शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

कृषि संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी ‘कृषक’ उपयुक्त - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 18:05 IST

शेती फायद्याची होण्यासाठी कृषि संशोधन महत्वाचे असून शेतकऱ्यांना कृषकच्या माध्यमातून उपयुक्त माहिती उपलब्ध होइल

बारामती : संपुर्ण जगात शेतीक्षेत्रात मोठे बदल होत आहेत. वेगवेगळे आधुनिक संशोधन सुरु आहे. ते संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार असेल तरच हे संशोधन उपयोगी ठरणार आहे. हे संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी ‘कृषक’ अत्यंत उपयुक्त आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आधुनिक शेतीकडे वळण्याचा संदेश दिला.

बारामती येथील कृषि विकास प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित जागतिक स्तरावरील कृषक या कृषि प्रदर्शनाचे उदघाटन पवार यांच्यासह कर्नाटकचे कृषिमंत्री एन चेलुवरय्या स्वामी यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी पवार पुढे म्हणाले, राजेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षांपासून प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. यातून शेतकऱ्यांना महत्वाची माहिती मिळते. शेती फायद्याची होण्यासाठी कृषि संशोधन महत्वाचे आहे. शेतकऱ्यांना कृषकच्या माध्यमातून उपयुक्त माहिती उपलब्ध होइल, असे पवार यांनी नमुद केले.

कृषिमंत्री एन चेलुवरय्या स्वामी म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे देशातील कृषि क्षेत्राच्या विकासासाठी मोठे योगदान आहे. त्यांच्याच प्रयत्नामुळे देशाने कृषि व उद्यानविद्या क्षेत्रात आमुलाग्र बदल झाले.अन्नधान्य आयात करणारा देश अन्यधान्य निर्यात करणारा बनल्याचे कृषिमंत्री स्वामी यांनी नमुद केेले.

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘अे आय’ तंत्रज्ञानावर आधारीत शेती संशोधन बारामतीत सुरु होत आहे,हे अभिमानास्पद आहे. येत्या वर्षात आपल्या भागात या तंत्राानामुळे क्रांती होइल,असे खासदार सुळे म्हणाल्या. 

ब्राझीलमध्ये १७० ते २०० टन उस उत्पादन

‘अेआय’ तंत्रज्ञान ऊसशेतीसाठी उपयुक्त ठरणार आहे.महाराष्ट्र देशात उसउत्पादनात अग्रेसर आहे.मात्र, ऊसउत्पादनात अनेक अडचणी आहेत. याबाबत बळीराजासमोर अनेक संकटे आहेत.आपल्याकडे ऊस उत्पादन सरासरी ४० ते ५० टन आहे,तर हेच उत्पादन ब्राझीलमध्ये एकरी १७० ते २०० टनावर पोहचले आहे.‘अे आय’तंत्रज्ञानामुळे हे शक्य झाल्याचे कृषि विकास प्रतिष्ठानचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीSharad Pawarशरद पवारtechnologyतंत्रज्ञानSupriya Suleसुप्रिया सुळेBaramatiबारामती