शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

यशवंत साखर कारखान्याची जमीन अडीच कोटींची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 21:22 IST

जमिनीची बाजारभावाने मिळणारी किंमत धरल्यास कारखान्याला कर्ज मिळणे शक्य होईल. त्यामुळे कारखाना पुनर्जीवित होऊ शकेल...

ठळक मुद्देपुनरुज्जीवन अहवाल : कारखान्याकडे आहे २४८ एकरचा भूखंड

पुणे : थेऊरच्या यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवन पाहणी अहवालात कारखान्याच्या तब्बल अडीचशे एकर जमिनीची पुस्तकी किंमत अवघी दोन कोटी ५१ लाख रुपये दाखविण्यात आले आहे. विशेष लेखापरिक्षकाने केलेल्या पाहणीत केवळ १२१ एकर जमिनीचे बाजार मूल्य अडीचशे कोटी रुपये दाखविले आहे. जमिनीची बाजारभावाने मिळणारी किंमत धरल्यास कारखान्याला कर्ज मिळणे शक्य होईल. त्यामुळे कारखाना पुरुज्जीवीत होऊ शकेल अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतली आहे.  शहराच्या हद्दी पासुन दहा किलोमीटरवर ३५०० टन ऊसाची गाळप क्षमता असलेल्या या साखर कारखान्याची उभारणी १९६६ साली वीस हजार शेतकºयांनी केली. साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने ऊसाचे देणे दिले नाही म्हणुन सरकारने एप्रिल २०११ रोजी कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती केली. ताबा घेतेवेळी यशवंतवर राज्य सहकारी बँकेचे १८ कोटी रुपये कर्ज होते व त्या पोटी २४८ एकर जमीन तसेच कारखाना व डिस्टलरी तारण होते.कारखाना ताब्यात घेतल्यानंतर तो सुरु करण्यात सरकार अपयशी ठरले. त्यानंतर १९ सप्टेंबर २०१७ रोजी कारखाना अंतरीम अवसायनात काढला. त्यास शेतकºयांनी हरकत घेत, लोक वर्गणीतून कारखाना चालविण्याची तयारी दर्शविली. त्यानंतरही १६ नोव्हेंबर २०१७ रोजी यशवंत कारखाना कायम स्वरुपी अवसायनात काढण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्या पुर्वी २ नोव्हेंबरला कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी मुंबईत मंत्रालयात बैठक बोलावण्यात आली होती. बंद पडलेले सहकारी साखर कारखाने पुन्हा सुरु व्हावे या करीता मुख्यमंत्र्यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला अहवाल सादर करण्यास सांगितले. त्यात २४८ एकर जमिनीचे मूल्य अडीच कोटी दाखविले आहे. कारखान्याचे नकत मूल्य उणे ११९ कोटी रुपये दाखविण्यात आले, तसेच संचित तोटा १३८ कोटी दाखविण्यात आला. कारखाना २०११ मधे बंद पडला. त्यावेळी मुल्य उणे ३१ कोटी तसेच संचित तोटा ५० कोटी होता व शासनाने कब्जा केल्यावर मूल्यात तसेच तोटा वाढल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते योगेश पांडे म्हणाले. राज्य सहकारी बँकेला व्याजासह २८ कोटी रुपयांचे देणे आहे. मात्र, त्यांनी ३०० कोटी रुपयांची जमीन ताब्यात घेतली आहे. त्यांनी त्यांचे कर्ज वसूल करण्याइतकी जमीन विक्री करणे अपेक्षित असल्याचे पांडे म्हणाले. ......................संस्था अवसायानात काढताना तिच्या स्थावर मालमत्तेचे बाजारभावानुसारचे मूल्य ग्राह्य धरले पाहीजे. तसे झाले असते तर यशवंत कारखान्याचे नक्त मूल्य वाढले असते. त्यामुळे कारखाना पुनरुज्जीवीत करणे शक्य झाले असते. कारखान्याच्या १२१ एकरची किंमत बाजारभावानुसार अडीचश्े कोटी रुपये होत असेल तर अडीचशे एकरनुसार कारखान्याचे मूल्य आणखी वाढेल. योगेश पांडे, प्रवक्ते स्वाभिमानी शेतकरी संघटना

 

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखाने