शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

दूध खरेदीला तोटा; राज्य सरकार शेतकऱ्याला नफा मिळवून देण्याच्या भूमिकेत - राधाकृष्ण विखे पाटील

By नितीन चौधरी | Updated: June 22, 2023 18:38 IST

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना कमी दरामुळे तोटा सहन करावा लागतोय

पुणे : “राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना कमी दरामुळे तोटा सहन करावा लागत आहे. यासाठी खासगी व सहकारी दूध संघांनी दुधाला किमान ३५ रुपये प्रति लिटर असा खरेदी दर द्यावा अशी राज्य सरकारची भूमिका आहे. तसेच दूध संघांच्या व्यवस्थापनाच्या खर्चाचाही अभ्यास करून नफ्याचा हिस्सा उत्पादकांना मिळावा, यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल,” अशी माहिती पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

या संदर्भात विखे यांनी राज्यातील सर्व दुग्ध सहकारी संस्थांची बैठक पुण्यात घेतली. त्यानंतर बैठकीतील निर्णयांची माहिती पत्रकार परिषदेत दिली. या वेळी माजीमंत्री सदाभाऊ खोत, आमदार राहुल कुल उपस्थित होते. राज्यातील गायीच्या दुधाचे दर मध्यंतरी कमी झाले होते. त्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादकांनी दर वाढवण्याची मागणी केली होती. पशुखाद्याचे दर वाढल्याने उत्पादकांनी चिंता व्यक्त केली होती. त्यामुळे दूध खरेदी दर हा राज्यात एकसारखा असावा आणि तो ३५ रुपये लिटर देण्यात यावा अशी या बैठकीत चर्चा झाली असून या संदर्भात राज्य सरकार, दूध संघ, उत्पादक शेतकरी यांच्या समितीमार्फत हा निर्णय घेण्यात येईल. दूध संस्थांना नफा मिळावा तसा उत्पादकांनाही पैसे मिळावेत अशी सरकारची भूमिका आहे. दूध उत्पादकांना चांगले दर द्यावेत हे संस्थांची जबाबदारी आहे. नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड यांच्या मार्फत आता दुधाच्या भुकटीची निर्यात करण्यात येणार असून त्याबाबत बोर्डाला आम्ही विनंती करणार आहोत असे विखे पाटील यांनी सांगितले

पशुखाद्य दरामध्ये २५ टक्के दर कमी करण्याचे संबंधित कंपन्यांना आम्ही निर्देश दिले आहेत त्यामुळे पशुखाद्य कमी दरात मिळून उत्पादन खर्च कमी होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असेही ते या वेळी म्हणाले. राज्य सरकारने एक रुपयांमध्ये पीक विमा योजना राबवली आहे. त्या पार्श्वभूमीवर आता एक ते तीन रुपयांमध्ये पशुधनाचा विमा उतरण्याचा सरकारचा विचार आहे. या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही सूचना केल्या आहेत. त्या सूचनानुसार आम्ही प्रस्ताव देणार आहोत. पशुधनाचा विमा उतरण्याचा देशाचा हा पहिलाच प्रयोग असेल, असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला. विम्याच्या माध्यमातून सरकार पशुधनाचे दायित्व स्वीकारेल असेही ते म्हणाले. लंपी रोगाच्या पार्श्वभुमीवर जनावरांना लसीचा दुसरा डोसही मोफत देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पशुवैद्यकीय डिप्लोमा आता बारावीनंतर

राज्यात सध्या पशुवैद्यकीय डिप्लोमा दहावीनंतर दोन वर्षांचा आहे मात्र याला पशुवैद्यकीय परिस्थितीची मान्यता नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी अडचण येत आहे. यापुढे राज्यात बारावीनंतर तीन वर्षांचा पशुवैद्यकीय डिप्लोमा सुरू करण्यात येईल. नागपूरच्या पशुवैद्यकीय विद्यापीठामार्फत त्याची अंमलबजावणी होईल. हा डिप्लोमा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पशुवैद्यकीय पदवीच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश देण्यात येईल. त्यापूर्वी यासंदर्भात पशुवैद्यकीय परिषदेकडून मान्यता देखील घेण्यात येईल. याची अंमलबजावणी पुढील शैक्षणिक वर्षापासून करण्यात येईल असेही विखे पाटील यांनी सांगितले.

खोत यांच्याकडून स्वागत

गाईच्या दुधाची खरेदी किमान ३५ रुपये या दरानेच करावी, हा विखे पाटील यांनी जाहीर केलेला निर्णय क्रांतिकारक आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्याला दूध दराचे संरक्षण मिळणार आहे. दूध दराची शाश्वती मिळाल्यास व्यवसायात स्थिरता येईल, असे मत शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले.

 

टॅग्स :PuneपुणेRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलmilkदूधFarmerशेतकरीGovernmentसरकार