शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

हे ‘प्रभू’, पुण्याबाबत नको सावत्रपणा

By admin | Updated: July 18, 2015 04:23 IST

रेल्वेमंत्रिपदावर बिहार-पश्चिम बंगालचे वर्चस्व असल्याने महाराष्ट्राला नेहमीच सावत्रपणाची वागणूक; त्यातही आर्थिक राजधानी राज्याच्या वाट्याला आलेला बहुतांश भाग

पुणे : रेल्वेमंत्रिपदावर बिहार-पश्चिम बंगालचे वर्चस्व असल्याने महाराष्ट्राला नेहमीच सावत्रपणाची वागणूक; त्यातही आर्थिक राजधानी राज्याच्या वाट्याला आलेला बहुतांश भाग मुंबईलाच जात असल्याने पुण्याचे रेल्वेचे अनेक प्रश्न रखडले आहेत. सुरेश प्रभू यांनी तरी पुण्याची ही सावत्रपणाची वागणूक बदलून रेल्वेबाबतचे प्रश्न सोडविण्याची पुणेकरांची मागणी आहे. रेल्वेमंत्री झाल्यानंतर शनिवारी प्रथमच सुरेश प्रभू हे पुण्यात येत आहेत़ या भेटीत त्यांच्याकडून पुण्यातील रेल्वेच्या विकासासाठी भरीव घोषणा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे़ देशातील सातवे महानगर म्हणून पुणे उदयाला येत आहे. मात्र, कोणत्याही मेट्रोसाठी गरज असलेली रेल्वेची जीवनवाहिनी पुण्यात नाही. पुणे- लोणावळा लोकल सक्षमच होऊ शकलेली नाही. चाकणपासून ते जुन्नरपर्यंतचा आणि वाघोलीपासून ते शिरूरपर्यंतचा विकसित औद्योगिक भाग रेल्वेपासून वंचित आहे. पुणे विभाग केवळ नावालाच केला असून याला अद्याप सक्षम करण्यात आलेले नाही. पुण्याच्या रेल्वे स्थानकाची बजबजपुरी झाली असून, हडपसरला दुसरे टर्मिनल म्हणून विकसित करण्याची केवळ घोषणाच राहिली आहे. मुंबई आणि कोकणसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करून राज्य शासनाच्या सहभागातून विकासाचे पाऊल उचलले आहे़ त्याप्रमाणे पुण्यावरही प्रभू कृपा व्हावी, अशी पुणेकरांची इच्छा आहे. पुणे ते लोणावळा तिसरी लाइनपुणे-मुंबई या दोन शहरांमधील रेल्वेगाड्यांची संख्या अतिशय कमी आहे़ गेल्या १० वर्षांत एकही नवीन गाडी या मार्गावर वाढविण्यात आली नाही़ याला कारण बिझी असलेला रेल्वेमार्ग. या रेल्वे अंदाजपत्रकात पुणे ते लोणावळा तिसऱ्या लाइनसाठी निधीची घोषणा करण्यात आली आहे़ मात्र, हा निधी अतिशय तुटपुंजा आहे़ रेल्वेच्या पुणे विभागाने पुणे ते लोणावळादरम्यानच्या ६४ किमीच्या तिसऱ्या लाईनसाठीचा ९९३़९१ कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल रेल्वे बोर्डाकडे पाठविला आहे़ सध्या या लाइनच्या कामासाठी केवळ २७ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे़ या अहवालाला रेल्वे बोर्डाने तातडीने मंजुरी देऊन काम सुरूहोण्याची आवश्यकता आहे़ हडपसर दुसरे टर्मिनलपुणे स्टेशनवरून नवीन गाड्या सुरू करणे सध्याच्या परिस्थितीत अशक्य आहे़ पुण्याचा विकास व्हायचा असेल, तर तातडीने दुसरे रेल्वे टर्मिनल सुरू होण्याची आवश्यकता आहे़ त्यासाठी राज्य शासन, पुणे महापालिका यांच्याशी समन्वय साधणारी एखादी समिती स्थापन करून हे काम प्राधान्याने हाती घेण्याची आवश्यकता आहे़