शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

स्वाधार योजनेचा गुरुवारी शेवटचा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 21:33 IST

एकाही विद्यार्थ्याला योजनेच्या लाभाची रक्कम न मिळाल्याचे वास्तव ‘लोकमत’ने समोर आणले. त्यावर समाज कल्याण विभागातर्फे येत्या १५ मार्चपर्यंत अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली .

ठळक मुद्देवसतिगृह न मिळालेल्या विद्यार्थ्यांना शहरात राहून शिक्षण घेता यावे, उद्देशाने स्वाधार योजना सुरू मागील वर्षातील अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना मार्च अखेरपर्यंत रक्कम

पुणे: राज्याच्या समाज कल्याण विभागातर्फे राबविल्या जात असलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज भरण्याचा गुरूवारी अंतिम (दि.१५) दिवस आहे. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा,असे आवाहन समाज कल्याण विभागातर्फे करण्यात आले आहे. तसेच अद्याप ज्या विद्यार्थ्यांच्या खात्यात योजनेची रक्क्म जमा झाली नाही; त्यांना मार्च अखेरपर्यंत लाभाची रक्कम दिली जाईल,असेही समाज कल्याणच्या वरिष्ठ अधिका-यांकडून सांगितले जात आहे. राज्यात मागासवर्गीय मुलांसाठी ४४१ शासकीय वसतिगृह असून त्यापैकी मुलांची २३४ आणि मुलींची २०७ वसतिगृह आहेत. त्यापैकी २२४ वसतिगृहे शासकीय तर २१७ भाडेतत्त्वावरील इमारतीत आहेत. वसतिगृहातील मुलांची मान्य संख्या २१,६२० असून मुलींची मान्य संख्या १९ हजार ८६० अशी एकूण ४१ हजार ४८० आहे. परंतु, दिवसेंदिवस उच्च शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याने सर्वच विद्यार्थ्यांना वसतिगृह उपलब्ध होत नाही. वसतिगृह न मिळालेल्या विद्यार्थ्यांना शहरात राहून शिक्षण घेता यावे, उद्देशाने स्वाधार योजना सुरू करण्यात आली.मात्र,एकाही विद्यार्थ्याला योजनेच्या लाभाची रक्कम न मिळाली नसल्याचे वास्तव ‘लोकमत’ने समोर आणले. त्यावर समाज कल्याण विभागातर्फे येत्या १५ मार्चपर्यंत अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली आहे. सर्व विद्यार्थ्यांना तत्काळ वसतिगृह उभे करून त्यात प्रवेश देण्यात मर्यादा असल्याने अनुसुचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे,यासाठी स्वाधार योजना राबविली जात आहे.समाज कल्याण विभागाकडे २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात ३ हजार ३६२ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.त्यातील १ हजार ६८० विद्यार्थ्यांच्या खात्यात लाभाची रक्कम जमा झाली आहे. तसेच ७६८ विद्यार्थ्यांचे बिल शासकीय कोषागारात ( ट्रेझरीत) आहे.तसेच २०१७-१८ वर्षासाठी ३ हजार ८६४ विद्यार्थी पात्र झाले असून त्यातील केवळ ३९ विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा झाली आहे. मात्र,अजूनही ३ हजार ५४९ विद्यार्थी योजनच्या लाभाच्या प्रतिक्षेत आहेत.----------------------विद्यार्थ्यांना स्वाधारसाठी अर्ज करण्यास १५ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे.मागील वर्षातील अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना मार्च अखेरपर्यंत रक्कम दिली जाईल.तसेच येत्या यंदा अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना निधी देण्याची प्रक्रिया सुरू आहे.तसेच सर्व विद्यार्थ्यांना डिसेंबर अखेरपर्यंत लाभाची रक्कम देण्यात दिली जाईल.- माधव वैद्य,सह आयुक्त, समाज कल्याण विभाग (शिक्षण) 

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीState Governmentराज्य सरकार