शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Malshej Ghat: दरड कोसळण्याच्या घटना वारंवार; पर्यटकांना बंदी, माळशेज घाटात शुकशुकाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 12:51 IST

माळशेज भागातील आदिवासींच्या पावसाळी व्यवसायांवर गदा आली असून, उपासमारीची वेळ

उदापूर : नगर-कल्याण महामार्गावरील निसर्गरम्य माळशेज घाटात धुवाधार पाऊस रोज हजेरी लावत असल्यामुळे घाट हिरवळीने नटला आहे, तर धबधबे काही प्रमाणात चालू झाले आहेत. त्यामुळे घाटातील विलोभनीय दृश्य डोळ्यांत साठवून उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्यांखाली चिंब भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी दरवर्षी पावसाळ्यात पर्यटक माळशेज घाटात हजारोंच्या संख्येने गर्दी करीत असतात. मात्र, ठाणे जिल्हाधिकारी यांनी यावर्षी मनाई आदेश लागू केल्याने पर्यटकांनी घाटाकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे भागातील आदिवासींच्या पावसाळी व्यवसायांवर गदा आली असून, उपासमारीची वेळ आली आहे.

माळशेज घाटातील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी पावसाळ्यात पर्यटकांचा कल हळूहळू वाढत होता. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे येथील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना रोजगार उपलब्ध होत होता. परंतु दमदार पावसाळ्यात माळशेज घाट परिसरात दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असल्यामुळे व अपघाताचे प्रमाण वाढत असल्यामुळे माळशेज घाट अपघाती क्षेत्र म्हणूनही प्रसिद्ध झाले आहे.

पर्यटनस्थळी नशेबाज तरुणांचा धुडगूस ही चिंतेची बाब आहे. भरीस भर म्हणून धोकादायक क्षेत्रात नको ते स्टंट करणारे महाभाग पर्यटनाला गालबोट लावताना आढळत आहेत. शिवाय अपघातांना आपसूकच निमंत्रण मिळत असल्यामुळे यावर्षी अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, ठाणे जिल्हाधिकारी यांनी घाटात येणाऱ्या पर्यटकांना मनाई आदेश दिले आहेत. याचाच परिणामी, घाटात शुकशुकाट दिसून येत आहे. पर्यटकांनी यंदा माळशेज घाटाकडे पाठ फिरविल्याने येथील आदिवासी व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आदिवासींचा पावसाळी रोजगार पूर्णपणे कोलमडला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे टोकावडे (जि. ठाणे) पोलिस स्टेशनच्या वतीने खडा पहारा देण्यात येत आहे. टोकावडे पोलिस स्टेशनचे सहायक निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात १८ पोलिस कर्मचारी व दोन अधिकारी चोख बंदोबस्त बजावत आहेत. धोकादायकपणे पर्यटन करणाऱ्या लोकांवर पोलिसांची करडी नजर आहे. घाट चढून आल्यावर ओतूर पोलिस स्टेशनची हद्द सुरू होते. ओतूर पोलिस स्टेशनचे सहायक निरीक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनात पोलिस कर्मचारी अप्रिय घटना टाळण्यासाठी डोळ्यांत तेल घालून खडा पहारा देत आहेत.

''माळशेज घाटात पर्यटकांना मनाई आदेशामुळे पर्यटक घाटात फिरकायला तयार नाही. याचा परिणाम आम्हा छोट्या-मोठ्या व्यावसायिकांवर झाला असून, आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अत्यल्प भांडवलात सुरू केलेल्या व्यवसायातून सुमारे रोज ५०० रुपये मिळतात. आता घाटात पर्यटक फिरकत नसल्याने व्यवसायाला चालना मिळात नसल्याने आमचे संपूर्ण वर्षाचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. -विठ्ठल पारधी, जगन कोकणे. व्यावसायिक, माळशेज घाट.'' 

टॅग्स :Puneपुणेtourismपर्यटनRainपाऊसGovernmentसरकारFortगड