शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

खडकवासल्यातून तलावात पाणी सोडा; शेतकऱ्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 00:27 IST

खडकवासला धरण १०० टक्के भरून वाहत असताना खडकवासला धरणासाठी मोठे योगदान देणा-या इंदापूर तालुक्यातील बहुसंख्य तलाव कोरडेठाक पडल्याचे वास्तव आहे.

भिगवण : खडकवासला धरण १०० टक्के भरून वाहत असताना खडकवासला धरणासाठी मोठे योगदान देणा-या इंदापूर तालुक्यातील बहुसंख्य तलाव कोरडेठाक पडल्याचे वास्तव आहे. मदनवाडी तलावात तातडीने पाणी न सोडल्यास सिंचन भवनासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा मदनवाडी तसेच निंबोडी येथील शेतकºयांनी दिला आहे.पर्जन्यमानात दुष्काळी म्हणून गणल्या जाणाºया इंदापूर तालुक्यातील शेतकºयांना खडकवासला धरणावर अवलंबून शेती करावी लागते. यासाठीच धरणनिर्मिती वेळी येथील शेतकºयांनी जमीन देत शेतीसाठी पाणी मिळेल अशी आशा ठेवली होती. मात्र, खडकवासला विभागाकडून शेतकºयांना न्याय मिळत नसल्याचे दिसून येत आहे. धरणक्षेत्रात काही दिवसांपासून होत असलेल्या पावसाने धरणे ओसंडून वाहात आहेत. १०० टक्के भरलेल्या धरणाचे पाणी नदीत सोडले जात असताना कोरड्याठाक पडलेल्या तलावांकडे दुर्लक्ष केले जात आहे.त्यामुळे या भागातील शेती आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न वाढत आहे. पाठीमागील काही वर्षांपूर्वी या भागातील मदनवाडी, पोंधवडी, भादलवाडी तलाव खडकवासल्याच्या माध्यमातून भरले जात होते. त्यामुळे येथील शेतकºयांचे जीवन सुफलाम होते. मात्र, गेल्या चार वर्षांपासून याकडे काणाडोळा केला जात असल्याने शेतकरी हवालदिल झालेले दिसून येत आहेत. त्यामुळे खडकवासला विभागाने चालू वितरणात या भागातील तलाव भरून घ्यावेत अन्यथा या परिसरातील शेतकरी सिंचन भवनासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचे संतोष सोनावणे यांनी निवेदनाद्वारेमाहिती दिली. 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीFarmerशेतकरी