शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
2
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
3
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
4
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
6
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
7
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
8
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
9
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
10
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
11
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
13
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
14
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
15
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
16
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
17
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
18
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
19
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
20
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार

कोथरूड क्षेत्रीय कार्यालयात ‘आधार’साठी पहाटेपासून रांग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2020 19:29 IST

कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयात आधार केंद्रावर नागरिकांना आधार कार्ड देण्याची सोय विस्कळीत

ठळक मुद्देऑपरेटर गैरहजर असल्यास नागरिकांचे हाल; नोटीसही नसते लावलेली 

पुणे : महापालिकेतर्फे आधार कार्ड काढण्यासाठी सेवा केंद्र सुरू केली असली, तरी ते बंदच आहेत. त्यामुळे नागरिकांना कार्डसाठी कुठेच ‘आधार’ मिळत नाही. कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयातील केंद्रातही अनेक गैरसोयी असून, तिथे तर नागरिक पहाटेच रांगेसाठी येत आहेत. पण कार्यालय दहानंतर उघडल्यावर ऑपरेटरच गैरहजर असल्याने नागरिकांना निराश होऊन घरी जावे लागत आहे. कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयात आधार केंद्रावर नागरिकांना आधार कार्ड देण्याची सोय आहे. पण गेल्या काही दिवसांपासून येथील सुविधा विस्कळीत झाली आहे. मंगळवारी कार्यालयाला सुटी होती आणि बुधवारी तर ऑपरेटरच गैरहजर होता. त्यामुळे पहाटे सहा वाजल्यापासून लोक रांगेत थांबले होते, त्यांना परत जावे लागले. अनेक महिला आपल्या बाळाला घेऊन आल्या होत्या. त्यांना रांगेत तासनतास उभे राहावे लागते. केंद्रावर पहिल्या २० जणांनाच कार्ड बनविण्यासाठी घेतले जाते. त्यानंतरच्या लोकांना परत दुसर्या दिवशी रांगेत उभे राहावे लागते. अनेक बँका आणि सेवा केंद्र देखील बंद असल्याने नागरिक या कोथरूड क्षेत्रीय कार्यालयात गर्दी करत आहेत. आधार नसेल तर बरीच कामे रखडतात. म्हणून नागरिकांना आधारसाठी रांगेत उभे राहावे लागत आहे. केंद्रावरील कर्मचारी नागरिकांशी वाद घालत असल्याने प्रशासनाने योग्य सुविधा आणि केंद्रांच्या संख्येत वाढ करावी अशी मागणी केली जात आहे. ============== मी याआधी ३ वेळा या कार्यालयात येऊन गेले. २ वेळा सर्व्हर डाऊन असल्याने काम झाले नाही आणि एकदा २१ वा नंबर असल्याने काम झाले नाही.आज पहाटेच नंबर लागण्यासाठी मी रांगेत उभी राहिले. दहा नंतर कार्यालय उघडले. ७ वा नंबर असूनही केवळ आॅपरेट न आल्याने संबंधित अधिकाºयांनी आता उद्या या म्हणून सर्वांना घरी पाठवले. कामाला सुट्टी टाकून आम्ही येथे पहाटेपासून रांगेत थांबायचे आणि परत घरी जायचे हा त्रास का सहन करायचा? आधार कार्ड बाबतचे कोणतेही काम हे नागरिकांच्या मूलभूत अधिकाराची बाब आहे.आधार कार्ड प्रत्येक ठिकाणी गरजेचे आहे. त्यामुळे त्या-त्या भागांत सक्षम आधार सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. जेष्ठ नागरिक तसेच महिलांना आपल्या तान्ह्या बाळासह आधार कार्डच्या कामासाठी सकाळपासून रांगेत लागावे लागते, याची प्रशासनाने दखल घ्यावी.- अ‍ॅड. विंदा महाजन, नागरिक  ==================कार्यालयासमोर झोपावे लागते...रोज पहिले २० नागरिक कार्डसाठी घेताय. म्हणून नागरिक पहाटे सहापासून तिथे येऊन थांबतात. अनेकजण तर तिथेच झोपतात. अनेकदा महिला, जेष्ठ नागरिकही या ठिकाणी येऊन झोपतात. त्यामुळे त्वरीत यावर उपाययोजना व्हावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

टॅग्स :kothrudकोथरूडAdhar Cardआधार कार्ड