शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

"नुसतंच बाळासाहेबांचे विचार"; राज ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 15:19 IST

महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. शासनाचा धाकच राहिला नसल्याचे त्यांनी म्हटले. 

पुणे - राज्यातील दुकाने आणि आस्थापना यावरील पाट्या मराठी भाषेत ठळक अक्षरात लावा, सरकारच्या कायद्याचे पालन करा असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. त्यासाठी, व्यापारांना २ महिन्यांची मुदत दिली होती. ही मुदत संपूनही अनेक दुकानदारांनी मराठी भाषेत पाट्या लावल्या नाहीत. त्यामुळे, काही शहरांत मनसेने आक्रमक पवित्रा घेत काहीठिकाणी पाट्या फोडल्या. याच संदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना राज यांनी राज्यातील महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. शासनाचा धाकच राहिला नसल्याचे त्यांनी म्हटले. 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यातील मराठी पाट्यांसदर्भात मुंबई, ठाण्यासह पुणे जिल्ह्यात मनसैनिक आक्रमक झाले आहेत. ज्या दुकानांवर मराठी बोर्ड दिसत नाही, तिथे खळखट्याक करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नावर राज ठाकरेंनी थेट नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. पुण्यात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने राज ठाकरे आले होते, त्यावेळी पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना राज यांनी राज्य सरकारचा धाक उरला नाही, असे म्हटले. तसेच, मराठी आणि हिंदुत्त्वाबद्दल फक्त तोंड वाजवायचं काम हे सरकार करत असल्याचा टोलाही लगावला.  मराठी आणि हिंदुत्त्वाबद्दल फक्त तोंड वाजवायला आपलं सरकार आहे. नुसतं बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांचे विचार बोलायला आहेत. कोर्टाने सांगूनही सरकारला मराठी पाट्यांची सक्ती करता येत नाहीत. ज्यावेळी मी मशिदींवरील भोंगे काढायला सांगितले होते, तेही काढता आले नाहीत. नुसतं बोलायचे बाळासाहेबांचे विचार, मग बाळासाहेबांचे विचार अंमलात आणा ना, असे म्हणत राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.

ज्यावेळी, आम्ही मराठी पाट्यांचं आंदोलन केलं होतं तेव्हा मराठीत पाट्या लागल्या होत्या ना. आता, शासनाचा धाक नावाची काही गोष्ट आहे की नाही. कोर्टाची भीती नाही, पोलिसांची भीती नाही, शासनाची भीती नाही. मग, आपण अराजकाकजे जाऊ, असे म्हणत राज ठाकरेंनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.  

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेmarathiमराठीCourtन्यायालय