शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

‘आधार’साठी लागल्या लांबच लांब रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 04:47 IST

‘आधार कार्ड’ नोंदणीचा गोंधळ अद्यापही कायम असून बाजीराव रस्त्यावरील वर्धमान हाईट्स इमारतीमधील आधार नोंदणी कार्यालयात सोमवारी पहाटेपासूनच शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती.

पुणे : ‘आधार कार्ड’ नोंदणीचा गोंधळ अद्यापही कायम असून बाजीराव रस्त्यावरील वर्धमान हाईट्स इमारतीमधील आधार नोंदणी कार्यालयात सोमवारी पहाटेपासूनच शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती. एकीकडे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी १८५ केंद्रांवर आधार नोंदणी सुरू असल्याचा दावा केला आहे. परंतु, प्रत्यक्षात पुणे आणि पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यामध्ये केवळ ११० केंद्र सुरू असल्याची माहिती समोर आल्याने हा दावा फोल ठरला आहे.मागील सहा महिन्यांपासून आधारचा गोंधळ सुरू आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना आधार बंधनकारक करण्यात आलेले आहे. यासोबतच पॅनकार्ड, मोबाईल सिमकार्ड, बँक खाते, प्राप्तिकर विवरण, रुग्णालयांमध्येही आधार जोडणी आवश्यक करण्यात आलेली असल्याने नागरिकांनी धावपळ सुरू आहे. नवीन आधार काढण्यासोबतच त्यामधील दुरुस्तीसाठी नागरिकांना आधारची केंद्रे शोधत फिरावे लागत आहे. शासनाचे फुसके आदेश, महाआॅनलाइन आणि खासगी संस्थांमधील टक्केवारीचा वाद, तांत्रिक अडचणी यामुळे आधार केंद्रे व्यवस्थित सुरू होऊ शकलेली नाहीत.यावर तोडगा काढण्यासाठी नादुरुस्त असलेल्या शंभर मशीन्स दुरुस्त करण्याची परवानगी मिळावी आणि खासगी एजन्सीजना शासकीय कार्यालयांमध्ये परवानगी मिळावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिला होता. मात्र, हा प्रस्ताव अद्यापही बासनातच गुंडाळलेला आहे. सोमवारी बाजीराव रस्त्यावरील वर्धमान हाईट्स इमारतीमधील अलंकित लिमिटेड, शुक्र वार पेठेतील एनएसडीएल ई-गव्हर्नन्स इन्फ्रास्ट्रक्चर यांच्या आधार केंद्रांवर पहाटे चार वाजल्यापासूनच रांगा लागल्या होत्या. थंडीच्या कडाक्यात लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वच जण आधारसाठी उभे होते. अलंकित लिमिटेडच्या कार्यालयात नागरिकांना टोकन दिले जाते. हे टोकन मिळविण्यासाठी नागरिकांची झुंबड उडालेली होती. गर्दी लक्षात घेता पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.प्रत्येक सोमवारी आधार नोंदणी आणि दुरुस्तीसाठी नागरिकांना टोकन दिले जाते. त्यामुळे दर सोमवारी गर्दी होत असते. मात्र, या वेळी पहिल्यांदाच एवढी गर्दी झाली. आम्ही कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारत नाही. एका आठवड्यासाठी दर दिवसाला सत्तर याप्रमाणे टोकन देण्यात आले आहेत.- श्री पंकज, आधार केंद्र चालक,अलंकित लिमिटेडआधारची केंद्रच झाली निराधार१ केंद्र व राज्य सरकारनेही प्रत्येक योजनेसाठी आधार कार्ड सक्तीचे केले आहे. मात्र ते कार्ड देण्यासाठी जी व्यवस्था करण्यात आली आहे ती आधार केंद्रच निराधार झालेली आहेत. तेथील कामकाज सक्षमतेने सुरू नाही. या केंद्राची संख्या वाढवावी व तक्रारी असलेल्या केंद्रातील कर्मचाºयांची चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेने महापालिकेच्या सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत केली.२ राष्ट्रवादी काँग्रेसनेही याबाबत टीका केली. महापालिका आधारकार्ड काढून देण्याच्या बाबतीत ढिम्म आहे, असा आरोप शिवसेनेच्या विशाल धनवडे यांनी केला. शहराच्या मध्य भागात सुरू केलेल्या केंद्रांवर नागरिकांकडून जास्त पैसे घेतले जातात, असा आरोप त्यांनी केला.३ राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप बराटे यांनी महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आधार कार्ड काढून देणारी केंद्रे सुरू करावीत, अशी मागणी केली. आधारकार्ड काढण्यासाठी केंद्रावर आलेल्या वृद्धांच्या बोटांचे ठसे आणि डोळे स्कॅन होत नाहीत. त्यामुळे वृद्ध मंडळींना तासन्तास रांगेत उभे राहून मोकळ्या हाताने परतावे लागते.४ सुरू करण्यात आलेल्या आधार कार्ड केंद्रावरील अनेक उपकरणे बंद आहेत. तिथे कर्मचारी नाहीत. त्यामुळे नागरिकांना रांगा लावून थांबावे लागते, असे काही नगरसेवकांनी सांगितले. प्रशासनाच्या वतीने केंद्रांची संख्या वाढवण्यात येईल, असे या वेळी सांगण्यात आले.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डPuneपुणे