शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

यशवंत साखर कारखान्याची जमीन अडीच कोटींची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 21:22 IST

जमिनीची बाजारभावाने मिळणारी किंमत धरल्यास कारखान्याला कर्ज मिळणे शक्य होईल. त्यामुळे कारखाना पुनर्जीवित होऊ शकेल...

ठळक मुद्देपुनरुज्जीवन अहवाल : कारखान्याकडे आहे २४८ एकरचा भूखंड

पुणे : थेऊरच्या यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवन पाहणी अहवालात कारखान्याच्या तब्बल अडीचशे एकर जमिनीची पुस्तकी किंमत अवघी दोन कोटी ५१ लाख रुपये दाखविण्यात आले आहे. विशेष लेखापरिक्षकाने केलेल्या पाहणीत केवळ १२१ एकर जमिनीचे बाजार मूल्य अडीचशे कोटी रुपये दाखविले आहे. जमिनीची बाजारभावाने मिळणारी किंमत धरल्यास कारखान्याला कर्ज मिळणे शक्य होईल. त्यामुळे कारखाना पुरुज्जीवीत होऊ शकेल अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतली आहे.  शहराच्या हद्दी पासुन दहा किलोमीटरवर ३५०० टन ऊसाची गाळप क्षमता असलेल्या या साखर कारखान्याची उभारणी १९६६ साली वीस हजार शेतकºयांनी केली. साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने ऊसाचे देणे दिले नाही म्हणुन सरकारने एप्रिल २०११ रोजी कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती केली. ताबा घेतेवेळी यशवंतवर राज्य सहकारी बँकेचे १८ कोटी रुपये कर्ज होते व त्या पोटी २४८ एकर जमीन तसेच कारखाना व डिस्टलरी तारण होते.कारखाना ताब्यात घेतल्यानंतर तो सुरु करण्यात सरकार अपयशी ठरले. त्यानंतर १९ सप्टेंबर २०१७ रोजी कारखाना अंतरीम अवसायनात काढला. त्यास शेतकºयांनी हरकत घेत, लोक वर्गणीतून कारखाना चालविण्याची तयारी दर्शविली. त्यानंतरही १६ नोव्हेंबर २०१७ रोजी यशवंत कारखाना कायम स्वरुपी अवसायनात काढण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्या पुर्वी २ नोव्हेंबरला कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी मुंबईत मंत्रालयात बैठक बोलावण्यात आली होती. बंद पडलेले सहकारी साखर कारखाने पुन्हा सुरु व्हावे या करीता मुख्यमंत्र्यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला अहवाल सादर करण्यास सांगितले. त्यात २४८ एकर जमिनीचे मूल्य अडीच कोटी दाखविले आहे. कारखान्याचे नकत मूल्य उणे ११९ कोटी रुपये दाखविण्यात आले, तसेच संचित तोटा १३८ कोटी दाखविण्यात आला. कारखाना २०११ मधे बंद पडला. त्यावेळी मुल्य उणे ३१ कोटी तसेच संचित तोटा ५० कोटी होता व शासनाने कब्जा केल्यावर मूल्यात तसेच तोटा वाढल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते योगेश पांडे म्हणाले. राज्य सहकारी बँकेला व्याजासह २८ कोटी रुपयांचे देणे आहे. मात्र, त्यांनी ३०० कोटी रुपयांची जमीन ताब्यात घेतली आहे. त्यांनी त्यांचे कर्ज वसूल करण्याइतकी जमीन विक्री करणे अपेक्षित असल्याचे पांडे म्हणाले. ......................संस्था अवसायानात काढताना तिच्या स्थावर मालमत्तेचे बाजारभावानुसारचे मूल्य ग्राह्य धरले पाहीजे. तसे झाले असते तर यशवंत कारखान्याचे नक्त मूल्य वाढले असते. त्यामुळे कारखाना पुनरुज्जीवीत करणे शक्य झाले असते. कारखान्याच्या १२१ एकरची किंमत बाजारभावानुसार अडीचश्े कोटी रुपये होत असेल तर अडीचशे एकरनुसार कारखान्याचे मूल्य आणखी वाढेल. योगेश पांडे, प्रवक्ते स्वाभिमानी शेतकरी संघटना

 

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखाने