शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बिलातून कर्जवसुली, शेतकरी संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 00:43 IST

दुष्काळ जाहीर झाल्यानंतर कर्जमाफी करायचे सोडून शेतक-यांनी सोसायटीतून घेतलेले कर्ज संत तुकाराम साखर कारखान्याने शेतक-यांच्या बिलातून कापून घेतल्याने ऊसउत्पादक शेतकरी संतप्त झाले आहेत.

चाकण - दुष्काळ जाहीर झाल्यानंतर कर्जमाफी करायचे सोडून शेतक-यांनी सोसायटीतून घेतलेले कर्ज संत तुकाराम साखर कारखान्याने शेतक-यांच्या बिलातून कापून घेतल्याने ऊसउत्पादक शेतकरी संतप्त झाले आहेत. त्यामुळे शेतकºयांच्या बिलातून कर्जवसुली करू नये, अशी मागणी खेड तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली असून, ही जुलमी वसुली थांबवली नाही तर कायदेशीर कारवाई करून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेने ऊसउत्पादक शेतक-यांच्या बैठकीत दिला आहे.साखर कारखान्याच्या सभासद शेतकºयांनी सोसायटीकडून घेतलेले कर्ज शेतकºयांना न सांगता कारखान्याने परस्पर वसुली सुरू केली आहे. शेतकºयांनी सोसायटीकडून घेतलेले कर्ज वसुली करण्याचा अधिकार साखर कारखान्याला नाही, ते बेकायदेशीर असून, शेतकºयांची पिळवणूक केली जात आहे. शेतकºयांची ही रक्कम तातडीने परत करावी; अन्यथा आम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. केंद्रीय साखर नियंत्रण कायदा १९६६ अनुसार देशातील शेतकºयांनी गाळपासाठी ऊस विकल्यानंतर १४ दिवसांत उसाची रास्त व किफायतशीर किंमत अर्थात एफआरपी देणे बंधनकारक आहे. साखर कारखान्याने शेतकºयांना २१०० रुपये एफआरपी दिली असून, ती कमी आहे, असे संघटनेचे म्हणणे आहे. उसाला पहिली उचल एकरकमी एफआरपी देणे हे ऊसदराच्या तोडग्यात ठरले आहे. त्यामुळे कारखान्याने २७५० रुपयेप्रमाणे एफआरपी देणे क्रमप्राप्त आहे. तरीही ती शेतकºयांना एकरकमी न देता टप्प्याटप्प्याने दिली जात असून, ती एकरकमी द्यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी