शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
6
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
8
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
9
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
10
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
11
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
12
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
13
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
14
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
15
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
16
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
17
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
18
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
19
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
20
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ

समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झालेल्या कडूबाई खरात यांचे घर पाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 14:12 IST

समाजमाध्यमांवर आपल्या सुरेल गाण्यांनी प्रसिद्ध झालेल्या कडूबाई खरात यांचे घर पाडण्यात आले आहे.

- धनाजी कांबळे

पुणे : 'मायबापाहून भिमाचे उपकार लय हाय रं... तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं...' अशा गीतांनी अवघा महाराष्ट्र जागवणाऱ्या भीमकन्या कडूबाई खरात यांचे पत्र्याचे घर सरकारने पाडले आहे. झाल्टा येथील गायरान जमिनीवर पत्र्याचे शेड टाकून राहणाऱ्या शेकडो कुटुंबांची घरे पाडण्यात आली आहेत. यातच कडूबाई खरात गेल्या दोन वर्षांपासून राहत होत्या.

औरंगाबादमधील चिखलठाणा येथे राहणा-या कडूबाई यांचं गाणं सोशल मीडियावर व्हायरलं झालं आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीलढ्याचं तत्वज्ञान त्यांच्या गोड गळ्यातून काळजाला हात घालणारे गाणे सर्वत्र पसरले. ते आज गावागावांत घुमू लागले आहे. कडूबाई यांनी एकतारीवर गायिलेल्या ‘मह्या भीमानं, भीमानं माय सोन्यानं भरली ओटी...’ या गाण्याला यू-ट्यूबवर लाखो लाईकस् आणि शेअरिंग मिळाले. मात्र, त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न ना सरकारने सोडवला ना समाजाने. त्यामुळे आता बेघर झालेल्या कडूबाईंना दुसरीकडे एक पत्र्याची खोली भाड्याने घेऊन राहण्याची वेळ आली आहे.

दोन मुली आणि एका मुलासोबत अतिक्रमित जमिनीवर पत्र्याची झोपडी टाकून त्या राहत होत्या. वडिलांपासून घरात सुरु असलेलं गाणं कडूबाई यांच्या गोड गळ्यात आणखी खुललं आणि या गाण्यानंच कडूबाई यांच्या जगण्याला एक आकार दिला. कडूबाई अबला म्हणून नव्हे; तर एक स्वाभिमानी माणूस म्हणून जगू लागल्या. कष्टानं मिळालेली भाकरीच खाणार, अशी जिद्द घेऊन जगणा-या कडूबाई यांच्या आयुष्यात उजेड पेरणा-या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा घरोघरी जागर व्हावा, या हेतूने कडूबाईंच्या हातातल्या एकतारीतूनच बाबासाहेबांच्या आंदोलनांचा अंगार शब्द झाला आणि सुरावटींनी तो गावोगावी घुमला आहे. आज प्रत्येकाच्या मोबाइलमध्ये त्यांच्या आवाजातील गाणे असेल, पण सरकारने दडपशाही करून घर पडल्याने आता कडूबाई यांच्यासह शेकडो गरीब कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. काही लोक गंगाधर गाडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागण्यासाठी फेऱ्या मारत आहेत. मात्र, गेल्या ४० वर्षांपासून येथे राहणाऱ्या कुटुंबाना पोलीस पिटाळून लावत आहेत, असे कडूबाई खरात यांच्यासह येथील रहिवाशांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

सरकारने कडूबाईंना घर द्यावे...एकीकडे सरकार सगळ्यांना घरे देण्याची भाषा करीत असताना कडूबाई यांच्यासारख्या कलावंतांचीच परवड केली जात आहे. सरकारने लोककलावंत कडूबाई खरात यांच्या निवाऱ्याची सोय केली पाहिजे, अशी मागणी सामाजिक संघटनांकडून केली जात आहे. त्याचप्रमाणे इतरही ज्या लोकांची पत्र्याची घरे पाडण्यात आली त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सरकारने सोडवावा, अशी मागणी आता जोर धरत आहे. 

टॅग्स :Puneपुणेcultureसांस्कृतिक