शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

केदारनाथ महाप्रलय :त्याला ''सहा वर्षां''नंतरही आई-वडिलांची प्रतीक्षा...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 16:52 IST

कंबरेपर्यंत पाण्यातून चालताना बरेच मृतदेह दिसत होते, झाडे कोसळली होती, तर कुठे रस्ताच गायब होता. हे मोठे संकट दूर होऊन आपण कधी सुरक्षित स्थळी पोहोचू, अशा भावना तेव्हा मनात होत्या...

ठळक मुद्दे‘त्या’ घटनेला सहा वर्षे पूर्ण   कंबरेपर्यंत पाणी अन् आजूबाजूला मृतदेह 

कल्याणराव आवताडेपुणे : जोरदार कोसळणाऱ्या पावसाने मोठा प्रलय आणला आणि अनेकांचा जीव घेतला. हा प्रलय १६ जून २०१३ रोजी रात्री उत्तर भारतातील उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात घडला होता. त्याच्या आठवणी आजही कायम असून, त्या घटनेमुळे प्रत्यक्षदर्शींच्या हृदयाचा ठोका आजही चुकतो. रस्ते, पूल वाहून गेले होते, तर हजारो नागरिक बेपत्ता झाले.  घटनेला तब्बल सहा वर्षे झाली असली तरी त्यांचे कुटुंबीय अजूनही ‘ते’ परत येतील, अशा आशेवर आहेत. त्यापैकीच आंबेगाव बुद्रुक येथील दळवी कुटुंबीय बेपत्ता असणाºया आपल्या आई-वडिलांच्या प्रतीक्षेत आहेत. नारायणराव कृष्णाजी दळवी हे पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील राहणारे, नामवंत पैलवान असल्याकारणाने पुणे महानगरपालिकेने रखवालदार म्हणून कामास  घेतले होते. २०१२ मध्ये त्यांनी जाण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, पाऊस अधिक असल्याने अर्ध्या वाटेतून परत यावे लागले होते. त्यानंतर १२ जून २०१३ ला सपत्नीक शिवगौरी यात्रा कंपनीच्यावतीने पुण्यातून ७० लोकांसह ते यात्रेला निघाले. गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ प्रवास करून १५ जूनला रात्री नऊ वाजता ते केदारनाथला पोहोचले, १६ जूनला दुपारी याच परिसरातील रामवाडी येथे पोहोचल्यानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली.

 त्यामुळे सायंकाळी काही पर्यटक पुढे चालत निघाले, तर काही जण रामवाडीतच थांबले, मात्र रात्रीतच गांधी सरोवर ढगफुटीने पूर्ण फुटले आणि त्यांचा संपर्क तुटला, २३ जूनला मुलगा अमोल दळवी यांनी थेट केदारनाथ  गाठले, दरम्यान, २४ जूनला आर्मी रेस्क्यूने वाचवलेल्या पर्यटकांची यादी दिली, त्या यादीत दळवी पती-पत्नीचे नाव होते. मुलगा अमोल दळवी यांनी तेथील पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रारही केली. पण अद्यापही काहीच पत्ता लागलेला नाही, असे अमोल दळवी यांनी सांगितले. .......कंबरेपर्यंत पाणी अन् आजूबाजूला मृतदेह नऱ्हे : कंबरेपर्यंत पाण्यातून चालताना बरेच मृतदेह दिसत होते, झाडे कोसळली होती, तर कुठे रस्ताच गायब होता. हे मोठे संकट दूर होऊन आपण कधी सुरक्षित स्थळी पोहोचू, अशा भावना तेव्हा मनात होत्या, हे बोल आहेत केदारनाथ येथील महाप्रलयातून  सुखरुप घरी आलेले खेडेकर पती-पत्नी यांचे. त्या घटनेला सहा वर्षे झाली असली, तरी आजही त्याच्या जखमा मनात ताज्या असल्याचे त्यांनी सांगितले. आठवणी सांगताना त्यांच्या डोळ्यातून येणारे पाणी ते रोखू शकले नाहीत. 
दत्तात्रय खेडेकर त्यांच्या पत्नी नंदा खेडेकर यांच्यासह केदारनाथला गेले होते. ते केदारनाथला १५ जूनला रात्री नऊ वाजता पोहोचले, १६ जूनला दुपारी याच परिसरातील रामवाडी येथे पोहोचल्यानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे सायंकाळी त्यांनी काही पर्यटकांसह पुढे जाण्याचा निर्णय घेतला,  तर काही जण रामवाडीतच थांबले, मात्र रात्रीची वेळ झाल्याने त्यांची पत्नी नंदा व त्यांची चुकामूक झाली आणि गांधी सरोवर ढगफुटीने पूर्ण फुटले आणि त्यांचा संपर्क तुटला. त्यांची पत्नी नंदा यांनी एका महिलेस डोंगर उतरण्यास सुरुवात केल्यानंतर एका ठिकाणी लाईट्स दिसत असल्याने त्या दिशेने जाण्यास सुरुवात केली आणि एका गावात आश्रय घेतला. दरम्यान, दत्तात्रय खेडेकर यांच्या पत्नी नंदा विनाअन्नपाणी तब्बल तीन दिवस तेथील एका पोलीस चौकीबाहेर पतीची वाट पाहत उभ्या होत्या.  दरम्यान, त्यांचे पती तेथील एका दुकानात पाण्याची बाटली विकत घेताना दिसल्यानंतर त्यांनी पळत जाऊन पती दत्तात्रय यांना कवटाळले आणि ताटातूट झालेल्या पती-पत्नीची भेट झाली, त्यानंतर त्यांना आर्मीने सुखरुपपणे सुरक्षित स्थळी नेले, त्यानंतर ते २२ जूनला पुण्यात सपत्नीक परतले. अग्निशमन दलात पाच वर्षे काम केले असल्याने जखमी मदतीची याचना करणारे  पाहून जीव कासावीस व्हायचा, असे खेडकर म्हणाले. 

.......................

माझे आई-वडील अजूनही आहेत ह्यावर माझा विश्वास आहे, कारण आर्मी रेस्क्यूच्या यादीत त्यांचे नाव आहे, शिवाय तीन लोकांनी तिथे माझ्या आई-वडिलांना पाहिल्याचेही सांगितल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी मृत्यू प्रमाणपत्र दिले असले, तरी आई-वडील परत येतील, यावर माझा विश्वास आहे.-  अमोल दळवी, आंबेगाव 

 

टॅग्स :PuneपुणेKedarnathकेदारनाथRainपाऊस