शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
2
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
3
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
4
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
5
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
6
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
7
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
8
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
9
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
10
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
11
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
12
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
13
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?
14
तरुणीनं पायावर गोंधवला माता कालीचा टॅटू, व्हिडिओ बघून युजर्स भडकले, तुमचाही संताप होईल
15
"आधार, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती
16
"...असे जीवन जगत राहा"; 'मिसेस मुख्यमंत्र्यां'ची देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवशी खास पोस्ट
17
१२ कोटी रुपये, BMW आणि मुंबईत घर... पोटगीची मागणी ऐकून सुप्रीम कोर्ट म्हणालं,'तू कमवत का नाही?'
18
शेअर असावा तर असा...! ₹15 वरून ₹455 वर पोहोचला शेअर, आता मोठा व्हिस्की ब्रँड खरेदी करणार कंपनी!
19
Ajit Pawar Birthday: अजित पवारांचा असाही एक कार्यकर्ता, ११ एकर शेतजमिनीवर दादांचे चित्र रेखाटून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
20
२ मिनिटांत ₹१००० कोटींचा नफा; 'या' कंपनीच्या शेअरनं केली कमाल, मालकासह गुंतवणूकदारही मालमाल

शाळा, महाविद्यालय ९ आॅगस्टला बंद ठेवण्याचा विचार : जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 21:00 IST

महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर सर्व सामान्य नागरिक व विद्यार्थ्यांना वाहतुक कोंडी किंवा इतर अडचणींना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचा जिल्हा प्रशासनाचा विचार आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेकडून त्यासंदर्भातील जिल्हा प्रशासनाला प्रस्ताव प्राप्तखाजगी किंवा शासकीय मालमत्तेचे नुकसान टाळावे असे आवाहन

पुणे: मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीबाबत प्रशासन सकारात्मक असून सकल मराठा समाजाने सुध्दा शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे. खाजगी किंवा शासकीय मालमत्तेचे नुकसान टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नवलकिशोर राम व पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी मंगळवारी केले. महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर येत्या ९ आॅगस्ट रोजी शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याचा जिल्हा प्रशासनाचा विचार असल्याचे जिल्हाधिका-यांनी नमूद केले. मात्र,अद्याप शाळा महाविद्यालेय बंद बाबत अंतिम निर्णय घेण्यात आला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत राम बोलत होते. यावेळी निवासी उप जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, मराठा क्रांती मोर्चाचे समन्व्यक राजेंद्र कोंढरे, बाळासाहेब अमराळे, राहूल पोकळे, विराज तावरे, रघुनाथ चित्रे, तुषार काकडे, युवराज दिसले, हर्षल लोहकरे आदी उपस्थित होते. जिल्हा प्रशासनातर्फे मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांना बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले होते.आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे, आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्जयोजना, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना याबाबत मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिका-यांनी भूमिका मांडली. येत्या ९ आॅगस्ट रोजीचे आंदोलन शांततापूर्ण असेल तसेच रास्ता रोको करण्याचे नियोजन नसल्याचे सांगितले.  मराठा आरक्षण प्रश्नी आत्महत्या करण्याचे प्रकार दुदैर्वी आहेत. मृत्यूमुळे होणारे नुकसान कोणीही भरुन काढू शकत नाही,त्यामुळे विद्यार्थी तसेच तरुणांनी चुकीचे पाऊलू नये,असे आवाहन नवल किशोर राम यांनी केले.त्याचप्रमाणे राज्याची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रगती होण्यामध्ये मराठा समाजाचे योगदान मोठे आहे. राज्यातील सर्वधर्मसमभाव, शांतता, एकोपा कायम ठेवण्याची आपणा सर्वांची जबाबदारी आहे,असेही राम यांनी सांगितले.महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर सर्व सामान्य नागरिक व विद्यार्थ्यांना वाहतुक कोंडी किंवा इतर अडचणींना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचा जिल्हा प्रशासनाचा विचार आहे. जिल्हा परिषदेकडून त्यासंदर्भातील जिल्हा प्रशासनाला प्रस्ताव प्राप्त झाला आहे,असेही राम यांनी नमूद केले.कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे ही सर्वांची जबाबदारी असून सर्वांमध्ये संवाद कायम राहीला पाहिजे, तसेच तरुणांनी चुकीच्या पध्दतीने आंदोलन करु नये,असे आवाहन संदीप पाटील यांनी केले.

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाcollegeमहाविद्यालयMaratha Reservationमराठा आरक्षण