शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
4
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
5
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
6
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
7
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
9
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
10
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
11
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
12
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
13
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
14
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
15
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
16
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
17
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
18
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
19
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
20
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
Daily Top 2Weekly Top 5

खासगी क्षेत्रात बेरोजगारांना आरक्षण द्या : आमदार कपिल पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 14:03 IST

देशात तीन कोटी बेरोजगार नोकरीच्या शोधात आहेत. तर एकट्या महाराष्ट्रात ३८ लाख १९ हजार बेरोजगार आहेत.

ठळक मुद्देसरकारने अँफर्मेटीव्ह कायदा मंजूर करावा सरकारने अँफर्मेटीव्ह अँक्शन कायदा पास करावा. सरकारी नोक-यांमधील 2.5 लाख आणि डीएड -बीएड शिक्षकांची 1.5 लाख रिक्त पदांची भरती सुरुस्पर्धा परीक्षेच्या अंतिम टप्यात अपयशी ठरलेल्या विद्यार्थ्यांना खासगी क्षेत्रात मिळावी संधी

पुणे :  राज्यात २.५ लाख सरकारी पदे रिक्त आहेत. त्यातील  दीड लाख रिक्त पदे ही डीएड, बीएड शिक्षकांची आहेत. टीईटी पास होऊनही भरती नाही. यामुळे सरकारी नोक-यांची वाताहत झाली आहे. खासगी क्षेत्रात ८० टक्के नोक-या आहेत. मात्र त्यात वंचितांचा वाटा कमी आहे. शेतकरी, आदिवासी, मुस्लिम यांना त्यात स्थान नाही. केवळ एकाच वर्गापुरत्या या क्षेत्रातील नोक-या एकवटल्या आहेत. यामुळे खासगी क्षेत्रात बेरोजगारांना आरक्षण मिळावे, अशी मागणी लोकतांत्रिक जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष आमदार कपिल पाटील यांनी केली. बेरोजगारीचे संकट उभे राहिले असताना देशात तीन कोटी बेरोजगार नोकरीच्या शोधात आहेत. तर एकट्या महाराष्ट्रात ३८ लाख १९ हजार बेरोजगार आहेत. या बेरोजगारांना संधी मिळावी याकरिता स्थापन करण्यात आलेल्या अँफर्मेटिव्ह अँक्शन कमिटीची रुपरेषा स्पष्ट करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  पाटील म्हणाले, आपला देश बहुभाषिक, बहुधार्मिक, बहुजाती, बहुवंशी आहे. या बहुसांस्कृतिकतेचं, बहुविविधतेचं प्रतिबिंब मुंंबईतल्या आणि आपल्या राज्यातल्या उद्योगातही दिसणे गरजेचे आहे. याकरिता सर्वांना संधी मिळायला हवी. यामुळे दुर्बल व वंचितांचे कौशल्य, प्रतिभा फुलण्यास मदत होईल. खासगी उद्योग क्षेत्रातल्या म्हणजे कॉर्पोरेटमधल्या उपलब्ध ८० टक्के नोक-या या देशातील १५ टक्के उच्चभ्रु जातीच्या ताब्यात आहे. त्यावर प्रभावी तोडगा शोधण्याची गरज आहे. खासगी उदयोग लोकांच्या पैशातून उभे राहिले आहेत. या उद्योगांना सरकारनेच जमीन, पाणी,वीज अनुदाने आणि सवलती दिल्या आहेत. सार्वजनिक बँकांच्या पैशातून त्यांचे भांडवल निर्माण झाले आहे. हा पैसा राबणा-या जनतेच्या घामाचा आहे. त्या घामाच्या पैशातून उभ्या राहिलेल्या उद्योगांनी घाम गाळणा-या घरातल्या तरुणांना नोक-या का दिल्या जात नाही. असा सवाल पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.  शनिवारी जिल्हाधिका-यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देवून मुख्यमंत्र्यांना देखील त्या निवेदनाची प्रत पाठविण्यात येणार आहे. तसेच जिल्हास्तरीय बैठकांचे आयोजन करण्यात येणार असून मागण्यांकरिता तीव स्वरुपाचा लढा उभारणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी सामाजिक कार्यक र्ते सुभाष वारे, निलेश निंबाळकर, शरद कोकाटे, अजित शिंदे, कुलदीप आंबेकर आदी उपस्थित होते. * प्रमुख मागण्या - कॉर्पोरेट क्षेत्रात लोअर टू टॉप मँनेजमेंटमध्ये एससी, एसटी, व्हीजे एनटी, ओबीसी, मुस्लिम तसेच शेतकरी जाती - मराठा, लिंगायत आदी आणि दिव्यांग, अनाथ या प्रवर्गातील उमेदवारांना नोक-या द्याव्यात. - सरकारने अँफर्मेटीव्ह अँक्शन कायदा पास करावा. - सरकारी नोक-यांमधील 2.5 लाख आणि डीएड -बीएड शिक्षकांची 1.5 लाख रिक्त पदांची भरती सुरु करावी. - नोकरकपात आणि कंत्राटी पध्दत बंद करावी. - स्पर्धा परीक्षेच्या अंतिम टप्यात अपयशी ठरलेल्या विद्यार्थ्यांना खासगी क्षेत्रात संधी मिळावी. 

टॅग्स :Puneपुणेreservationआरक्षणjobनोकरीGovernmentसरकार