शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
7
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
8
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
9
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
10
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
11
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
12
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
13
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
14
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
15
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
16
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
18
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

कोयनेच्या जंगलातील किल्ला "वार्क्षदुर्ग वासोटा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2022 15:13 IST

वासोटा उर्फ व्याघ्रगड आपल्याला लक्षात राहतो, तो मुळात कोयनेच्या जंगलातील किल्ला म्हणून

गणेश खंडाळे                                                                                                           

वासोटा उर्फ व्याघ्रगड आपल्याला लक्षात राहतो, तो मुळात कोयनेच्या जंगलातील किल्ला म्हणून. नंतर लक्षात राहतो, तो ताई तेलीण या पेशवाईला डोकेदुखी ठरलेल्या रणधुरंदर स्त्रीमुळे. मोठमोठे वृक्ष काटेरी झाडे, वेली, बांबूची बेटे यांनी व्यापलेला गच्च वनात असलेला किल्ला याला स्मृतींमध्ये वार्क्षदुर्ग असे म्हटले गेले आहे. शिवभारत या ग्रंथातल्या सहाव्या अध्यायात गिरीदुर्ग, वनदुर्ग, जलदुर्ग व स्थलदुर्ग यांचे वर्णन येते. रामायण काळातही वार्क्षदुर्ग आढळतात. कोकण आणि देश यांच्या सरहद्दीवर उभ्या असलेल्या वासोट्याला या दोन्ही ठिकाणांवरून जाता येते. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून समांतरपणे दक्षिणोत्तर अशी बामणोलीची उपडोंगररांग धावते. या दोन डोंगररांगांमध्ये कोयनानगरच्या शिवसागर जलाशयाचे पाणी (बॅकवॉटर अगदी तापोळ्यापर्यंत, म्हणजे ५०-६० किलोमीटर) पसरलेले आहे. या पाण्यामुळेच अद्यापही येथील जंगल आणि वन्यजीव मानवी हस्तक्षेपापासून दूर राहिले आहेत.

कसे जाल

साताऱ्यातून बामणोलीसाठी एसटी मिळते.पुणे - सातारा - येवतेश्वर - कास - बामणोली

कोकणातून - खेड चोरवणे मार्गे

बामणोली गावातील चेकपोष्टवर किल्ल्यावर जाण्यासाठी नावनोंदणी अनिवार्य आहे. नोंदणी केल्यावर शिवसागर जलाशयातून लॉंचने १६ किमी पार करून दीड तासात मेट इंदवली या किल्ल्याच्या पायथ्यला जायचं. लॉंच १० ते १२ जणांचा गट असल्यास आर्थिक फायद्याची ठरते. त्यामुळे तश्या मोठ्या गटाने गेल्यावर लॉंचसाठी अधिक खर्च येत नाही.

काय पाहाल

नागेश्वर मंदिर, काळकाई मंदिर, महादेव मंदिर, बाबूकडा, कोयना जलाशय

उत्तर पेशवाईत दुसन्या बाजीरावांचे परशुरामपंत प्रतिनिधींशी संबंध बिघडले. त्यांनी दौलतराव शिंदेंना ससैन्य पाठवून प्रतिनिधींना कैद केले. बाजीरावाने या काळात ६ वर्षे प्रतिनिधींच्या मुलखाकडे लक्ष दिले नाही. याचाच फायदा घेऊन ताई तेलिणीने पेशव्यांसमोर आव्हान उभे केले. तिने धन्याची जहागीर वाचावी, म्हणून स्थानिक जनतेतून थोडे सैन्य उभे करून वासोट्यावर आपले लष्करी केंद्र उभारले. तिने कमळगड, मकरंदगड, जंगली जयगड, मोरगिरी इत्यादी किल्ले ताब्यात घेतले. दक्षिणेचा व पूर्वेचा असा ६५ किलोमीटर प्रदेश जिंकला. शेवटी ताई तेलिणीचे हे बंड मोडून काढण्यासाठी पेशव्यांनी सेनापती बापू गोखलेंना पाठविले. त्यांनी अगोदर आपल्या प्रतिनिधींना ताई तेलिणीच्या समाचारासाठी पाठविले; पण तिच्या सैन्याने सर्व हल्ले यशस्वीपणे परतवले. म्हणून खुद्द बापूंना रणांगणात उतरावे लागले. बापूंनी आपला दरारा दाखविला. कर्नाटकात विजय मिळवून सेनापती गोखले परतीच्या प्रवासात कराडपूर्वी खानापूर तालुक्यात वांगी गावी आले. पावसाळा असूनही विश्रांती न घेता, त्यांनी ताई तेलिणीवर स्वारी केली. जुलै १८०७ ते एप्रिल १८०८ या काळात तिने जिंकलेला सर्व प्रदेश व किल्ले सेनापतींनी परत जिंकून घेतले. याला अपवाद एकच होता वासोटा.

कोयनानगर ते महाबळेश्वरजवळील तापोळा या साधारणपणे ७० ते ७५ किलोमीटरच्या पट्ट्यात हे अभयारण्य पसरले आहे. ढोबळमानाने याचे तीन प्रमुख भाग पडतात. पहिला महारखोरे, दुसरा वासोटा आणि तिसरा मेट इंदवली. एका बाजूला नैसर्गिक कडा, तर दुसऱ्या बाजूला मानवनिर्मित जलाशय, त्यामुळे या जंगलाला एक प्रकारे जंगलतोडीपासून अभयच मिळाले आहे. कोयनेसोबतच सोळशी व कांदाटी या नद्याही याच अभयारण्यातून वाहतात. जून ते सप्टेंबरच्या दरम्यान इथे प्रचंड पाऊस पडतो. त्याची वर्षाची सरासरी सुमारे पाच हजार मिमी आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील प्राण्यांची सर्वाधिक घनता याच अभयारण्यात आहे. सर्वसाधारणपणे आढळणारे भारतीय प्राणी येथेही आढळतात. येथे बिबट्याचे दर्शन नशीबवंतांना होते. दिवसा व रात्रीच्या डरकाळ्यांच्या आवाजाने आणि ठश्यांवरून येथे वाघ आहेत, हे सिद्धही होते, परंतु सहसा ते कोणाला दिसत नाहीत. साधारणपणे येथे फिरणाऱ्या ट्रेकर्सना नेहमी अस्वल दिसते, बरेचदा आमना-सामनाही होतो. त्यामुळे भयापोटी ट्रेकर्स फटाके वाजवत जंगलातून फिरायचे. मात्र, आता फटाके वाजवायला येथे पूर्णपणे बंदी आहे. येथील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे राक्षसी खारी शेकरु. भीमाशंकर येथे आढळणाऱ्या खारींपेक्षा या थोड्या वेगळ्या आहेत.

टॅग्स :FortगडSocialसामाजिकShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजTrekkingट्रेकिंगtourismपर्यटन