आहे. चिमणी नेहमी सुरक्षित आसरा शोधत असते. तिचा नैसर्गिक अधिवास असलेल्या काटेरी झाडांची संख्या कमी होत चालल्याने चिमण्यांचा निवारा हरवतोय. या वाढत्या शहरीकरणामध्ये चिमण्यांना राहायलाच जागा नसल्याने त्यांची संख्या घटत चालली असल्याचे चित्र दिसत आहे. आपल्याला त्यांचा नैसर्गिक अधिवास जपणे महत्त्वाचे आहे़ - डॉ. महेश गायकवाड, निसर्गतज्ज्ञ