शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

लोकमत वुमेन समीट २०१९ : आयुष्याची गोष्ट ते यशोगाथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 12:20 IST

आपल्या आयुष्याची गोष्ट यशोगाथेमध्ये रुपांतरित झाली पाहिजे आणि त्यासाठी प्रबळ आत्मविश्वास असला पाहिजे...

ठळक मुद्दे‘ती’ची गोष्ट’ या विषयावरील परिसंवादात उलगडला प्रवास : संघर्षाची गोष्ट

पुणे : स्वत:ची ओळख निर्माण करण्याची प्रक्रिया महिलांसाठी तितकीशी सोपी नसते. सक्षमीकरणाची लढाई सुरु असली तरी समाजाची मानसिकता पूर्णपणे बदललेली नाही. मात्र, लोक काय म्हणतील याचा विचार न करता प्रत्येकीने स्वत:ला घडवायला हवे. आपल्या आयुष्याची गोष्ट यशोगाथेमध्ये रुपांतरित झाली पाहिजे आणि त्यासाठी प्रबळ आत्मविश्वास असला पाहिजे, असे आवाहन विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांनी केले.महिला आज व्यक्त होऊ लागल्या आहेत. लक्ष्मीबाई टिळक यांनी दाखविलेल्या वाटेवर चालत आहेत.

लोकमत वुमेन समिटमध्ये ‘ती’ची गोष्ट’ या विषयावरील परिसंवादात प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे, सौंदर्या शर्मा, प्रसिद्ध लेखिका श्रीमोयी पियू कुंडू, उद्योजिका सुजाता चॅटर्जी, प्रसिद्ध वेडिंग डेकोर डिझायनर गुरलीन पुरी सहभागी झाल्या होत्या.राजश्री देशपांडे म्हणाल्या, ‘मी कोण आहे, माझी ओळख काय या प्रश्नाचे उत्तर आजही माझ्याकडे नाही. कारण, अजूनही मी स्वत:चा शोध घेत आहे. औरंगाबादसारख्या शहरातून मी शिक्षणासाठी पुण्यात आले. कष्ट करुन स्वत:ला घडवायचे होते, काहीतरी करायचे होते, पण नेमके काय ते कळत नव्हते. आजही हे कोडे उलगडलेले नाही. आजपर्यंत प्रवासाचा आनंद घेत चालत राहिले आहे. आपण ध्येयाच्या मागे पळत राहतो आणि स्वत:ला विसरतो. मला स्वत:ला विसरायचे नाही. स्त्री आणि अभिनेत्री म्हणून अनेक जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. मी पाच वर्षांपूर्वी दोन गावे दत्तक घेतली आहेत. तेथील विकासासाठी काम करायचे आहे.’    उद्योजिका सुजाता चॅटर्जी म्हणाल्या, ‘सध्या आपण रिटेलच्या जगात वावरतो आहोत. प्रत्येकीच्या घरी कपाट भरुन कपडे असतील. पण, गरजूंना कपडे मिळणे ही अडचण असते. त्यामुळे आम्ही कपडे दान करण्याचे, कपड्यांचा पुनर्वापर करण्याचे ठरवले. उद्योगाचा काहीही अनुभव नसताना नकारात्मकता दूर सारुन काम केले. आजवर आम्ही १५ हजार गरजूंपर्यंत कपडे पोहोचवले आहेत. आमच्याकडे काम करणा-या सर्व महिला असल्याने स्त्रियांना रोजगार मिळाला आहे. चांगल्या कामात खारीचा वाटा उचलल्याचे समाधान वाटते.’गुरलीन पुरी म्हणाल्या, ‘मी वयाच्या अठराव्या वर्षी कामाला सुरुवात केली. व्यावसायिक पार्श्वभूमी नसताना उभी राहिले. स्वत:वर विश्वास ठेवा, काम करत रहा. आपल्याला जे वाटते ते बिनधास्त करत राहा. यश नक्कीच तुमचे आहे.’------------प्रत्येकजण स्त्री सक्षमीकरणाबाबत बोलत आहे. मात्र, अजूनही चित्रपटसृष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदललेला नाही. मी वैद्यकीय शिक्षण सोडून बॉलीवूडमध्ये येण्याचा निर्णय घेतला तेव्हा खूप विरोध झाला. तुझ्या आडनावाला स्टारडम नाही, तू कोणत्याही अभिनेत्याला डेट करत नाहीस, तुझा कोणी गॉडफादर नाही, मग तुला अभिनेत्री का व्हायचे आहे, असा प्रश्न दिग्दर्शकाने विचारला. या कोणत्याही गोष्टीपेक्षा मेहनत जास्त महत्वाची आहे, हे मी त्याला खडसावून सांगितले. लोकांना ज्ञान पाजळू दे, आपण कोणाचीही पर्वा न करता काम करत रहावे.- सौंदर्या शर्मा-----------स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी आपण लढले पाहिजे. माझे वडील खूप लवकर वारल्याने आईने मला लहानाचे मोठे केले. मी इतिहासाचे शिक्षण घेतले. त्यानंतर पुरातत्वशास्त्रामध्ये शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती मिळत होती. त्यावेळी मी महाविद्यालयाच्या वर्तमानपत्राची संपादक होते, लिहिण्यात रमत होते. पत्रकारितेचे शिक्षण घेतले आणि राष्ट्रीय संपादकपदापर्यंत मजल मारली. महिलांच्या समस्या, भावविश्व पुस्तकातून मांडण्याचा प्रयत्न केला. एकट्या महिलाही खंबीर असतात. प्रत्येक महिलेने दुसऱ्या महिलेला पाठिंबा दिला पाहिजे.- श्रीमोयी पोयू कुंडू

टॅग्स :Lokmat Women Summitलोकमत वुमेन समीटLokmat Eventलोकमत इव्हेंटVijay Dardaविजय दर्डाWomenमहिलाcinemaसिनेमा