शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

लोकसंस्कृती जपणाऱ्या मरिआईवाल्यांचे जीवन उपेक्षितच

By admin | Updated: January 23, 2017 02:31 IST

अगदी पूर्वापर चालत आलेल्या चालीरीती, रूढी, परंपरा जोपासणारे आपले संस्कृतीपूजक राज्य महाराष्ट्र. गावात व गावगाड्यात

गोलेगाव : अगदी पूर्वापर चालत आलेल्या चालीरीती, रूढी, परंपरा जोपासणारे आपले संस्कृतीपूजक राज्य महाराष्ट्र. गावात व गावगाड्यात ज्याप्रमाणे बारा बलुतेदारांना महत्त्व होते, तसेच महत्त्व मरिआईवाले, नंदीवाले, वासुदेव, पिंगळा, बहुरूपी आदींना होते. भटके जीवन जगणाऱ्या या लोकांचे आजही हलाखीचे व उपेक्षितच जगणे चालू असल्याची वेदना मरिआईवाले सुखदेव रंगप्पा देवकर व त्यांच्या पत्नी शांताबाई यांच्या बोलण्यातून व्यक्त झाली. मूळचे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात असणाऱ्या पिनौर या छोट्याशा खेडेगावातून आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी हे कुटुंब शेकडो किलोमीटर भटकंती करत आहे. मरिआईचा देव्हारा डोक्यावर घेऊन आलेली महिला व हातातील आसुडाने उघड्या अंगावर फटके मारणारा देवीचा भक्त व त्या आसुडाच्या कडकड आवाजाने भेदून निघणारे आसमंत यामुळे काही काळ सर्वत्र अभेद्य अशी शांतता पसरते. मरिआईवाली महिला आपल्याजवळील ढोलातून गुबुगुबु आवाज काढून देवीच्या दर्शनासाठी येण्याचे आमंत्रण देत असते.(वार्ताहर)४मरिआईची मनोभावे पूजा केल्याने घरातील व गावातील संकट, रोगराई, इडापिडा नष्ट होत असल्याची भावना लोकांमध्ये असते. मरिआईवाले देवीच्या नावाने लोकांना आशीर्वाद देऊन चालू वर्षीच्या पावसाचा अंदाज तसेच संक्रांतीबद्दल माहिती सांगत असल्याने लोक त्यांच्या आगमनाची वाट पाहत असतात. मुलांना आमच्यासारखे वाईट दिवस नकोत म्हणून कर्जतला शासकीय वसतिगृह व शाळेत ठेवले असून तीनही मुले आपल्याजवळ नसल्याची वेदना अश्रुरूपातून जाणवली. त्याचप्रमाणे मुलांना चांगले शिक्षण व नोकरी देण्याची सरकारकडून अपेक्षा असल्याचे बोलून दाखविले. तसेच वाढते शहरीकरण व आधुनिकतेमुळे लोकांना मरिआईचे महत्त्व कमी होऊ लागल्याने पहिल्यासारखी कमाई होत नसल्याचेही सांगितले.