शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
3
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
4
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
5
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
6
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
7
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
8
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
9
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
10
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
11
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
12
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
13
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
14
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
15
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
16
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
17
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
18
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
19
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
20
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!

साहित्यिकांनी एका व्यक्तीच्या पायाशी विवेक गहाण ठेवू नये - फादर फ्रान्सिस दिब्रिटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 02:49 IST

सहिष्णूता हा भारतीयांचा धर्म असून असहिष्णूता हा अपघात आहे. साहित्यिक, विचारवंतांची शारीरिक आणि वैचारिक हत्या केली जात आहे, हे खेदजनक आहे.

पुणे : सहिष्णूता हा भारतीयांचा धर्म असून असहिष्णूता हा अपघात आहे. साहित्यिक, विचारवंतांची शारीरिक आणि वैचारिक हत्या केली जात आहे, हे खेदजनक आहे. कोणा एका व्यक्तीच्या पायाशी स्वाभिमान, अस्तित्व आणि विवेक गहाण न ठेवता साहित्यिकांनी वेळोवेळी भूमिका घेऊन आवाज उठवत, ‘राजा तू नागडा आहेस’ हे ठणकावून सांगितले पाहिजे. सहिष्णू भारतात गाय महत्त्वाची की माणूस हे ठरवावे लागेल. काँग्रेसमुक्त आणि भाजपमुक्त भारत अशा गोष्टींपेक्षाही आपल्याला भीतीमुक्त आणि द्वेषमुक्त भारत हवा आहे, अशा शब्दांत फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी सद्यस्थितीवर निशाणा साधला. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश या विचारवंतांच्या खूनसत्रानंतर आत्माविष्कार करण्यासाठी कलाकार आणि साहित्यिक मुक्त आहेत का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे आयोजित १८ व्या साहित्यिक कलावंत संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात दिब्रिटो बोलत होते. नाट्यसंमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. खासदार सुप्रिया सुळे, प्रसिद्ध शिल्पकार सुनील देवरे, संयोजक दिलीप बराटे आणि काका चव्हाण उपस्थित होते. साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्षदिलीप बराटे यांनी प्रास्ताविककेले.प्रतिष्ठानचे सचिव वि. दा. पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले. देवेंद्र सूर्यवंशी यांनी आभार मानले.हिंसाचाराने विचारवंतांचा कोंडमारा होतो1या देशातील सामान्य माणूस लोकशाहीचा संरक्षक आहे. परंतु, दुर्दैवाने अधूनमधून आपल्याकडे विचारांची गंगा उलट दिशेने वाहू लागते. आपला प्रवास असहिष्णुतेकडे, संकुचितपणाकडे, ठोकशाही आणि अराजकतेच्या दिशेने होऊ लागतो. काहींच्या भावना पटकन दुखावल्या जातात. धर्म, जात, भाषा, प्रांत, ऐतिहासिक व्यक्तींविषयी चिकित्सक भाष्य केले की संबंधित गट उजळून उठतात. कायदा हाती घेऊन प्रसंगी हिंसाचाराचा अवलंब करतात. विभूतीपूजा, कर्मठपणा आणि पोथीनिष्ठा वाढत असल्याने हाडाच्या संशोधकांची कुचंबणा आणि विचारवंतांचा कोंडमारा होतो, असे दिब्रिटो म्हणाले.2 गज्वी म्हणाले, ‘प्रत्येकाने आपला धर्म घरात ठेवत घराबाहेर संविधान हाच आधार मानला पाहिजे. हिंदू राष्ट्राचा आग्रह धरला जात असल्याने संविधान मूल्यांना तडा जात आहे. संभ्रमित अवस्था निर्माण करून सामान्यांचा गोंधळ उडविण्याचे काम केले जात आहे.’आपली आणि उद्याची पिढी यांच्यात साहित्याची सांगड घालणे आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या मातीत सांस्कृतिक समृद्धीची, साहित्याची बीजे पेरलेली आहेत. लोकशाहीचे मंदिर असलेल्या लोकसभेमध्ये सत्ताधारी फारसे अनुकूल नसतानाही आम्ही समलिंगी संबंधांना आणि सरोगसी विषयाचे विधेयक संमत करून घेतले. राष्ट्रवादीकडून आगामी निवडणुकीत एका तरी तृतीयपंथीला तिकीट दिले जाईल, असा आग्रह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे धरणार आहे.- सुप्रिया सुळे 

टॅग्स :Puneपुणे