शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

कोयनेच्या जंगलातील किल्ला "वार्क्षदुर्ग वासोटा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2022 15:13 IST

वासोटा उर्फ व्याघ्रगड आपल्याला लक्षात राहतो, तो मुळात कोयनेच्या जंगलातील किल्ला म्हणून

गणेश खंडाळे                                                                                                           

वासोटा उर्फ व्याघ्रगड आपल्याला लक्षात राहतो, तो मुळात कोयनेच्या जंगलातील किल्ला म्हणून. नंतर लक्षात राहतो, तो ताई तेलीण या पेशवाईला डोकेदुखी ठरलेल्या रणधुरंदर स्त्रीमुळे. मोठमोठे वृक्ष काटेरी झाडे, वेली, बांबूची बेटे यांनी व्यापलेला गच्च वनात असलेला किल्ला याला स्मृतींमध्ये वार्क्षदुर्ग असे म्हटले गेले आहे. शिवभारत या ग्रंथातल्या सहाव्या अध्यायात गिरीदुर्ग, वनदुर्ग, जलदुर्ग व स्थलदुर्ग यांचे वर्णन येते. रामायण काळातही वार्क्षदुर्ग आढळतात. कोकण आणि देश यांच्या सरहद्दीवर उभ्या असलेल्या वासोट्याला या दोन्ही ठिकाणांवरून जाता येते. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून समांतरपणे दक्षिणोत्तर अशी बामणोलीची उपडोंगररांग धावते. या दोन डोंगररांगांमध्ये कोयनानगरच्या शिवसागर जलाशयाचे पाणी (बॅकवॉटर अगदी तापोळ्यापर्यंत, म्हणजे ५०-६० किलोमीटर) पसरलेले आहे. या पाण्यामुळेच अद्यापही येथील जंगल आणि वन्यजीव मानवी हस्तक्षेपापासून दूर राहिले आहेत.

कसे जाल

साताऱ्यातून बामणोलीसाठी एसटी मिळते.पुणे - सातारा - येवतेश्वर - कास - बामणोली

कोकणातून - खेड चोरवणे मार्गे

बामणोली गावातील चेकपोष्टवर किल्ल्यावर जाण्यासाठी नावनोंदणी अनिवार्य आहे. नोंदणी केल्यावर शिवसागर जलाशयातून लॉंचने १६ किमी पार करून दीड तासात मेट इंदवली या किल्ल्याच्या पायथ्यला जायचं. लॉंच १० ते १२ जणांचा गट असल्यास आर्थिक फायद्याची ठरते. त्यामुळे तश्या मोठ्या गटाने गेल्यावर लॉंचसाठी अधिक खर्च येत नाही.

काय पाहाल

नागेश्वर मंदिर, काळकाई मंदिर, महादेव मंदिर, बाबूकडा, कोयना जलाशय

उत्तर पेशवाईत दुसन्या बाजीरावांचे परशुरामपंत प्रतिनिधींशी संबंध बिघडले. त्यांनी दौलतराव शिंदेंना ससैन्य पाठवून प्रतिनिधींना कैद केले. बाजीरावाने या काळात ६ वर्षे प्रतिनिधींच्या मुलखाकडे लक्ष दिले नाही. याचाच फायदा घेऊन ताई तेलिणीने पेशव्यांसमोर आव्हान उभे केले. तिने धन्याची जहागीर वाचावी, म्हणून स्थानिक जनतेतून थोडे सैन्य उभे करून वासोट्यावर आपले लष्करी केंद्र उभारले. तिने कमळगड, मकरंदगड, जंगली जयगड, मोरगिरी इत्यादी किल्ले ताब्यात घेतले. दक्षिणेचा व पूर्वेचा असा ६५ किलोमीटर प्रदेश जिंकला. शेवटी ताई तेलिणीचे हे बंड मोडून काढण्यासाठी पेशव्यांनी सेनापती बापू गोखलेंना पाठविले. त्यांनी अगोदर आपल्या प्रतिनिधींना ताई तेलिणीच्या समाचारासाठी पाठविले; पण तिच्या सैन्याने सर्व हल्ले यशस्वीपणे परतवले. म्हणून खुद्द बापूंना रणांगणात उतरावे लागले. बापूंनी आपला दरारा दाखविला. कर्नाटकात विजय मिळवून सेनापती गोखले परतीच्या प्रवासात कराडपूर्वी खानापूर तालुक्यात वांगी गावी आले. पावसाळा असूनही विश्रांती न घेता, त्यांनी ताई तेलिणीवर स्वारी केली. जुलै १८०७ ते एप्रिल १८०८ या काळात तिने जिंकलेला सर्व प्रदेश व किल्ले सेनापतींनी परत जिंकून घेतले. याला अपवाद एकच होता वासोटा.

कोयनानगर ते महाबळेश्वरजवळील तापोळा या साधारणपणे ७० ते ७५ किलोमीटरच्या पट्ट्यात हे अभयारण्य पसरले आहे. ढोबळमानाने याचे तीन प्रमुख भाग पडतात. पहिला महारखोरे, दुसरा वासोटा आणि तिसरा मेट इंदवली. एका बाजूला नैसर्गिक कडा, तर दुसऱ्या बाजूला मानवनिर्मित जलाशय, त्यामुळे या जंगलाला एक प्रकारे जंगलतोडीपासून अभयच मिळाले आहे. कोयनेसोबतच सोळशी व कांदाटी या नद्याही याच अभयारण्यातून वाहतात. जून ते सप्टेंबरच्या दरम्यान इथे प्रचंड पाऊस पडतो. त्याची वर्षाची सरासरी सुमारे पाच हजार मिमी आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील प्राण्यांची सर्वाधिक घनता याच अभयारण्यात आहे. सर्वसाधारणपणे आढळणारे भारतीय प्राणी येथेही आढळतात. येथे बिबट्याचे दर्शन नशीबवंतांना होते. दिवसा व रात्रीच्या डरकाळ्यांच्या आवाजाने आणि ठश्यांवरून येथे वाघ आहेत, हे सिद्धही होते, परंतु सहसा ते कोणाला दिसत नाहीत. साधारणपणे येथे फिरणाऱ्या ट्रेकर्सना नेहमी अस्वल दिसते, बरेचदा आमना-सामनाही होतो. त्यामुळे भयापोटी ट्रेकर्स फटाके वाजवत जंगलातून फिरायचे. मात्र, आता फटाके वाजवायला येथे पूर्णपणे बंदी आहे. येथील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे राक्षसी खारी शेकरु. भीमाशंकर येथे आढळणाऱ्या खारींपेक्षा या थोड्या वेगळ्या आहेत.

टॅग्स :FortगडSocialसामाजिकShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजTrekkingट्रेकिंगtourismपर्यटन