शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

बनावट कागदपत्रांद्वारे जमीन लाटली; तिघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 02:51 IST

तलाठ्याला हाताशी धरून ६० वर्षांपूर्वी निधन झालेल्या महिलेचे वारसदार असल्याचे बनावट कागदपत्रे तयार करून गोंदी (ता. इंदापूर) येथील जमीन लाटल्याच्या आरोपावरून तीन जणांविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

इंदापूर  - तलाठ्याला हाताशी धरून ६० वर्षांपूर्वी निधन झालेल्या महिलेचे वारसदार असल्याचे बनावट कागदपत्रे तयार करून गोंदी (ता. इंदापूर) येथील जमीन लाटल्याच्या आरोपावरून तीन जणांविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.दत्तात्रय देशमुख, अंगद देशमुख, राहुल देवरे (सर्व रा. गोंदी, ता. इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत. रणजित बाळासाहेब जाधव (वय २८, रा, गोंदी, ता. इंदापूर) यांनी फिर्याद दिली आहे.पोलिसांनी सांगितले, की गोंदी गाव जमीन गट नं.८६ मधील सातबारा पत्रकी फिर्यादीच्या नावावर एक हेक्टर क्षेत्र आहे. प्राजक्ता रणजित जाधव, प्रताप बाळासाहेब जाधव, इंदूमती बाळासाहेब जाधव, उत्तम यशवंत जाधव यांच्या नावे उर्वरित क्षेत्र आहे. सदर जमीन गटाच्या इतर अधिकारामध्ये अंजनाबाई रामा देशमुख यांची पोकळस्त नोंद आहे. त्या ६० वर्षांपूर्वी मयत झाल्या आहेत. या जमिनीमध्ये त्यांचा पूर्वीपासून कोणत्याही प्रकारचा हक्क नव्हता. त्यांना जवळचे कोणी नातेवाईक नव्हते. दि.२७ जुलै २०१७ रोजी फिर्यादीने गोंदी येथील गाव कामगार तलाठ्याकडे या जमिनीच्या गटात कोणतीही वारस नोंद घेऊ नये, अशा आशयाचा अर्ज दिला होता. या पार्श्वभूमीवर आरोपींनी वारसांच्या नावे साखर कारखान्याचे शेअर्स करावयाचे आहेत, असे सांगून दत्तात्रय नारायण देशमुख, भागवत नारायण देशमुख, कृत्त्विक नारायण देशमुख, रघुनाथ नारायण देशमुख, विमल नारायण देशमुख, लिलावती भारत पवार, मीराबाई महादेव जाधव, कौशल्या सौदागर काटकर आदींच्या सह्या घेतल्या. त्याचा वापर करून दि. १ डिसेंबर २०१७ रोजी तहसील कार्यालयात जाऊन हे सर्वजण अंजनाबाई देशमुख याचे वारस असल्याचे बनावट प्रतिज्ञापत्रतयार केले.गोंदीचे गावकामगार तलाठी राहुल देवरे यांनी वारसदारांची कसलीही स्थानिक चौकशी न करता नारायण पांडुरंग देशमुख यांच्या आठ वारसांची नोंद केली, अशा आशयाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हा