शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
2
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
3
Ram Sutar: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
4
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
5
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
6
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
7
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
8
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
9
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
10
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
11
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
12
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
13
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
14
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
15
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
16
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
17
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
18
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
19
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
20
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
Daily Top 2Weekly Top 5

नियोजनाअभावी धरणांत कमी पाणीसाठा

By admin | Updated: March 30, 2017 00:02 IST

दिवसेंदिवस वाढत चाललेली उन्हाची तीव्रता आणि पावसाळा सुरू होण्यास अजून दोन ते अडीच महिने शिल्लक आहेत.

भोर : दिवसेंदिवस वाढत चाललेली उन्हाची तीव्रता आणि पावसाळा सुरू होण्यास अजून दोन ते अडीच महिने शिल्लक आहेत. मात्र, भोर तालुक्यातील भाटघर धरणात फक्त ३० टक्के, तर नीरादेवघर धरणात २६ टक्केच पाणीसाठ शिल्लक आहे. यामुळे धरणभागातील विहिरी, झरे व इतर पाण्याचे स्रोत आटल्यामुळे दोन्ही धरणभागांत पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू झाली आहे. टॅँकर सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. योग्य नियोजनाअभावी गतवर्षीच्या तुलनेत धरणात कमी पाणीसाठा राहिला आहे.मागील वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे भोर तालुक्यातील भाटघर व नीरा-देवघर ही दोन्ही धरणे ७० टक्केच भरली होती. तरीही नीरा-देवघर धरणात गतवर्षी ३२ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. याउलट, या वर्षी दोन्ही धरणे १०० टक्के भरूनही पाण्याच्या योग्य नियोजनाअभावी धरणातील पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत कमी झाला आहे. सध्या दोन्ही धरणांतून बारामती व फलटण या तालुक्यांतील डाव्या व उजव्या कालव्यांना शेतीसाठी १० मार्चपासून नीरा-देवघर धरणातून ७६० क्युसेक्सने, तर भाटघर धरणातून २,००० क्युसेक्सने पाणी नीरा नदीत सोडले आहे. दोन्ही धरणे १०० टक्के भरली होती. नीरा-देवघर धरणातही २६ टक्केच साठा शिल्लक आहे. ५ गावे व ५ वाड्या-वस्त्यांना टॅँकरची गरजनीरा-देवघर धरणभागातील रिंगरोड धारांबे, पऱ्हर खुर्द, पऱ्हर बुद्रुक, निवंगण, धानवली, शिरवली हि. मा., चौधरीवस्ती, मानटवस्ती तर महाड-पंढरपूर रोडवरील शिरगाव, सोमजाईवस्ती, सुईरमाळ, शिळींब, कुंड, कारुंगण यासह अनेक गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू झाली आहे. जवळपास कुठेच पाणी उपलब्ध नसल्याने गावापासून ३ किलोमीटरवर असलेल्या धरणातून पाणी आणण्याशिवाय महिलांकडे कोणताच पर्याय नसल्याने पाण्यासाठी दिवसभर पायपीट सुरू आहे. दर वर्षी उन्हाळ्यात हेच काम महिलांना करावे लागत आहे. भोर पंचायत समितीकडे ५ गावे व ५ वाड्या-वस्त्यांनी टॅँकरची मागणी केली आहे. त्यामुळे त्वरित टॅँकर सुरू करण्याची मागणी लक्ष्मण दिघे व धोंडिबा मालुसरे यांनी केली आहे. पावसाळा सुरू होण्यास अद्याप अडीच महिने बाकी आहेत. तसेच, धरणातील पाणीसाठा अत्यंत कमी झाल्याने दोन्ही धरणभागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.भाटघर धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने धरणात असणाऱ्या विहिरींना पाणी कमी पडत असल्याने हर्णस, जोगवडी, आस्कवडी डेरे, म्हशीवली, कांबरे खुर्द, कुरुंजी यांच्यासह अनेक गावांतील विहिरीतील मोटर बंद पडत आहेत. त्यामुळे अनेक गावांत दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. तर, अनेकदा गाळमिश्रित पाणीपुरवठा होत आहे. दोन मोटरमुळे वीजबिल अधिक प्रमाणात येत आहे. नवीन पाईप घेणे, त्याला वायर व मजुरी ही कामे दर वर्षी उन्हाळ्यात करावी लागतात. मात्र, हे ग्रामपंचायतींना परवडत नाही. - ज्ञानेश्वर नलावडे, उपसरपंच, कुरुंजी