शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
4
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
5
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
6
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
7
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
8
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
9
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
10
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
11
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
12
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
13
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
14
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
15
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
16
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
17
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
18
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
19
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
20
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट

मुलाच्या हव्यासातून जुळ्या मुलींना टाकले मारुन; आईचाही घेतला बळी, पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा

By विवेक भुसे | Updated: July 19, 2023 11:38 IST

मुलाच्या हव्यासातून जुळ्या मुली झाल्यानंतर या मुलींना झोपेत दुध पाजून मारुन टाकल्याचा धक्कादायक प्रकार

पुणे : मुलाच्या हव्यासापोटी त्यांनी गर्भवती सूनेला मुले गोरे होण्याकरीता वेगवेगळ्या गोळ्या खाण्यास दिल्या. तरीही जुळ्या मुली झाल्यानंतर या मुलींना झोपेत दुध पाजून त्यांना मारुन टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार हडपसर पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. जुळ्या मुलींना मारल्यानंतर मुलीच्या आईला कारने पौड रोडला देऊन अपघात झाल्याचे भासविले. त्यात जखमी होऊन मुलीच्या आईचा मृत्यु झाला आहे.

अतुल बाबासाहेब सूर्यवंशी, सासरे बाबासाहेब सूर्यवंशी (वय ६२), जयश्री बाबासाहेब सूर्यवंशी (वय ५५), दीर अमोल बाबासाहेब सूर्यवंशी (वय २६, सर्व रा. शिवकृपा हरपळे वस्ती, फुरसुंगी) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी श्रीकृष्णा प्रताप लोभे (वय ३५, रा. वाघोली) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार डिसेबर २०१८ ते २६ नोव्हेबर २०१९ व ६ फेब्रुवारी २०२० रोजी घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहिण उर्मिला अतूल सूर्यवंशी यांना मुलगा च हवा या कारणामुळे त्यांना मानसिक त्रास देऊन मुले गोरे होण्याकरीता त्यांना वेगवेगळ्या गोळ्या खाण्यास दिल्या. त्यानंतरही त्यांना जुळ्या मुली झाल्या. बाळंतपणानंतर सहा महिन्यांनी त्या दोन्ही मुलींसह सासरी आल्या. उर्मिला हिने २६ नोव्हेबर २०१९ रोजी मुलींना दुध पाजून झोपवले असतानाही त्यांच्या पतीने त्या मुली झोपेत असताना सिद्धी (वय ७ महिने) हिला बाहेरील दुध पाजले. त्यामुळे तिचा मृत्यु झाला. अशाच प्रकारे ६ फेबुवारी २०२० रोजी दुसरी मुलगी रिद्धी (वय ९ महिने) हि झोपली होती. अतुल सूर्यवंशी याने झोपलेले मुलीला बाहेरील दुध पाजून तिला जीवे ठार मारले.

मुली झोपेत असल्याने पाजलेले दुध श्वास नलिकेत गेल्याने त्यांचा श्वास गुदमरुन मृत्यु झाला. अमोल सूर्यवंशी हा वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहे. त्याला एखाद्याचा मृत्यु झाल्यानंतरही त्याचे खरे कारण शवविच्छेदनात कसे येणार नाही, याची माहिती असल्याचे फिर्यादी यांचे म्हणणे आहे. याबाबत फिर्यादी यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. पण, पोलिसांनी दखल न घेतल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या निर्णयानुसार पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक शिवले तपास करत आहेत.

अतुल सूर्यवंशी याने उर्मिला ही आयटी कंपनीत कामाला असल्याचे दाखवून तिच्या नावाने ५० लाख, ५० लाख रुपयाचे दोन कंपन्यांचे टर्म इन्शुरन्स काढले होते. त्यानंतर हिंजवडी येथील कंपनीत मुलाखतीला जायचे असे सांगून अतुल सूर्यवंशी हा फिर्यादी यांची बहिण उर्मिला सूर्यवंशी हिला घेऊन कारने पौडकडे गेला. त्यांच्या गाडीला अपघात झाल्याचे दर्शविले. या घटनेत उर्मिला सूर्यवंशी यांचा मृत्यु झाला. पौड पोलिसांनी योग्य दखल न घेतल्याने याबाबतही फिर्यादी यांनी न्यायालयात धाव घेतली असून त्याची सुनावणी सध्या सुरु आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीWomenमहिलाhusband and wifeपती- जोडीदार