शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

कल्पना थोरवे / २/ विमेन अचिवर्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:28 IST

पहिल्यापासून त्यांचे कुटुंबीय एकत्र आहेत. आताच सगळे कामधंद्यांमुळे वेगळे झाले. त्या नगरसेवक असताना महिला बाल कल्याण समितीची दोन वेळा ...

पहिल्यापासून त्यांचे कुटुंबीय एकत्र आहेत. आताच सगळे कामधंद्यांमुळे वेगळे झाले. त्या नगरसेवक असताना महिला बाल कल्याण समितीची दोन वेळा अध्यक्ष होत्या. एकदा शहर सुधारणा समितीवर सदस्य होत्या.

राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे पाटील यांनी खूप सहकार्य केले. सर्व पक्षातल्या नगरसेवकांचे, कार्यकर्त्यांचे चांगले संबंध व सहकार्य आहे, असे त्या सांगतात.

सर्वांना आपलेसे करून घेऊन काम करून घेणे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रामधूनच शिकले. अभिजित कदम कात्रज परिसरातील काँग्रेसचे. त्यांना त्या नुकत्याच म्हणाल्या की यंदा आपण दोघं निवडणुकीला उभे राहू आणि दोघे निवडून येऊ. त्या म्हणाल्या ''''''''अभिजित कदम खूप चांगला माणूस आम्ही दोघं महानगरपालिकेमध्ये एकत्र जात होतो एकत्र काम करत होतो. त्यामुळे अनेक कामं मला करून घेता आली.'''''''' राजकारणामध्ये आपण एक शिकलो ते म्हणजे समोरच्या शत्रुला बेसावध ठेवून, घायाळ करून आपले काम करून घ्यायचं, आणि कोणी आडवा आला की त्याला धडा शिकवायचा. ही रणनीती मी शिकून घेतली. जर मी वाद घालत बसले असते तर काही लोकांनी मला काम करू दिले नसते, अशी त्यांची धारणा आहे.

लोकांचे काम फक्त शिवसेनाच करू शकते, असेही त्या म्हणतात. सगळ्या प्रकारच्या लोकांशी जुळवून घेतल्यामुळे माझे काम चांगले होते, आणि कुणी कामांमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करत नाही. महानगरपालिकेत अधिकाऱ्यांशी, ठेकेदारांशी चांगले संबंध आहेत. एका आंदोलनासाठी महानगरपालिकेमध्ये नुकत्याच गेलेल्या असताना या लोकांनी त्यांना भेटायला यावं,अशी विनंती केली. त्या बरीच वर्ष महानगरपालिकेत गेलेल्या सुद्धा नाहीत. पुढच्या वेळी निवडून आले की भेटेन, असं गंमतीनं सांगून त्या परतल्या.

गेल्या निवडणुकीमध्ये यश मिळालं नसलं तरी त्या निराश नाहीत. निवडणुकांमध्ये हार-जीत होत असतेच आणि बेईमानी करून निवडून आलेल्यांना त्या निवडून आलेले असं म्हणत नाहीत असं त्यांचं मत. पराजयाचं आपल्याला काही वाटलं नाही तरी लोक माझ्यासाठी रडत होते, हे महत्वाचं असं त्यांचं म्हणणं आहे.

कात्रज परिसरात अनेक लोकांनी अर्धा,एक गुंठा जागा घेऊन घरं बांधली. तो सारा मध्यममार्गी वर्ग. तो सहन करतो, त्यामुळं त्याला त्रास दिला जात होता. जो बंड करतो त्याला त्रास दिला जात नाही. त्यामुळे कल्पनाताई निवडून आल्यानंतर हे सगळे प्रकार बंद झाले.

आज त्यांचे सर्वपक्षीय संबंध इतके चांगले संबंध आहेत की विरोधी पक्षात असलेला एखादा उमेदवार अर्ज भरण्यापूर्वी थोरवे पती-पत्नींचे आशीर्वाद घेऊन जातो.

लोकांचे काम करायचे असेल तर एखाद्या पक्षाचा पाठिंबा आपल्यामागे असलाच पाहिजे. आपल्या मागे शिवसेनेचं भक्कम पाठबळ आहे. त्यामुळे लोकांची कामं लवकर होऊ शकतात. शिवसेनेमध्ये महिलांना खूप आदराचं स्थान आहे गेल्या तीस वर्षांपासून अगदी कमी वयामध्ये आपण शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात आहोत, परंतु आतापर्यंत कसलाही वाईट अनुभव आला नाही. महिलांना राजकारणात त्रास होतात असं म्हटलं जातं परंतु त्यांना तसा कसलाही अनुभव आला नाही. राजकारणातील महिला चांगल्या नसतात असं म्हटलं जातं पण तसाही अनुभव कल्पनाताईंना नाही. राजकारण वाईट अजिबात नाही असं त्यांना वाटतं.

लोकांची खूप कामं आपल्याला एखाद्या राजकीय पक्षाच्या माध्यमातून करता येतात. याचा अनुभव घेतला. तीन वेळा यश नाही मिळालं तरी त्या काम करत राहिल्या.

कात्रज भागामध्ये पूर्वी आठ दिवस पाणी नसायचं. आता लोकांना मिनरल वॉटर सारखं स्वच्छ पाणी रोज व पुरेशा दाबाने मिळत आहे. आता भरपूर पाणी उपलब्ध असतं. चौथ्या मजल्यापर्यंतही लोकांना पाणी मिळू लागलेलं आहे.

आजही सकाळपासून रात्रीपर्यंत ताईकडे लोकांचा, विशेषता महिलांचा राबता असतो. मुंबईत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात असताना ''''''''मातोश्री''''''''वर पुण्यातल्या सर्व महिलांना आत मध्ये साहेबांच्या भेटीसाठी घेऊन गेल्या होत्या, तो किस्सा आजही सांगितला जातो.

''''''''मातोश्री'''''''' बाहेर पुण्यातल्या महिलांना आजही अडवलं गेलं तर कल्पनाताई थोरवे यांना फोन लावा त्यांनी सांगितले तरच आत मध्ये सोडतील, अशी महिला कार्यकर्त्यांची भावना असते.