शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

नियोजनाअभावी धरणांत कमी पाणीसाठा

By admin | Updated: March 30, 2017 00:02 IST

दिवसेंदिवस वाढत चाललेली उन्हाची तीव्रता आणि पावसाळा सुरू होण्यास अजून दोन ते अडीच महिने शिल्लक आहेत.

भोर : दिवसेंदिवस वाढत चाललेली उन्हाची तीव्रता आणि पावसाळा सुरू होण्यास अजून दोन ते अडीच महिने शिल्लक आहेत. मात्र, भोर तालुक्यातील भाटघर धरणात फक्त ३० टक्के, तर नीरादेवघर धरणात २६ टक्केच पाणीसाठ शिल्लक आहे. यामुळे धरणभागातील विहिरी, झरे व इतर पाण्याचे स्रोत आटल्यामुळे दोन्ही धरणभागांत पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू झाली आहे. टॅँकर सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. योग्य नियोजनाअभावी गतवर्षीच्या तुलनेत धरणात कमी पाणीसाठा राहिला आहे.मागील वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे भोर तालुक्यातील भाटघर व नीरा-देवघर ही दोन्ही धरणे ७० टक्केच भरली होती. तरीही नीरा-देवघर धरणात गतवर्षी ३२ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. याउलट, या वर्षी दोन्ही धरणे १०० टक्के भरूनही पाण्याच्या योग्य नियोजनाअभावी धरणातील पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत कमी झाला आहे. सध्या दोन्ही धरणांतून बारामती व फलटण या तालुक्यांतील डाव्या व उजव्या कालव्यांना शेतीसाठी १० मार्चपासून नीरा-देवघर धरणातून ७६० क्युसेक्सने, तर भाटघर धरणातून २,००० क्युसेक्सने पाणी नीरा नदीत सोडले आहे. दोन्ही धरणे १०० टक्के भरली होती. नीरा-देवघर धरणातही २६ टक्केच साठा शिल्लक आहे. ५ गावे व ५ वाड्या-वस्त्यांना टॅँकरची गरजनीरा-देवघर धरणभागातील रिंगरोड धारांबे, पऱ्हर खुर्द, पऱ्हर बुद्रुक, निवंगण, धानवली, शिरवली हि. मा., चौधरीवस्ती, मानटवस्ती तर महाड-पंढरपूर रोडवरील शिरगाव, सोमजाईवस्ती, सुईरमाळ, शिळींब, कुंड, कारुंगण यासह अनेक गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू झाली आहे. जवळपास कुठेच पाणी उपलब्ध नसल्याने गावापासून ३ किलोमीटरवर असलेल्या धरणातून पाणी आणण्याशिवाय महिलांकडे कोणताच पर्याय नसल्याने पाण्यासाठी दिवसभर पायपीट सुरू आहे. दर वर्षी उन्हाळ्यात हेच काम महिलांना करावे लागत आहे. भोर पंचायत समितीकडे ५ गावे व ५ वाड्या-वस्त्यांनी टॅँकरची मागणी केली आहे. त्यामुळे त्वरित टॅँकर सुरू करण्याची मागणी लक्ष्मण दिघे व धोंडिबा मालुसरे यांनी केली आहे. पावसाळा सुरू होण्यास अद्याप अडीच महिने बाकी आहेत. तसेच, धरणातील पाणीसाठा अत्यंत कमी झाल्याने दोन्ही धरणभागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.भाटघर धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने धरणात असणाऱ्या विहिरींना पाणी कमी पडत असल्याने हर्णस, जोगवडी, आस्कवडी डेरे, म्हशीवली, कांबरे खुर्द, कुरुंजी यांच्यासह अनेक गावांतील विहिरीतील मोटर बंद पडत आहेत. त्यामुळे अनेक गावांत दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. तर, अनेकदा गाळमिश्रित पाणीपुरवठा होत आहे. दोन मोटरमुळे वीजबिल अधिक प्रमाणात येत आहे. नवीन पाईप घेणे, त्याला वायर व मजुरी ही कामे दर वर्षी उन्हाळ्यात करावी लागतात. मात्र, हे ग्रामपंचायतींना परवडत नाही. - ज्ञानेश्वर नलावडे, उपसरपंच, कुरुंजी