शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
2
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
3
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
4
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
5
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
6
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
7
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
8
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
9
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
10
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
11
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
12
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
13
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
14
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
15
Health Tips: शरीरावर असलेले लाल मोस कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
16
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
17
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
18
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
19
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
20
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका

शिक्कामोर्तब ! कोंढवा, आंबेगाव दुर्घटना निकृष्ट बांधकामामुळेच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 19:34 IST

कोंढवा आणि आंबेगाव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेजमधील सीमाभिंती पडून घडलेल्या दुर्घटनेचा अंतिम अहवाल महापालिकेला सादर करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसीईओपीच्या त्रिसदस्यीय समितीचा अहवाल सादर सीमाभिंतींचे बांधकाम निकृष्ट दर्जाचेभिंतींमध्ये पाणी मुरल्याने निर्माण झाला दबाव

पुणे : कोंढवा आणि आंबेगाव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेजमधील सीमाभिंती पडून घडलेल्या दुर्घटनेचा अंतिम अहवाल महापालिकेला सादर करण्यात आला आहे. निकृष्ट दर्जाचे बांधकाम, पाणी मुरल्याने आणि झाडांच्या दबावामुळे या भिंती कोसळल्याचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अहवालात नमूद करण्यात आले असून उर्वरीत भिंतीचा भाग पाडून त्याठिकाणी नव्याने मजबूत भिंती बांधण्याची शिफारस करण्यात आली आहे. 

कोंढव्यातील अल्कॉन स्टायलस सोसायटीची सीमाभिंत २९ जून रोजी मध्यरात्री पडली होती. तर १ जुलै रोजी सिंहगड कॉलेजची सीमाभिंत पडली होती. कोंढव्यातील घटनेत १५ तर सिंहगड कॉलेजच्या दुर्घटनेत ६ असे एकूण २१ मजूर दगावले होते. या घटनांच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली होती. तसेच दोन्ही दुर्घटनांमधील बांधकामाची शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत तपासणी करण्याची विनंती केली होती. सीओएपीचे तज्ञ डॉ. एम. एस. रणदिवे,  डॉ. आर. एस. दळवी आणि डॉ. आय. पी. सोनार यांनी घटनास्थळाची पाहणी करून अहवाल तयार केला. हा अहवाल सोमवारी महापौरांना सुपूर्द करण्यात आला.

अल्कोन स्टायलस इमारतीतील सीमाभिंतीचे काम निकृष्ट दर्जाचे होते. सोसायटीतील आतील बाजूस असलेल्या सिमेंट ब्लॉक मधून पाणी जमिनीत मुरत होते. तसेच सीमाभिंतीलगत वाहनेही लावण्यात येत होती. त्यामुळे दबाव वाढत गेल्याने निकृष्ट बांधकाम असलेली भिंत मजुरांच्या घरावर कोसळल्याचा निष्कर्ष नोंदविण्यात आला आहे. या इमारतीची उर्वरित सीमाभिंतही धोकादायक असून ती पाडून नव्याने पक्की भिंत बांधावी, अशी शिफारस अहवालात करण्यात आली आहे.

तसेच सिंहगड कॉलेजच्या सीमाभिंतीलाही जागोजाग तडे गेलेले आहेत. महाविद्यालयाची इमारत आणि सीमाभिंतीदरम्यान बांधलेल्या वर्कशॉपच्या छतावर पावसाचे पाणी साठत होते. हे पाणी वर्कशॉप आणि भिंतीदरम्यान असलेल्या भागात पडत होते. या ठिकाणी झाडे लावण्यात आली असून येथे पावसाळी गटाराचे पाणीही जमिनीत मुरत होते. त्यामुळे मातीचा दाब निर्माण होऊन भिंतीचा काही भाग कोसळला आणि झाडेही उन्मळून पडल्याने मजुरांच्या झोपड्यांचे नुकसान झाल्याचा निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे. येथे शिल्लक राहिलेली उर्वरित सीमाभिंतही  पाडून नव्याने भिंत बांधण्याची शिफारस करण्यात आली आहे.कोंढवा आणि सिंहगड कॉलेज सीमाभिंत दुर्घटनेनंतर नेमण्यात आलेल्या चौकशी समितीमध्ये सीओईपीचे प्राध्यापक बिराजदार यांना सहभागी करुन घेण्यात आले होते. त्यांनी दोन्ही घटनांच्या ठिकाणच्या बांधकामाचा अभ्यास करुन त्याचा अहवाल ४ जुलैरोजी पालिकेला दिला होता. सर्वसाधारण सभेमध्ये उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी या अहवालावर प्रश्न उपस्थित करीत अहवालाच्या सत्यतेविषयी शंका उपस्थित केली होती. प्राध्यापक बिराजदार, डॉ. दळवी आणि तज्ञांच्या समितीने दिलेल्या अहवालातील निष्कर्ष सारखेच आहेत. 

टॅग्स :KondhvaकोंढवाAccidentअपघातDeathमृत्यू