शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

राजकीय फायद्यासाठी नेते महाराष्ट्र अन् कर्नाटक वाद उकरून काढतात : डॉ. एस. एल. भैरप्पा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 09:22 IST

नॅशनल बुक ट्रस्ट, पुणे पुस्तक महोत्सव आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या वतीने बुधवारी (दि. ३) डॉ. भैरप्पा यांच्या पाच दशकांतील साहित्यातील योगदान संवादातून उलगडले...

पुणे :महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये भाषेच्या देवाण-घेवाणीतून एक अनुबंध तयार झाला आहे. दोन्ही राज्यांच्या संस्कृतीत फारसा फरक नाही. केवळ राजकीय नेते निवडणुका तोंडावर आल्या की, महाराष्ट्र आणि कर्नाटक वाद उकरून काढतात. इतर वेळी शांतता असते, अशा शब्दांत थेट नामोल्लेख न करता बेळगाव सीमा प्रश्नावरील वादावर ज्येष्ठ कन्नड लेखक डॉ. एस. एल. भैरप्पा यांनी भाष्य केले.

नॅशनल बुक ट्रस्ट, पुणे पुस्तक महोत्सव आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या वतीने बुधवारी (दि. ३) डॉ. भैरप्पा यांच्या पाच दशकांतील साहित्यातील योगदान संवादातून उलगडले. यावेळी ज्येष्ठ अनुवादक डॉ. उमा कुलकर्णी, भैरप्पा यांच्या साहित्याच्या अभ्यासक डॉ. उमा रामराव, 'कशीर' कादंबरीच्या लेखिका सहना विजयकुमार यांनी भैरप्पा यांच्याशी संवाद साधला.

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. समर्थ युवा फाउंडेशनचे संस्थापक आणि पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी भैरप्पा यांचा पुणेरी, पगडी, शाल आणि सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार केला. यावेळी साहित्य अकादमी समितीचे सदस्य डॉ. नरेंद्र पाठक उपस्थित होते.

सुरुवातीलाच भैरप्पा यांनी मी कोणतीही कादंबरी अभ्यास, संशोधन, वाचन आणि प्रवास केल्याशिवाय लिहू शकत नसल्याचे सांगितले. मी जन्मतःच सृजनशील लेखक आहे. माझ्या साहित्यात ९० टक्के सृजनशीलता आणि १० टक्के वास्तववादी चित्रण असते. विद्यापीठांमध्ये प्राध्यापक भरतमुनींचे नाट्यशास्त्र वगैरे शिकवू शकतात. परंतु सृजनशील लेखक निर्माण करू शकत नाहीत, अशी खंतही भैरप्पा यांनी व्यक्त केली.

मी जन्मतः भारतीय आहे. त्यामुळे माझे विचार आणि तत्त्व भारतीय असतील तर मी इंग्रजी साहित्याच्या प्रथा-परंपरा का पाळाव्यात? , या माझ्या प्रश्नाला टीकाकारांकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. कायम वाचकच माझ्या लेखनाची प्रेरणा ठरले. माझ्या लेखनाला याच वाचकांचे बळ मिळते. त्यामुळे माझ्या कांदबरी लेखनाच्या टीकेची मी फारशी पर्वा करीत नाही अशा शब्दात त्यांनी टीकाकारांना उत्तर दिले.

यावेळी डॉ. उमा रामराव आणि सहना विजयकुमार यांनी त्यांना लाभलेला डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्याबरोबरचा सहवास आणि आठवणींना उजाळा दिला. साहित्य अकादमी समितीचे सदस्य डॉ. नरेंद्र पाठक यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समर्थ युवा फाउंडेशनचे संस्थापक आणि पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी केले. संजय चाकणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रसिद्ध निवेदक मिलिंद कुलकर्णी यांनी भैरप्पा यांचा परिचय करून दिला. प्रसेनजीत फडणवीस यांनी आभार मानले.

 

-----------------

 

चौकट

 

... त्यांचा मोठेपणा म्हणजे माझाच सन्मान

 

मराठी साहित्यातील ज्येष्ठ संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांना पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर तो कोणाकडून स्वीकारणार असे त्यांना विचारण्यात आले. त्यात मुख्यमंत्र्यासह विविध क्षेत्रातील दिग्गजांची नावे सुचविण्यात आली. पण सर्व नावे नाकारून त्यांनी भैरप्पा यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारायला आवडेल असे सांगितले. त्यांचा हा मोठेपणा म्हणजे माझाच सन्मान होता, असे मी मानतो अशी भावना डॉ. एस. एल. भैरप्पा यांनी व्यक्त केली.

 

-------------------------

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटक