शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम लोक होते"; आमचे आदर्श मुस्लिमविरोधी नसल्याचे राजनाथ सिंहांचे विधान
2
“कधीही कोणत्याही उपराष्ट्रपतींना अशी राजकीय विधाने करताना पाहिले नाही”: कपिल सिब्बल
3
RCB vs PBKS : पावसाच्या बॅटिंगनंतर विराटसह RCB च्या स्टार फलंदाजांची 'घसरगुंडी' अन् पंजाबचा भांगडा!
4
लाडकी बहीण योजना: एप्रिलचा हप्ता कधी मिळेल? ५०० मिळणार की १५००? नियम बदलले का? जाणून घ्या
5
Maiden IPL Fifty For Tim David : एकटा पडला, शेवटपर्यंत नडला अन् पहिली फिफ्टीही ठोकली
6
धक्कादायक; सोलापूरचे न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या; डोक्यात झाडली गोळी
7
IPL 2025 :पदार्पणाच्या सामन्यात जे घडलं तेच १८ वर्षांनी पुन्हा विराट कोहलीच्या वाट्याला आलं
8
“अमित शाह भेट वैयक्तिक होती तर तो भार सरकारी तिजोरीवर कशाला, तटकरेंनी...”; कुणी केली टीका?
9
२००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर भरावा लागणार जीएसटी? सरकारने केली घोषणा
10
अरविंद केजरीवाल यांच्या लेकीचे फाईव्ह स्टार हॉटेलात थाटात लग्न...! जावई कोण? काय करतो...
11
टेस्ला भारतात येण्यापूर्वी पंतप्रधान मोदींची मस्क यांच्याशी चर्चा; फोनवर काय झाला संवाद?
12
“उद्या बाळासाहेबांच्या आवाजात शरद पवार, सोनिया गांधी देवमाणूस आहेत असे वदवून घ्याल”
13
IPL 2025 : जुने तेवर दिसले! दिग्गज क्रिकेटर म्हणाला; लवकरच रोहितच्या भात्यातून मोठी खेळीही येईल
14
साखरपुड्यातच होणाऱ्या पत्नीने प्रियकराला मिठीत घेतलं अन्... लग्नाचे स्वप्न पाहणाऱ्या अधिकाऱ्याने आयुष्य संपवलं!
15
“काहीही चूक नाही, हिंदी देशाची भाषा आहे, मुलांना...”; सक्तीला संजय निरुपम यांचे समर्थन
16
हिंदी सक्तीला विरोध की पाठिंबा? आदित्य ठाकरे म्हणाले, “प्रगतीसाठी जास्त भाषा येणे गरजेचे”
17
रोल्स रॉयसच्या कारची नावे कायम भुतांवरून का असतात? इतर कंपन्यांनी ठेवली तर कोणी घेणारही नाही...
18
अन् बोभाटा झाला...! घरच्यांपासून बँकॉक ट्रिप लपविण्यासाठी काकांनी पासपोर्टची पाने फाडली; आता जगाला समजले...
19
शाळेच्या कार्यक्रमात प्रेम जागे झाले आणि तिने सगळं संपवलं; प्रियकरासाठी केली तीन मुलांची हत्या
20
"आम्हाला सांगण्याऐवजी तुमच्या देशातल्या अल्पसंख्याकांचे रक्षण करा"; भारताने बांगलादेशला सुनावले

"अतिथि देवो भव ही आपली संस्कृती, महाराष्ट्रात येणाऱ्या सर्वांचे स्वागत"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 17:34 IST

जो विरोधात बोलतो त्याच्यावरच केस होते...

इंदापूर (पुणे) : 'अतिथि देवो भव' ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे महाराष्ट्रात येणाऱ्या सर्वांचे स्वागत आहे. बारामतीतही कोणी येत असतील तर आनंदच आहे. त्यांचे मनापासून स्वागत करु. त्यांना बारामतीतील विकास पहायचा असेल तर तसे नियोजनही करू. शेवटी आम्ही लोकशाहीवाले लोक आहोत,असे वक्तव्य आज (दि.२४ ) खा.सुप्रिया सुळे यांनी भरणेवाडी येथे पत्रकारांशी बोलताना केले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन व तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या दौऱ्यांचा आपल्या वा आपल्या पक्षावर फारसा परिणाम झाला नसल्याचे त्यांनी दाखवून दिले.

पाटना येथील विरोधी पक्षाच्या बैठकीत उध्दव ठाकरे, पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांच्या शेजारी बसल्याच्या कारणावरुन भाजपने ठाकरे यांना टार्गेट करायला सुरुवात केली आहे. ही बैठक फोटोसेशन बैठक आहे. या शब्दांत टीका केली जात आहे, या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या की, भाजपला आत्ता बोलायला काहीच राहिले नाही. त्या त्यांच्या बाजूला बसल्या त्यावेळी चालत होते आणि आत्ता काय होते आहे. शेजारी बसणे हा काही गुन्हा आहे का असा सवालही त्यांनी केला. आम्ही लोकशाहीवाले आहोत दडपशाहीवाले नाही. दिलदार आहोत. विरोधकांनीही टीका दिलदारपणे करावी.

जो विरोधात बोलतो त्याच्यावरच केस होते. आत्तापर्यंत राज्यात व देशभरात जे गुन्हे दाखल झाले. त्यातील ९५ टक्के गुन्हे विरोधी पक्षातील लोकांवरच झाले आहेत. कार्यकर्त्यांच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट दिसते आहे, असे एका प्रश्नाच्या उत्तरात त्या म्हणाल्या.

"दुध दराविषयी आमची भूमिका स्पष्ट..."

पुढे खा. सुळे म्हणाल्या, दुध दराविषयी आमची भूमिका स्पष्ट आहे. भाजप सरकारने परदेशातून दुध आणा असा आदेश काढला होता. त्यास सर्वप्रथम शरद पवार यांनी विरोध केला. त्यांनी पत्र दिल्यानंतर सरकारने तो आदेश रद्द केला. दुध दराबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शेतक-यांच्या बाजूने आहे. शेतीमालाला हमीभावात मिळावा ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका कायम आहे.

"आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा सर्वांना वाटते..."

पुढच्या वर्षीची पंढरपूरची विठ्ठलपुजा अजित पवारांच्या हस्ते होईल असे वक्तव्य आ. अमोल मिटकरी यांनी काल इंदापूरात केले होते. त्या विषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा असे प्रत्येकाला वाटत असते त्यात चूक काय आहे, असे खा. सुळे म्हणाल्या. वीरश्री मालोजीराजे यांच्या गढीवरील पाडलेल्या चिंचेच्या झाडाच्या प्रकरणाची चौकशी होऊन कारवाई व्हावी असे मत त्यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSupriya Suleसुप्रिया सुळेK Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावNCPराष्ट्रवादी काँग्रेस