शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

विधीमंडळ अधिवेशनाकडे निघालेल्या कर्णबधीर मोर्चावर पुण्यात पोलिसांचा लाठीचार्ज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2019 16:20 IST

विविध मागण्यांसाठी मुंबईला निघालेल्या कर्णबधीर व्यक्तींच्या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना पुण्यात घडली आहे. 

पुणे : विविध मागण्यांसाठी मुंबईला निघालेल्या कर्णबधीर व्यक्तींच्या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना पुण्यात घडली आहे. 

             याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील समाज कल्याण विभागाच्या कार्यालयापासून ते मुंबईत आजपासून  झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात कर्णबधीर व्यक्ती त्यांच्या मागण्यांसाठी मोर्चा काढणार होत्या. या मोर्चात सुमारे एक हजार कर्णबधीर सहभागी झाले होते. मात्र पोलिसांनी या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून संतप्त विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन सुरु केले आहे. मात्र नेमक्या कुठल्या कारणाने लाठीचार्ज करण्यात आला याचा उलगडा अद्याप झालेला नाही. 

            मागण्या सांगताना मोर्चेकरी म्हणाले की, महाराष्ट्रात १८ लाख कर्णबधीर आहेत. सरकार आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहेत. मुळात आम्ही अपंग किंवा अंध नसून कर्णबधीर आहोत. आमची भाषा समजू शकणारे लोक खूप कमी आहेत. आम्ही इंजिनिअरिंगसारखे व्यावसायिक शिक्षण घेण्यास तयार असताना भाषेचा अडसर असल्याने आम्हाला घेता येत नाही. अशा परिस्थितीत सरकारकडून मात्र भाषा दुभाजक देण्याची तयारीही दाखवली जात नाही. पोलिसांनी मात्र लाठीचार्ज झाला नसल्याचा पवित्रा घेतला आहे . पोलीस  आंदोलकांशी बोलत होते. पण भाषेच्या अडसरामुळे काहीही लक्षात घेत नव्हते अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुजावर यांनी दिली. 

टॅग्स :PoliceपोलिसSocial Welfare office Puneपुणे समाजकल्याण विभाग