शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
5
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
6
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
8
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
9
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
10
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
11
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
12
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
13
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
14
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
15
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
16
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
17
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
18
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
19
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
20
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू

"अतिथि देवो भव ही आपली संस्कृती, महाराष्ट्रात येणाऱ्या सर्वांचे स्वागत"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 17:34 IST

जो विरोधात बोलतो त्याच्यावरच केस होते...

इंदापूर (पुणे) : 'अतिथि देवो भव' ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे महाराष्ट्रात येणाऱ्या सर्वांचे स्वागत आहे. बारामतीतही कोणी येत असतील तर आनंदच आहे. त्यांचे मनापासून स्वागत करु. त्यांना बारामतीतील विकास पहायचा असेल तर तसे नियोजनही करू. शेवटी आम्ही लोकशाहीवाले लोक आहोत,असे वक्तव्य आज (दि.२४ ) खा.सुप्रिया सुळे यांनी भरणेवाडी येथे पत्रकारांशी बोलताना केले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन व तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या दौऱ्यांचा आपल्या वा आपल्या पक्षावर फारसा परिणाम झाला नसल्याचे त्यांनी दाखवून दिले.

पाटना येथील विरोधी पक्षाच्या बैठकीत उध्दव ठाकरे, पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांच्या शेजारी बसल्याच्या कारणावरुन भाजपने ठाकरे यांना टार्गेट करायला सुरुवात केली आहे. ही बैठक फोटोसेशन बैठक आहे. या शब्दांत टीका केली जात आहे, या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या की, भाजपला आत्ता बोलायला काहीच राहिले नाही. त्या त्यांच्या बाजूला बसल्या त्यावेळी चालत होते आणि आत्ता काय होते आहे. शेजारी बसणे हा काही गुन्हा आहे का असा सवालही त्यांनी केला. आम्ही लोकशाहीवाले आहोत दडपशाहीवाले नाही. दिलदार आहोत. विरोधकांनीही टीका दिलदारपणे करावी.

जो विरोधात बोलतो त्याच्यावरच केस होते. आत्तापर्यंत राज्यात व देशभरात जे गुन्हे दाखल झाले. त्यातील ९५ टक्के गुन्हे विरोधी पक्षातील लोकांवरच झाले आहेत. कार्यकर्त्यांच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट दिसते आहे, असे एका प्रश्नाच्या उत्तरात त्या म्हणाल्या.

"दुध दराविषयी आमची भूमिका स्पष्ट..."

पुढे खा. सुळे म्हणाल्या, दुध दराविषयी आमची भूमिका स्पष्ट आहे. भाजप सरकारने परदेशातून दुध आणा असा आदेश काढला होता. त्यास सर्वप्रथम शरद पवार यांनी विरोध केला. त्यांनी पत्र दिल्यानंतर सरकारने तो आदेश रद्द केला. दुध दराबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शेतक-यांच्या बाजूने आहे. शेतीमालाला हमीभावात मिळावा ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका कायम आहे.

"आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा सर्वांना वाटते..."

पुढच्या वर्षीची पंढरपूरची विठ्ठलपुजा अजित पवारांच्या हस्ते होईल असे वक्तव्य आ. अमोल मिटकरी यांनी काल इंदापूरात केले होते. त्या विषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा असे प्रत्येकाला वाटत असते त्यात चूक काय आहे, असे खा. सुळे म्हणाल्या. वीरश्री मालोजीराजे यांच्या गढीवरील पाडलेल्या चिंचेच्या झाडाच्या प्रकरणाची चौकशी होऊन कारवाई व्हावी असे मत त्यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSupriya Suleसुप्रिया सुळेK Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावNCPराष्ट्रवादी काँग्रेस