शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
2
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
3
"कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
4
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
5
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
6
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
7
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
8
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
9
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
10
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'
11
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
12
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
13
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
14
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
15
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
16
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
17
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
18
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
19
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
20
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल

लोक प्रबोधन ही पत्रकारांची जबाबदारी : माधव गोडबोले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 8:12 PM

आज समाजजीवनामध्ये झुंडशाहीची मोठी भीती निर्माण

ठळक मुद्देपुणे श्रमिक पत्रकार संघाच्या ८० व्या वर्धापनदिन

पुणे : सरकार जेव्हा अडचणीत येते, तेव्हा अयोध्यासारखे विषय मुद्दाम शोधून काढले जातात़. त्यामुळे भारताच्या इतिहासातील अयोध्या हे शेवटचे प्रकरण ठरणार नाही. तर यापुढे मथुरासारखी प्रकरणे येऊ शकतात. अशावेळी लोकांचे प्रबोधन करणे, ही पत्रकारांची जबाबदारी असल्याचे मत निवृत्त केंद्रीय गृह व न्याय सचिव माधव गोडबोले यांनी व्यक्त केले़ पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या ८० व्या वर्धापनदिनानिमित्त ''अयोध्या प्रश्न आणि माध्यमे'' या विषयावर गोडबोले बोलत होते. या वेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, सरचिटणीस चंद्रकांत हंचाटे, खजिनदार सुनील जगताप उपस्थित होते. यावेळी संघाच्यावतीने आयोजित विविध स्पर्धांमधील विजेत्यांचा तसेच पत्रकारिता व अन्य क्षेत्रात विशेष नैपुण्य मिळवलेल्या सदस्यांचा सन्मान करण्यात आला़ गोडबोले म्हणाले, देशासमोर अयोद्धा हे एकच प्रकरण असल्याचे चित्र निर्माण केले गेले. अशावेळी न्यायालयाचा निर्णय लोकांपर्यंत कसा जातो हे महत्त्वाचे असते. अयोध्येत करण्यात येणारी कारसेवा फक्त प्रतिकात्मक (सिंबॉलिक) आहे व यास प्रसिद्धी द्या, असे न्यायालयाने प्रत्यक्ष सांगितले होते़. मात्र, जमलेल्या लोकांना असे वाटले, की सर्वोच्च न्यायालयाने कारसेवेला परवानगी दिली आहे. कारसेवकांनी पुलिस हमारे साथ है, बडी खुशीकी बात है, अशा घोषणा देत मशीद पाडली. आज समाजजीवनामध्ये झुंडशाहीची मोठी भीती निर्माण झाली आहे.लिबरहान आयोगाच्या अहवालानुसार ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत घडलेली घटना ही पूर्णत: पूर्वनियोजित होती. ज्या क्षणी मशिदीवर हल्ला करण्यात आला, त्याचक्षणी वार्तांकनासाठी आलेल्या पत्रकारांवर हल्ले करण्यात आले. पत्रकारांनी घटनेचे केलेले व्हिडिओ व व्हाईस रोकॉर्डिंग नष्ट करण्यात आले. पत्रकारांवरील हल्ल्यांची तक्रार घटनास्थळी उपस्थित भाजपा नेते लालकृष्ण अडवानी, मुरलीमनोहर जोशी यांच्याकडे करूनही त्यांनी काही केले नाही. अयोध्या घटना लोकशाहीतील दैवदुर्विलास म्हणावी लागेल असेही गोडबोले म्हणाले़ भारतामध्ये लोकशाहीसाठी सर्वोत्तम काम पंडित नेहरूंनी केले आहे़ त्यांनी विचार स्वातंत्र्याशी बांधिलकी जपत १७ वर्षे कारभार केला. २२ डिसेंबर १९४९ रोजी अयोध्येतील मशिदीमध्ये जेव्हा राममूर्ती ठेवण्यात आल्या, तेव्हा हा विषय इतका मोठे रूप धारण करेल असे वाटले नव्हते़ असेही गोडबोले यांनी सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रसाद कुलकर्णी यांनी केले, आभार चंद्रकांत हंचाटे यांनी मानले़ सूत्रसंचालन लक्ष्मण मोरे व तनिष्का डोंगरे यांनी केले़ ----------- 

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयGovernmentसरकारAyodhyaअयोध्याJournalistपत्रकार