शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

"खासदार ताई तुमचं लक्ष असू द्या" पाणी प्रश्न, पुरंदर विमानतळासह एमआयडीसीचे सुप्रिया सुळेंपुढे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 09:42 IST

ओढा खोलीकरणासारख्या उपक्रमामुळे तालुका टँकरमुक्त करण्यात यश आले. मात्र, पिण्याच्या पाण्यासाठी सध्या तरी पावसावरच अवलंबून राहावे लागत आहे...

बारामती :बारामती लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन सुप्रिया सुळे निवडून आल्या आहेत. आता सुळे यांच्यासमोर आगामी पाच वर्षांत मतदारसंघातील पाणी प्रश्नासह विविध प्रश्न सोडविण्याचे आव्हान आहे. बारामती तालुक्याचे जिरायती आणि बागायती, असे दोन भाग पडतात. त्यामध्ये बागायती भागाला नीरा डावा कालव्याचे पाणी मिळते. त्यातून बागायती भागाचे अर्थकारण जिरायतीच्या तुलनेने मजबूत आहे. जिरायती भागाला कायम अल्प पर्जन्यमानाचा फटका बसतो.

ओढा खोलीकरणासारख्या उपक्रमामुळे तालुका टँकरमुक्त करण्यात यश आले. मात्र, पिण्याच्या पाण्यासाठी सध्या तरी पावसावरच अवलंबून राहावे लागत आहे. गतवर्षी पावसाने दडी मारल्याने सध्या तालुक्यात २८ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जलजीवन मिशनअंतर्गत ७७ गावांसाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांना मंजुरी मिळाली आहे. मात्र, या योजना कार्यान्वित होईपर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी पावसावर अवलंबून राहावे लागणार आहे. शिवाय जिरायती भागाचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे.

या भागाला जानाई-शिरसाई या योजना खडकवासलातून शेतीच्या पाणीपुरवठ्यासाठी अस्तित्वात आल्या. मात्र, उन्हाळ्यात अपेेक्षित प्रमाणात पुरवठा होत नसल्याने शेतीसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यासाठी नीरा नदीतून दरवर्षी पावसाळ्यात १० ते १५ टीएमसी पाणी वाया जाते. कर्नाटकला जाणारे हे पाणी अडवून जिरायती भागात वळविल्यास येथील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. मात्र, ही योजना खर्चीक असल्याने या योजनेच्या पूर्णत्वासाठी केंद्र सरकारचे पाठबळ लागणार आहे. यासाठी सुळे यांना प्रयत्न करावे लागणार आहेत.

शिवाय बारामती एमआयडीसीत मोठा उद्योग आणण्याची येथील उद्योजकांची मागणी आहे. सध्या असलेल्या उद्योगांची स्थिती समाधानकारक नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे रोजगारनिर्मिती आणि अर्थकारणाला चालना मिळण्यासाठी आणखी एखादा मोठा प्रकल्प या भागात उभारण्यासाठी सुळे यांनी लक्ष घालण्याची गरज आहे. शिवाय येथील दळणवळणाला प्रोत्साहन देण्यासाठी बारामती- पुणे लोकल, तसेच बारामती- मुंबई रेल्वे सुरू करण्याची गरज आहे, तसेच पुणे ते दाैंड डेमू रेल्वेसेवा बारामतीपर्यंत वाढविण्याची गरज आहे. बारामती ते पुणे लोकल सुरू झाल्यास बारामतीचे अर्थकारण बदलण्यास मदत होणार आहे, तसेच बारामती फलटण रेल्वेमार्ग पूर्ण करण्यासाठी केंद्र पातळीवर भरीव प्रयत्न करण्याची गरज बारामतीकरांकडून व्यक्त होत आहे.

इंदापूरमध्ये गोरगरिबांवर अत्यल्प दरात सर्व रोगांवर उपचार होतील, अशा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची गरज आहे. महामार्ग असल्याने अपघातांचे प्रमाण अधिक आहे. त्यासाठी या हाॅस्पिटलची या भागात मोठी गरज आहे. तालुक्यातील नीरा नदीवरील बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्याची मागणी आहे. शेटफळ हवेली व त्यासारख्या इतर तलावांतील गाळ काढून, त्यांचे खोलीकरण करावे. उजनी धरणातील गाळ काढल्यास धरणाची साठवण क्षमता १० टीमसीने अधिक वाढणार आहे. शिवाय गाळामुळे उजनी जलाशय धोकादायक बनले आहे. त्यामुळे उजनीतील गाळ काढण्याची गरज आहे.

उजनी धरणातील पाण्याऐवजी तरंगवाडी तलावातून इंदापूरकरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जावा. खडकवासला कालव्यावरील ३६ गावांमध्ये शेती सिंचन अडचणीत आहे. नीरा डावा कालव्यात भविष्यात पाणी प्रश्न गंभीर होणार आहे, या कालव्यावरील २२ गावांचा पाणी प्रश्न प्रलंबित आहे. उजनी जलाशयात अत्यल्प पाणीसाठा असल्याने उन्हाळ्यात सिंचनासाठी अडचण आहे. इंदापूर औद्योगिक वसाहतीत नवीन उद्योग आणल्यास रोजगारवाढीला चालना मिळेल. भिगवण रेल्वे स्टेशन विकास करण्यासाठी लक्ष घालण्याची गरज आहे. एक्स्प्रेस रेल्वेगाड्या येथे थांबविण्याची मागणी दुर्लक्षित आहे.

पुरंदरमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. भविष्यात विमानतळाच्या जागेचा प्रश्न गंभीर होत आहे. एअर ट्रॅफिकची समस्या निर्माण होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर पुरंदर विमानतळाबाबत योग्य तो निर्णय होण्याची गरज आहे, तसेच पालखी महामार्गाचे काम वेगाने करण्यासाठी केंद्र पातळीवरून प्रयत्न होण्याची गरज आहे. जेजुरीला रस्ता रुंदीकरणाऐवजी बाह्यवळण मार्ग अथवा उड्डाणपूल उभारण्याची मागणी आहे. त्याबाबत तातडीने निर्णय घेण्याची येथील व्यावसायिकांची मागणी आहे. भाेरमध्ये रोजगारवाढीला चालना मिळण्यासाठी एमआयडीसी उभारण्याची मागणी आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSupriya Suleसुप्रिया सुळेBaramatiबारामतीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४