शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
8
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
9
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
10
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
11
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
12
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
13
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
14
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
15
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
16
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
17
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
18
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
19
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
20
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी

नियोजनाअभावी धरणांत कमी पाणीसाठा

By admin | Updated: March 30, 2017 00:02 IST

दिवसेंदिवस वाढत चाललेली उन्हाची तीव्रता आणि पावसाळा सुरू होण्यास अजून दोन ते अडीच महिने शिल्लक आहेत.

भोर : दिवसेंदिवस वाढत चाललेली उन्हाची तीव्रता आणि पावसाळा सुरू होण्यास अजून दोन ते अडीच महिने शिल्लक आहेत. मात्र, भोर तालुक्यातील भाटघर धरणात फक्त ३० टक्के, तर नीरादेवघर धरणात २६ टक्केच पाणीसाठ शिल्लक आहे. यामुळे धरणभागातील विहिरी, झरे व इतर पाण्याचे स्रोत आटल्यामुळे दोन्ही धरणभागांत पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू झाली आहे. टॅँकर सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. योग्य नियोजनाअभावी गतवर्षीच्या तुलनेत धरणात कमी पाणीसाठा राहिला आहे.मागील वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे भोर तालुक्यातील भाटघर व नीरा-देवघर ही दोन्ही धरणे ७० टक्केच भरली होती. तरीही नीरा-देवघर धरणात गतवर्षी ३२ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. याउलट, या वर्षी दोन्ही धरणे १०० टक्के भरूनही पाण्याच्या योग्य नियोजनाअभावी धरणातील पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत कमी झाला आहे. सध्या दोन्ही धरणांतून बारामती व फलटण या तालुक्यांतील डाव्या व उजव्या कालव्यांना शेतीसाठी १० मार्चपासून नीरा-देवघर धरणातून ७६० क्युसेक्सने, तर भाटघर धरणातून २,००० क्युसेक्सने पाणी नीरा नदीत सोडले आहे. दोन्ही धरणे १०० टक्के भरली होती. नीरा-देवघर धरणातही २६ टक्केच साठा शिल्लक आहे. ५ गावे व ५ वाड्या-वस्त्यांना टॅँकरची गरजनीरा-देवघर धरणभागातील रिंगरोड धारांबे, पऱ्हर खुर्द, पऱ्हर बुद्रुक, निवंगण, धानवली, शिरवली हि. मा., चौधरीवस्ती, मानटवस्ती तर महाड-पंढरपूर रोडवरील शिरगाव, सोमजाईवस्ती, सुईरमाळ, शिळींब, कुंड, कारुंगण यासह अनेक गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू झाली आहे. जवळपास कुठेच पाणी उपलब्ध नसल्याने गावापासून ३ किलोमीटरवर असलेल्या धरणातून पाणी आणण्याशिवाय महिलांकडे कोणताच पर्याय नसल्याने पाण्यासाठी दिवसभर पायपीट सुरू आहे. दर वर्षी उन्हाळ्यात हेच काम महिलांना करावे लागत आहे. भोर पंचायत समितीकडे ५ गावे व ५ वाड्या-वस्त्यांनी टॅँकरची मागणी केली आहे. त्यामुळे त्वरित टॅँकर सुरू करण्याची मागणी लक्ष्मण दिघे व धोंडिबा मालुसरे यांनी केली आहे. पावसाळा सुरू होण्यास अद्याप अडीच महिने बाकी आहेत. तसेच, धरणातील पाणीसाठा अत्यंत कमी झाल्याने दोन्ही धरणभागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.भाटघर धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने धरणात असणाऱ्या विहिरींना पाणी कमी पडत असल्याने हर्णस, जोगवडी, आस्कवडी डेरे, म्हशीवली, कांबरे खुर्द, कुरुंजी यांच्यासह अनेक गावांतील विहिरीतील मोटर बंद पडत आहेत. त्यामुळे अनेक गावांत दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. तर, अनेकदा गाळमिश्रित पाणीपुरवठा होत आहे. दोन मोटरमुळे वीजबिल अधिक प्रमाणात येत आहे. नवीन पाईप घेणे, त्याला वायर व मजुरी ही कामे दर वर्षी उन्हाळ्यात करावी लागतात. मात्र, हे ग्रामपंचायतींना परवडत नाही. - ज्ञानेश्वर नलावडे, उपसरपंच, कुरुंजी