शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

TET Exam: टीईटी परीक्षेची काठिण्यपातळी वाढली; भावी शिक्षकांना पेपर सोडवताना फुटला घाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2021 13:40 IST

पहिली ते आठवी पर्यंतच अभ्यासक्रमावरील प्रश्न परीक्षेत विचारले जातील, असे परीक्षा परिषदेकडून सांगितले जात असले तरी फारच अवघड प्रश्न परीक्षेत विचारण्यात आले, अशा प्रतिक्रिया टीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिल्या...

पुणे: राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिक्षक पात्रता परीक्षा (TET Exam) नुकतीच घेण्यात आली. या परीक्षेची काठिण्यपातळी चांगलीच वाढली असून भावी शिक्षकांना परीक्षेत गणित, इतिहास व बाल मानसशास्त्र विषयाचे प्रश्न सोडवताना चांगलाच घाम फुटला. त्यामुळे शिक्षक होणे आता सोपे राहिले नाही, असे बोलले जात आहे. राज्य परीक्षा परिषदेतर्फे २१ नोव्हेंबर २०२० रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी ४ लाख ६८ हजार ९४८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. राज्यातील १ हजार ४४३ परीक्षा केंद्रावर पेपर क्रमांक १ साठी राज्यातील २ लाख ५४ हजार ४२८ विद्यार्थ्यांच्या तर पेपर क्रमांक २ साठी २ लाख १४ हजार २५० विद्यार्थ्यांच्या बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. 

टीईटी परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना गणित विषयाचा पेपर अवघड गेला. तसेच काहींना इतिहास व बाल मानसशास्त्र विषयाचा पेपर सोडवताना प्रश्न अवघड वाटले. इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच अभ्यासक्रमावरील प्रश्न परीक्षेत विचारले जातील, असे परीक्षा परिषदेकडून सांगितले जात असले तरी फारच अवघड प्रश्न परीक्षेत विचारण्यात आले, अशा प्रतिक्रिया टीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिल्या.

एसटी संपाचा परीक्षेवर परिणाम नाही-

टीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना एसटीचा संप गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले बाबत कल्पना होती. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी खाजगी किंवा वैयक्तिक वाहनांच्या वापर करून नियोजित वेळेत परीक्षा केंद्र गाठले.

आता तयारी अभियोग्यता परीक्षेची-

परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेचा निकाल येत्या दीड महिन्यात जाहीर करण्याचा प्रयत्न परिषदेतर्फे केला जाणार आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून केल्या जाणा-या भरतीसाठी अभियोग्यता परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा येत्या फेब्रुवारी महिना अखेरीस घेण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. तत्पूर्वी टीईटी परीक्षेचा निकाल जाहीर केला जाईल. त्यामुळे नुकत्याच झालेल्या टीईटी परीक्षेतील पात्र विद्यार्थ्यांना अभियोग्यता परीक्षा देता येईल.

पुणे जिल्ह्यातील टीईटी परीक्षेची आकडेवारी-

पेपर क्रमांक १ :  ५१ परीक्षा केंद्रावर २१ हजार २२५ विद्यार्थीच्या परीक्षेचे नियोजन

पेपर क्रमांक २ : ४६ परीक्षा केंद्र आणि १८ हजार ६६५ विद्यार्थीच्या परीक्षेचे नियोजन

पुणे जिल्हाउपस्थितअनुपस्थितएकूण
पेपर क्र. 116 हजार 9064 हजार 31921 हजार 225
पेपर क्र. 215 हजार 4183 हजार 44718 हजार 865
एकूण32 हजार 3247 हजार 766 

 

टीईटी परीक्षात गणित विषयातील प्रश्न अवघड होते. केवळ बीएड चा अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांना हे प्रश्न सोडवणे शक्य नव्हते. नेट किंवा सेट परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी गणित विषयाचे प्रश्न सोडवू शकतील अशी या प्रश्नांची काठीण्य पातळी होती. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना गणित विषयाचा पेपर अवघड गेला.

- गायत्री जोशी, विद्यार्थी

परीक्षा परिषदेने टीईटी परीक्षेचे नियोजन उत्कृष्ट केले होते.गेल्या वर्षी झालेल्या टीईटी परीक्षेपेक्षा या वर्षाच्या  परीक्षेची काठिण्यपातळी जास्त होती. इतिहास व बाल मानसशास्त्र या विषयांच्या प्रश्नांची काठिण्य पातळीही अधिक होती. 

- मेघा शिर्के, विद्यार्थी

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडexamपरीक्षाhistoryइतिहास