शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

कोयनेच्या जंगलातील किल्ला "वार्क्षदुर्ग वासोटा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2022 15:13 IST

वासोटा उर्फ व्याघ्रगड आपल्याला लक्षात राहतो, तो मुळात कोयनेच्या जंगलातील किल्ला म्हणून

गणेश खंडाळे                                                                                                           

वासोटा उर्फ व्याघ्रगड आपल्याला लक्षात राहतो, तो मुळात कोयनेच्या जंगलातील किल्ला म्हणून. नंतर लक्षात राहतो, तो ताई तेलीण या पेशवाईला डोकेदुखी ठरलेल्या रणधुरंदर स्त्रीमुळे. मोठमोठे वृक्ष काटेरी झाडे, वेली, बांबूची बेटे यांनी व्यापलेला गच्च वनात असलेला किल्ला याला स्मृतींमध्ये वार्क्षदुर्ग असे म्हटले गेले आहे. शिवभारत या ग्रंथातल्या सहाव्या अध्यायात गिरीदुर्ग, वनदुर्ग, जलदुर्ग व स्थलदुर्ग यांचे वर्णन येते. रामायण काळातही वार्क्षदुर्ग आढळतात. कोकण आणि देश यांच्या सरहद्दीवर उभ्या असलेल्या वासोट्याला या दोन्ही ठिकाणांवरून जाता येते. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून समांतरपणे दक्षिणोत्तर अशी बामणोलीची उपडोंगररांग धावते. या दोन डोंगररांगांमध्ये कोयनानगरच्या शिवसागर जलाशयाचे पाणी (बॅकवॉटर अगदी तापोळ्यापर्यंत, म्हणजे ५०-६० किलोमीटर) पसरलेले आहे. या पाण्यामुळेच अद्यापही येथील जंगल आणि वन्यजीव मानवी हस्तक्षेपापासून दूर राहिले आहेत.

कसे जाल

साताऱ्यातून बामणोलीसाठी एसटी मिळते.पुणे - सातारा - येवतेश्वर - कास - बामणोली

कोकणातून - खेड चोरवणे मार्गे

बामणोली गावातील चेकपोष्टवर किल्ल्यावर जाण्यासाठी नावनोंदणी अनिवार्य आहे. नोंदणी केल्यावर शिवसागर जलाशयातून लॉंचने १६ किमी पार करून दीड तासात मेट इंदवली या किल्ल्याच्या पायथ्यला जायचं. लॉंच १० ते १२ जणांचा गट असल्यास आर्थिक फायद्याची ठरते. त्यामुळे तश्या मोठ्या गटाने गेल्यावर लॉंचसाठी अधिक खर्च येत नाही.

काय पाहाल

नागेश्वर मंदिर, काळकाई मंदिर, महादेव मंदिर, बाबूकडा, कोयना जलाशय

उत्तर पेशवाईत दुसन्या बाजीरावांचे परशुरामपंत प्रतिनिधींशी संबंध बिघडले. त्यांनी दौलतराव शिंदेंना ससैन्य पाठवून प्रतिनिधींना कैद केले. बाजीरावाने या काळात ६ वर्षे प्रतिनिधींच्या मुलखाकडे लक्ष दिले नाही. याचाच फायदा घेऊन ताई तेलिणीने पेशव्यांसमोर आव्हान उभे केले. तिने धन्याची जहागीर वाचावी, म्हणून स्थानिक जनतेतून थोडे सैन्य उभे करून वासोट्यावर आपले लष्करी केंद्र उभारले. तिने कमळगड, मकरंदगड, जंगली जयगड, मोरगिरी इत्यादी किल्ले ताब्यात घेतले. दक्षिणेचा व पूर्वेचा असा ६५ किलोमीटर प्रदेश जिंकला. शेवटी ताई तेलिणीचे हे बंड मोडून काढण्यासाठी पेशव्यांनी सेनापती बापू गोखलेंना पाठविले. त्यांनी अगोदर आपल्या प्रतिनिधींना ताई तेलिणीच्या समाचारासाठी पाठविले; पण तिच्या सैन्याने सर्व हल्ले यशस्वीपणे परतवले. म्हणून खुद्द बापूंना रणांगणात उतरावे लागले. बापूंनी आपला दरारा दाखविला. कर्नाटकात विजय मिळवून सेनापती गोखले परतीच्या प्रवासात कराडपूर्वी खानापूर तालुक्यात वांगी गावी आले. पावसाळा असूनही विश्रांती न घेता, त्यांनी ताई तेलिणीवर स्वारी केली. जुलै १८०७ ते एप्रिल १८०८ या काळात तिने जिंकलेला सर्व प्रदेश व किल्ले सेनापतींनी परत जिंकून घेतले. याला अपवाद एकच होता वासोटा.

कोयनानगर ते महाबळेश्वरजवळील तापोळा या साधारणपणे ७० ते ७५ किलोमीटरच्या पट्ट्यात हे अभयारण्य पसरले आहे. ढोबळमानाने याचे तीन प्रमुख भाग पडतात. पहिला महारखोरे, दुसरा वासोटा आणि तिसरा मेट इंदवली. एका बाजूला नैसर्गिक कडा, तर दुसऱ्या बाजूला मानवनिर्मित जलाशय, त्यामुळे या जंगलाला एक प्रकारे जंगलतोडीपासून अभयच मिळाले आहे. कोयनेसोबतच सोळशी व कांदाटी या नद्याही याच अभयारण्यातून वाहतात. जून ते सप्टेंबरच्या दरम्यान इथे प्रचंड पाऊस पडतो. त्याची वर्षाची सरासरी सुमारे पाच हजार मिमी आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील प्राण्यांची सर्वाधिक घनता याच अभयारण्यात आहे. सर्वसाधारणपणे आढळणारे भारतीय प्राणी येथेही आढळतात. येथे बिबट्याचे दर्शन नशीबवंतांना होते. दिवसा व रात्रीच्या डरकाळ्यांच्या आवाजाने आणि ठश्यांवरून येथे वाघ आहेत, हे सिद्धही होते, परंतु सहसा ते कोणाला दिसत नाहीत. साधारणपणे येथे फिरणाऱ्या ट्रेकर्सना नेहमी अस्वल दिसते, बरेचदा आमना-सामनाही होतो. त्यामुळे भयापोटी ट्रेकर्स फटाके वाजवत जंगलातून फिरायचे. मात्र, आता फटाके वाजवायला येथे पूर्णपणे बंदी आहे. येथील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे राक्षसी खारी शेकरु. भीमाशंकर येथे आढळणाऱ्या खारींपेक्षा या थोड्या वेगळ्या आहेत.

टॅग्स :FortगडSocialसामाजिकShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजTrekkingट्रेकिंगtourismपर्यटन