शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
3
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
4
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
5
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
6
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
7
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
8
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
9
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
10
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
11
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
12
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
13
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील रसाळ आंब्याला भाव मिळणार, यंदा एक महिना अगोदर आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 4:04 PM

मेच्या पहिल्याच आठवडयात हा आंबा पिकू लागला

ठळक मुद्देहवामानातील बदल व मागील वर्षी झालेल्या चक्रीवादळामूळे यावर्षी आंबे लवकर पिकायला सुरुवात

घोडेगाव: दरवर्षी जुन्नर तालुक्यातील रसाळ आंबा जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पिकायला सुरुवात होते. यंदा मेच्या पहिल्याच आठवडयात पिकू लागला आहे.  हवामानातील बदल व मागील वर्षी झालेल्या चक्रीवादळामुळे असे झाले आहे. लवकर आंबा पिकू लागल्याने कोकणातील देवगड व रत्नागिरी प्रमाणेच आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील आंब्याला भाव मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना वाटत आहे. 

दरवर्षी कोकणातील आंबा संपल्यावर येथील आंबा पाडाला लागण्यास सुरुवात होते. त्यात मे अखेर व जुनच्या पहिल्या आठवडयात पडणा-या वळवाच्या पावसामुळे या आंब्याचे मोठे नुकसान होते. त्यातूनही उरलेल्या आंब्याला भाव मिळत नाही. त्यामुळे आंबेगाव, जुन्नर या भागातील आंब्याला रंग, चव असूनही दुर्लक्षित राहिला आहे. 

जुनच्या दुस-या आवडयात पिकणारा आंबा मेच्या पहिल्याच आठवडयात पिकू लागल्याने अनेक शेतकरी आश्चर्यचकित झाले आहेत. यावर्षी थंडी व गरमी यातील चढउतारामुळे एका झाडाला तीन ते चार वेळा मोहोर आले. तसेच अधूनमधून पडणारा पाऊस याचाही परिणाम झाडांवर झाला. मागील वर्षी ३ जूनला झालेल्या चक्रीवादळामुळेही झाडांमध्ये बदल होऊन लवकर आंबा पिकला असल्याचे शेतीतज्ञ संतोष सहाणे यांनी सांगितले.  

शेतकरी राम ढोले म्हणाले,  यावर्षी लवकर आंबा पिकू लागल्याने कोकणातील देवगड व रत्नागिरी प्रमाणेच आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील आंब्याला भाव मिळेल अशी आशा वाटत आहे. आंबा पाडाला लागल्याने काढून आढी लावायला सुरवात केली असून लवकरच आमचा आंबा मुंबईच्या बाजारपेठेत आंबा जाईल.   

टॅग्स :PuneपुणेJunnarजुन्नरMangoआंबा