शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

Malshej Ghat: दरड कोसळण्याच्या घटना वारंवार; पर्यटकांना बंदी, माळशेज घाटात शुकशुकाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 12:51 IST

माळशेज भागातील आदिवासींच्या पावसाळी व्यवसायांवर गदा आली असून, उपासमारीची वेळ

उदापूर : नगर-कल्याण महामार्गावरील निसर्गरम्य माळशेज घाटात धुवाधार पाऊस रोज हजेरी लावत असल्यामुळे घाट हिरवळीने नटला आहे, तर धबधबे काही प्रमाणात चालू झाले आहेत. त्यामुळे घाटातील विलोभनीय दृश्य डोळ्यांत साठवून उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्यांखाली चिंब भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी दरवर्षी पावसाळ्यात पर्यटक माळशेज घाटात हजारोंच्या संख्येने गर्दी करीत असतात. मात्र, ठाणे जिल्हाधिकारी यांनी यावर्षी मनाई आदेश लागू केल्याने पर्यटकांनी घाटाकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे भागातील आदिवासींच्या पावसाळी व्यवसायांवर गदा आली असून, उपासमारीची वेळ आली आहे.

माळशेज घाटातील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी पावसाळ्यात पर्यटकांचा कल हळूहळू वाढत होता. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे येथील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना रोजगार उपलब्ध होत होता. परंतु दमदार पावसाळ्यात माळशेज घाट परिसरात दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असल्यामुळे व अपघाताचे प्रमाण वाढत असल्यामुळे माळशेज घाट अपघाती क्षेत्र म्हणूनही प्रसिद्ध झाले आहे.

पर्यटनस्थळी नशेबाज तरुणांचा धुडगूस ही चिंतेची बाब आहे. भरीस भर म्हणून धोकादायक क्षेत्रात नको ते स्टंट करणारे महाभाग पर्यटनाला गालबोट लावताना आढळत आहेत. शिवाय अपघातांना आपसूकच निमंत्रण मिळत असल्यामुळे यावर्षी अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, ठाणे जिल्हाधिकारी यांनी घाटात येणाऱ्या पर्यटकांना मनाई आदेश दिले आहेत. याचाच परिणामी, घाटात शुकशुकाट दिसून येत आहे. पर्यटकांनी यंदा माळशेज घाटाकडे पाठ फिरविल्याने येथील आदिवासी व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आदिवासींचा पावसाळी रोजगार पूर्णपणे कोलमडला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे टोकावडे (जि. ठाणे) पोलिस स्टेशनच्या वतीने खडा पहारा देण्यात येत आहे. टोकावडे पोलिस स्टेशनचे सहायक निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात १८ पोलिस कर्मचारी व दोन अधिकारी चोख बंदोबस्त बजावत आहेत. धोकादायकपणे पर्यटन करणाऱ्या लोकांवर पोलिसांची करडी नजर आहे. घाट चढून आल्यावर ओतूर पोलिस स्टेशनची हद्द सुरू होते. ओतूर पोलिस स्टेशनचे सहायक निरीक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनात पोलिस कर्मचारी अप्रिय घटना टाळण्यासाठी डोळ्यांत तेल घालून खडा पहारा देत आहेत.

''माळशेज घाटात पर्यटकांना मनाई आदेशामुळे पर्यटक घाटात फिरकायला तयार नाही. याचा परिणाम आम्हा छोट्या-मोठ्या व्यावसायिकांवर झाला असून, आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अत्यल्प भांडवलात सुरू केलेल्या व्यवसायातून सुमारे रोज ५०० रुपये मिळतात. आता घाटात पर्यटक फिरकत नसल्याने व्यवसायाला चालना मिळात नसल्याने आमचे संपूर्ण वर्षाचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. -विठ्ठल पारधी, जगन कोकणे. व्यावसायिक, माळशेज घाट.'' 

टॅग्स :Puneपुणेtourismपर्यटनRainपाऊसGovernmentसरकारFortगड