शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
4
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
5
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
6
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
7
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
8
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
9
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
10
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
11
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
12
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
13
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
14
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
15
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
16
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
17
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
18
टीम इंडियाच्या ' या ' स्टार क्रिकेटरसोबत केलेला 'वन नाईट स्टँड'; बॉबी डार्लिंगचा खुलासा
19
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
20
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात

हे ‘प्रभू’, पुण्याबाबत नको सावत्रपणा

By admin | Updated: July 18, 2015 04:23 IST

रेल्वेमंत्रिपदावर बिहार-पश्चिम बंगालचे वर्चस्व असल्याने महाराष्ट्राला नेहमीच सावत्रपणाची वागणूक; त्यातही आर्थिक राजधानी राज्याच्या वाट्याला आलेला बहुतांश भाग

पुणे : रेल्वेमंत्रिपदावर बिहार-पश्चिम बंगालचे वर्चस्व असल्याने महाराष्ट्राला नेहमीच सावत्रपणाची वागणूक; त्यातही आर्थिक राजधानी राज्याच्या वाट्याला आलेला बहुतांश भाग मुंबईलाच जात असल्याने पुण्याचे रेल्वेचे अनेक प्रश्न रखडले आहेत. सुरेश प्रभू यांनी तरी पुण्याची ही सावत्रपणाची वागणूक बदलून रेल्वेबाबतचे प्रश्न सोडविण्याची पुणेकरांची मागणी आहे. रेल्वेमंत्री झाल्यानंतर शनिवारी प्रथमच सुरेश प्रभू हे पुण्यात येत आहेत़ या भेटीत त्यांच्याकडून पुण्यातील रेल्वेच्या विकासासाठी भरीव घोषणा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे़ देशातील सातवे महानगर म्हणून पुणे उदयाला येत आहे. मात्र, कोणत्याही मेट्रोसाठी गरज असलेली रेल्वेची जीवनवाहिनी पुण्यात नाही. पुणे- लोणावळा लोकल सक्षमच होऊ शकलेली नाही. चाकणपासून ते जुन्नरपर्यंतचा आणि वाघोलीपासून ते शिरूरपर्यंतचा विकसित औद्योगिक भाग रेल्वेपासून वंचित आहे. पुणे विभाग केवळ नावालाच केला असून याला अद्याप सक्षम करण्यात आलेले नाही. पुण्याच्या रेल्वे स्थानकाची बजबजपुरी झाली असून, हडपसरला दुसरे टर्मिनल म्हणून विकसित करण्याची केवळ घोषणाच राहिली आहे. मुंबई आणि कोकणसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करून राज्य शासनाच्या सहभागातून विकासाचे पाऊल उचलले आहे़ त्याप्रमाणे पुण्यावरही प्रभू कृपा व्हावी, अशी पुणेकरांची इच्छा आहे. पुणे ते लोणावळा तिसरी लाइनपुणे-मुंबई या दोन शहरांमधील रेल्वेगाड्यांची संख्या अतिशय कमी आहे़ गेल्या १० वर्षांत एकही नवीन गाडी या मार्गावर वाढविण्यात आली नाही़ याला कारण बिझी असलेला रेल्वेमार्ग. या रेल्वे अंदाजपत्रकात पुणे ते लोणावळा तिसऱ्या लाइनसाठी निधीची घोषणा करण्यात आली आहे़ मात्र, हा निधी अतिशय तुटपुंजा आहे़ रेल्वेच्या पुणे विभागाने पुणे ते लोणावळादरम्यानच्या ६४ किमीच्या तिसऱ्या लाईनसाठीचा ९९३़९१ कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल रेल्वे बोर्डाकडे पाठविला आहे़ सध्या या लाइनच्या कामासाठी केवळ २७ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे़ या अहवालाला रेल्वे बोर्डाने तातडीने मंजुरी देऊन काम सुरूहोण्याची आवश्यकता आहे़ हडपसर दुसरे टर्मिनलपुणे स्टेशनवरून नवीन गाड्या सुरू करणे सध्याच्या परिस्थितीत अशक्य आहे़ पुण्याचा विकास व्हायचा असेल, तर तातडीने दुसरे रेल्वे टर्मिनल सुरू होण्याची आवश्यकता आहे़ त्यासाठी राज्य शासन, पुणे महापालिका यांच्याशी समन्वय साधणारी एखादी समिती स्थापन करून हे काम प्राधान्याने हाती घेण्याची आवश्यकता आहे़