शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
2
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
3
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
4
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
5
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
6
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
7
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
8
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
11
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
12
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
13
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
14
Astro Tips: कुंडलीत 'ही' ग्रहस्थिती दर्शवते जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध; वाढतो जीवाला धोका!
15
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
16
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
17
‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं
18
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
19
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
20
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या

केवळ तीन महिन्यांतच घटस्फोटाचा दावा निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 02:49 IST

अपवादात्मक निर्णय; आधीपासून वेगळेगळे राहत असल्याने सहा महिन्यांची अट शिथिल

पुणे : वैचारिक मतभेदांमुळे एकमेकांशी पटत नसलेल्या दाम्पत्याचा घटस्फोटाचा दावा केवळ तीन महिन्यांत निकाली काढण्यात आला आहे. अर्ज दाखल करण्याच्या आधीपासून दोघे वेगळेगळे राहत होते. त्यामुळे अपवादात्मक परिस्थितीत सहा महिन्यांचा कालावधी वगळण्यात यावा, असा आदेशही न्यायालयाने दिला.कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश सुभाष काफरे यांनी हा दावा निकाली काढला. तुषार आणि हेमा (नावे बदलली आहेत) या दोघांनी घटस्फोट मिळावा म्हणून दावा दाखल केला होता. त्यांचे आॅक्टोबर २०१४मध्ये लग्न झाले. त्यांना एक मुलगाही आहे. तुषार हा सरकारी नोकर असून हेमा उच्चशिक्षित व पुण्यातील एका आयटी कंपनीत मोठ्या पदावर काम करते. दोघांनाही चांगल्या पगाराच्या नोकऱ्या आहेत. लग्नानंतर त्यांचे वैचारिक मतभेद झाल्यामुळे एकमेकांशी सूर जुळत नव्हते. त्यामुळे त्यांनी वेगळे राहण्यास सुरुवात केली. त्यानंतरही दोघांचे पटेनासे झाल्यावर घटस्फोट मिळावा म्हणून त्यांनी दावा दाखल केला.हेमाला नोकरीसाठी इंग्लंडला जायचे होते. तेथील प्रकल्पात तिला महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली होती. तर, तुषारचीदेखील बदली होणार होती. त्यामुळे त्यांनी परस्परसंमतीने दाखल केलेला घटस्फोटाचा दावा ३ महिन्यांत निकाली निघाला. न्यायालयाने घटस्फोटासाठी दाखल केलेल्या दाव्यात ६ महिन्यांचा कालावधी वगळून हा घटस्फोट अर्ज मान्य केला.अ‍ॅड. शशिकांत बागमार, अ‍ॅड. निनाद बागमार यांच्यामार्फत हा दावा दाखल करण्यात आला होता.दोघांनाही पुण्यात थांबणे नव्हते शक्यनोकरीनिमित्त हेमा इंग्लंडला जाणार होती, तर तुषारची दुसºया शहरात बदली होणार होती. त्यामुळे दोघांनाही पुण्यात थांबणे शक्य नव्हते. त्यांच्या वकिलांनी ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. घटस्फोट मिळण्यासाठी लागणारा सहा महिन्यांचा कालावधी वगळण्यात यावा, असा अर्ज त्यांनी दिला. अपवादात्मक परिस्थितीत घटस्फोट मिळण्यासाठी ६ महिन्यांचा कालावधी वगळणे गरजेचे आहे, असा युक्तिवाद वकिलांनी केला. त्यानुसार न्यायालयाने तीन महिन्यांच्या आत दोघांचा अर्ज मान्य केला.अशी आहे सहा महिन्यांची तरतूदहिंदू विवाह कायद्याप्रमाणे पती-पत्नी परस्परसंमतीने घटस्फोट मिळण्यासाठी अर्ज करू शकतात. हा अर्ज करण्यासाठी ते एकमेकांपासून एक वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी वेगळे राहत असतील, तर घटस्फोट मिळावा म्हणून अर्ज दाखल करू शकतात.हा अर्ज निकाली काढण्यासाठी अर्ज केल्यापासून ६ महिन्यांच्या कालावधीपर्यंत थांबण्याची तरतूद कायद्यात आहे.मात्र, अपवादात्मक परिस्थितीत सहा महिन्यांचा कालावधी वगळण्यात यावा, असा आदेश या दाव्यात न्यायालयाने दिला.

टॅग्स :Divorceघटस्फोटmarriageलग्नrelationshipरिलेशनशिप