शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

Live In Relationship: आम्हाला ठरवू द्या ना कुणाबरोबर राहायचंय! पुण्यात समलिंगी तरूणींचा पहिलाच ‘लिव्ह इन’ करार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 10:36 IST

दोघींपैकी एक कुणीतरी हा करार रदद करीत नाही तोवर त्यांच्यामधील हा ‘बॉण्ड’ कायम राहणार

पुणे : एक नागपूरची तर दुसरी गोंदियाची. ओळखीच्या नातेवाईकांच्या लग्न सोहळ्यात दोघींचे ‘लव्ह अँट फर्स्ट साईट’ झाले. मग मैत्री आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. इथे दोघी प्रेमात पडल्या ख-या; पण नेहमीप्रमाणे कुटुंबाने विरोध केला. त्यातील एकीला जीवे मारण्याच्या धमक्या सुरू झाल्या. दोघींनीही थेट पुणे गाठले अन शिवाजीनगर न्यायालयात या समलिंगी तरूणींनी स्वेच्छेने "लिव्ह इन ' मध्ये राहाण्यासंबंधी कायदेशीर करार केला. आता पोलीस, कुटुंब आणि जवळचे नातेवाईकही त्यांच्या संबंधाना आडकाठी करू शकणार नाहीत. जोपर्यंत दोघींपैकी एक कुणीतरी हा करार रदद करीत नाही तोवर त्यांच्यामधील हा ‘बॉण्ड’ कायम राहणार आहे.

मीनल आणि माधुरी (नाव बदललेली) या समलिंगी तरूणींची ही कहाणी आहे. मीनल ही 28 वर्षांची तर माधुरी 19 वर्षांची आहे. समलिंगी संबंधांना गुन्हा ठरविणारे भारतीय दंड संहितेचे कलम 377 हे सर्वोच्च न्यायालयाने रदद करून समलिंगी जोडप्यांना दिलासा दिला असला तरी त्यांचा लढा संपलेला नाही. कारण अजूनही समाजामध्ये समलिंगी संबंधांना स्वीकारण्याची मानसिकता तयार झालेली नाही. त्याचाच बळी या समलिंगी तरूणी ठरल्या आहेत.

मीनल म्हणाली, माधुरीच्या कुटुंबाचा आमच्या नात्याला विरोध होता. तिच्या कुटुंबाने कमी वयातच तिचं लग्न करायंच ठरवलं होतं. तेव्हा कुणाशी लग्न करायंच नाही. मला तुमच्यासोबत राहायचंय असं ती म्हणाली आणि घरातून पळून आली. आम्ही एकत्र राहाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, तिच्या कुटुंबांनी तिची हरवल्याची तक्रार केली आणि माझ्यावरच्या संशयातून केस केली. पोलीस तिच्या कुटुंबांच्या बाजूने होते. तिला कुटुंबासमवेत जाण्यासाठी जबरदस्ती करीत होते. मग आम्ही राईट टू लव्ह संस्थेसाठी काम करणा-या अभिजित कांबळे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी अँड विकास शिंदे यांच्याशी बोलणे करुन दिले. पोलिसांचे त्यांच्याशी बोलणे झाल्यानंतर पोलिसांनी माधुरी मर्जीने तिच्यासोबत जाऊ शकते. पण तिच्या कुटुंबियांनी मला मारण्याची धमकी दिली,त्यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे म्हणून आज आम्ही कायदेशीरपणे ‘लिव्ह इन’ मध्ये राहाण्याचा करार केला आहे. आम्ही समाजाचा किंवा पुढं काय होणार याचा विचार केलेला नाही.

आज दोघींनीही ‘लिव्ह इन रिलेशनशीप’ चा करार केला आहे. दोघींनीही सहमतीने एकत्र राहाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना जर कुणाचा दबाव आला किंवा धमकी दिली तर त्यांना संरक्षण देण्यासाठी हा कायदेशीर करार करण्यात आला आहे. दोघींपैकी एकीला कुणी जबरदस्ती घेऊन गेले तर त्यातील एक जण पोलीस किंवा न्यायालयात जाऊन या कराराद्वारे संरक्षण मागू शकते. समलिंगी जोडप्यांना अद्यापही लग्नास कायदेशीर दृष्टीने मान्यता मिळालेली नाही. यासाठी सर्व धर्मांच्या कायद्यात बदल होणे आवश्यक आहे असे अँड विकास शिंदे यांनी सांगितले. 

टॅग्स :marriageलग्नCourtन्यायालयWomenमहिलाrelationshipरिलेशनशिप