शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

पीएमपीचा ताफाही आता येऊ द्या पूर्ण क्षमतेने मार्गांवर;गर्दी टाळण्यासाठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2020 07:15 IST

अनलॉकमध्ये रेल्वे, विमान आणि आता एसटीद्वारे प्रवासी वाहतुक पूर्ण क्षमतेने वाहतुक सुरू केली आहे.

ठळक मुद्देपुण्यातील सार्वजनिक वाहतुकीचा कणा असलेल्या पीएमपी बससेवेला

पुणे : एसटी बसमधूनही पूर्ण क्षमतेने प्रवासी नेण्यास नुकतीच मान्यता मिळाली आहे. रेल्वे, विमान व एसटीच्या वातानुकूलित गाड्यांमधून काही तासांचा प्रवास होतो. पीएमपी बसमधील प्रवास काही मिनिटांचाच असतो. बसमधून प्रवासी सतत चढ-उतार करत असतात. बस कमी असल्याने काही मार्गांवर सकाळी व सायंकाळी गर्दी होते. ही गर्दी टाळण्यासाठी बस वाढवून पूर्ण क्षमतेने वाहतुक सुरू करण्याची मागणी होऊ लागली आहे.

अनलॉकमध्ये रेल्वे तसेच विमानाद्वारे प्रवासी वाहतुक पूर्ण क्षमतेने वाहतुक सुरू आहे. एसटीने तोटा वाढू लागल्याने पूर्ण क्षमतेने प्रवासी घेण्यासाठी राज्य शासनाकडे मान्यता मागितली होती. त्याला हिरवा कंदील मिळाल्यानंतर शुक्रवारपासून एसटीमध्ये सर्व आसनांवर प्रवाशांना बसता येणार आहे. पुण्यातील सार्वजनिक वाहतुकीचा कणा असलेल्या पीएमपी बससेवेला मात्र हे बंधन अद्याप कायम आहे. शहरात कोरोनाबाधित वाढत असल्याचे कारण दिले जात आहे. पण सध्या बस कमी असल्याने काही मार्गांवर गर्दीतून प्रवास करावा लागत आहे. वाहकांकडून प्रवाशांना रोखले जात नाही. जादा बस नसल्याने प्रवासीही मिळेल त्या बसने प्रवास करतात. अशावेळी मार्गावर अधिकाधिक बस आणणे आवश्यक आहे.तसेच बसमध्ये मास्कचा वापर आणि नियमित सॅनिटायझेशन केल्यास पुर्ण क्षमतेने प्रवास शक्य आहे. एसटी, रेल्वे व विमानामध्ये वातानुकूलित यंत्रणा सुरू असते. यामध्ये संसर्गाची शक्यता अधिक असते. हा प्रवास काही तासांचा असूनही त्याला मान्यता आहे. मग पीएमपीचा प्रवास काही मिनिटांचा आणि हवेशीर असूनही मान्यता का दिली जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.------------------कमी बस असल्याने सकाळी व सायंकाळी काही मार्गांवर गर्दी होते. त्यामुळे प्रशासनाने आता नफा-तोट्याचा विचार न करता बस वाढवायला हव्यात. प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हायचा असेल आणि प्रवासी टिकवून ठेवायचे असतील तर सध्या तोटा सहन करायला हवा. बस वाढल्या तर हळु-हळु प्रवासीही वाढत जातील.- निहार थत्ते, प्रवासी------------------पुण्यात संसर्ग वाढत असल्याने पुर्ण क्षमतेने प्रवासी घेणे सध्या शक्य नाही. तसेच काही मार्गांवर गर्दीच्या वेळी बस वाढविल्या जात आहेत. पण प्रवासी प्रवासी वाढत नाहीत. आतापर्यंत सुमारे ५० बस वाढविल्या आहेत.- राजेंद्र जगताप, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी------------------     धायरी, वाघोली, सांगवी, कात्रज, हडपसर अशा काही मार्गांवर बसला गर्दी होते. आम्हीही काही बोलू शकत नाही. बसमध्ये सॅनिटायझर असले तरी गर्दी झाल्यावर उपयोग होत नाही. वाहकांना गर्दीतूनच फिरावे लागते. त्यामुळे अशा मार्गांवर आणखी बसची संख्या वाढवायला हवी, असे काही चालक व वाहकांनी सांगितले.----------

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलpassengerप्रवासीcorona virusकोरोना वायरस बातम्या