शहरं
Join us  
Trending Stories
1
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
2
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
3
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
4
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
5
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
6
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
7
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
8
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
9
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
10
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
11
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
12
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
13
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
14
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
15
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
16
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
17
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
18
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
19
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

टोमॅटो खरेदीचे दर ८ ते २ वा पर्यंत सारखेच ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:08 IST

दरम्यान, नारायणगाव येथील उपबाजार केंद्रातील तीन टोमॅटो व्यापाऱ्यांचे परवाने यापूर्वी रद्द करण्यात आले आहेत अशी माहिती ॲड. काळे यांनी ...

दरम्यान, नारायणगाव येथील उपबाजार केंद्रातील तीन टोमॅटो व्यापाऱ्यांचे परवाने यापूर्वी रद्द करण्यात आले आहेत अशी माहिती ॲड. काळे यांनी दिली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे नारायणगाव उपबाजार केंद्र टोमॅटोसाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, या मार्केटमध्ये शेतकऱ्यांना टोमॅटोचे सकाळी एक बाजारभाव, तर दुपारी त्यापेक्षा कमी बाजारभाव मिळत असल्याचे निदर्शनास येताच सभापती ॲड. संजय काळे यांनी सर्व टोमॅटो व्यापारी यांची बैठक नारायणगाव उपबाजार केंद्रात घेतली. या बैठकीला उपसभापती दिलीप डुंबरे, संचालक निवृत्ती काळे, सचिव रुपेश कवडे, उपसचिव शरद धोंगडे व सर्व टोमॅटो व्यापारी उपस्थित होते.

सर्व व्यापाऱ्यांनी टोमॅटोची खरेदी सकाळी ८ वा. सुरू करून सकाळी असणारे बाजारभाव दुपारी २ वाजेपर्यंत सारखेच ठेवावे. तसेच टोमॅटोची प्रतवारी व ग्रेडिंगनुसार मालाची विक्री करावी अशी मागणी शेतकऱ्यांची होती. या मागणीस अनुकूलता दर्शवून सभापती ॲड. संजय काळे यांनी सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत टोमॅटोचे दर सारखेच ठेवावेत अशी सूचना व्यापाऱ्यांना केली. टोमॅटोच्या खरेदीसाठी परराज्यातील व्यापारी बांधवांशी संपर्क करण्यात आला आहे, लवकरच हे व्यापारी खरेदीसाठी येणार आहेत अशी माहिती सभापती ॲड. संजय काळे यांनी दिली.

उपबाजार केंद्रातील टोमॅटो परवानाधारक महेश मधुकर शिंगोटे, संदीप सखाराम काकडे, सुजित सुभाष चव्हाण व मदतनीस सूरज दीपक अडसरे यांचे टोमॅटो व्यापारी लायसन्स रद्द करण्यात आलेले आहे. या व्यापाऱ्यांशी शेतकरी बांधवांनी कोणतेही आर्थिक देवाणघेवाणीचे व्यवहार बाजार समितीच्या आवारात अथवा आवाराच्या बाहेर करू नये असे सभापती ॲड. संजय काळे यांनी सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर अंतर्गत असलेल्या नारायणगाव येथील उपबाजार केंद्रातील टोमॅटो व्यापाऱ्यांशी संवाद साधताना सभापती ॲड. संजय काळे, उपसभापती दिलीप डुंबरे, संचालक निवृत्ती काळे, सचिव रुपेश कवडे, उपसचिव शरद धोंगडे हे उपस्थित होते.