शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

Koregaon-Bhima Violence: मोदींना संपवण्याचा नक्षलींचा कट, राजीव गांधींसारखीच करायची होती हत्या?; 'त्या' ई-मेलमुळे खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2018 14:57 IST

नक्षलवाद्यांच्या निशाण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत का?

पुणे - कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात नक्षलवाद्यांचा संबंध होता की नाही?, या दृष्टीकोनातून तपास सुरू असतानाच आणखी एक नवीन गौप्यस्फोट करणारी व धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील शनिवारवाडा येथे 31 डिसेंबर 2017 रोजी झालेल्या एल्गार परिषदेला नक्षलवाद्यांनी पैसा पुरवल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी माओवाद्यांशी संबंधित असलेल्या पाच जणांना पुणे पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यातून धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आता मिळालेली नवीन माहिती ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संबंधित असल्यानं खळबळ उडाली आहे.

इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, या पाच जणांविरोधात अटकेची कारवाई केल्यानंतर पोलिसांना एक ई-मेल मिळाला आहे. यामध्ये नक्षलवाद्यांकडून माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्याकांडासारखं कृत्य पुन्हा घडवून आणण्यासाठी योजना आखण्यात येत असलेला मजकूर आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी पुणे सत्र न्यायालयात याबाबत माहिती दिली. यावरुन नक्षलवाद्यांच्या निशाण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मात्र, उज्ज्वला पवार यांनी कोर्टात तशी शंका स्पष्टपणे नाव पंतप्रधान मोदींचे घेऊन व्यक्त केलेली नाही. मात्र ई-मेलमध्ये आत्मघातकी हल्ल्याचा संदर्भ असून चार लाख राऊंड फायर करण्याची क्षमता असलेलं एम 4 हे शस्त्राच्या खरेदी करण्याची योजना असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

(कोरेगाव-भीमा प्रकरण : एल्गार परिषदेत नक्षलवाद्यांचा पैसा वापरला, पोलिसांना सापडले पुरावे)

बुधवारी(6 जून) पुणे पोलिसांनी मुंबई, नागपूर, दिल्लीतून सुधीर ढवळे, अॅड. सुरेंद्र गडलिंग, सोमा सेन, दीपक राऊत आणि रोना विल्सन यांना अटक केली. माआवोदी संघटनेशी संबंधित सुधीर ढवळे यांच्यासह अटक केलेल्या पाचही जणांचा बंदी असलेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओइस्ट) या संघटनेसोबत घनिष्ठ संबंध दर्शवणारे दस्ताऐवज प्राप्त झाल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली. यामध्ये राजीव गांधी हत्याकांडासारखं आणखी घातक कृत्य करण्याची योजना सुरू असल्याचे याद्वारे आढळून आले.  

प्रकाश आंबेडकरांचा पत्रात उल्लेख

रोना विल्सन यांच्या कॉम्प्युटरमध्ये सापडलेल्या कागदपत्रात माओवादी फरार नेता मिलिंद तेलतुंबडे याने रोना विल्सन याला लिहिलेले एक पत्र मिळाले आहे. त्यात भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसच्या काही नेत्यांचा उल्लेख आहे. त्यांची मदत झाल्याचे त्यात म्हटले गेले आहे. हे पत्र जानेवारी महिन्यातील असून, कोरेगाव-भीमा हिंसाचार झाल्यानंतरचे आहे. यात तथ्य किती आहे, याचा तपास  करण्यात येणार असल्याचे कदम यांनी सांगितले. मिलिंद तेलतुंबडे याच्यावर सरकारनं 50 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.  

 

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारNarendra Modiनरेंद्र मोदी