शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

JNU च्या कुलगुरू डॉ. शांतिश्री पंडित म्हणाल्या, "मला संघाने कुलगुरू केले, राज्याने नव्हे"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 08:47 IST

विश्वगुरू होण्याची सर्वांत मोठी संधी जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाला आहे- पंडीत

पुणे : पूर्वीच्या सरकारने राजकारणात महिलांना स्थान दिले. परंतु, शैक्षणिक क्षेत्रात महिलांना कुलगुरू केले नाही. मला संघाने कुलगुरू म्हणून जेएनयुमध्ये पाठविले, राज्याने नाही. मी मराठी आहे, असे अनेकजण मानत होते. मात्र, काही ठराविक वर्गाने मी बाहेरून आल्याने माझ्याविरुद्ध राजकारण केले, असे जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयु) नवनियुक्त महिला कुलगुरू डॉ. शांतिश्री पंडित यांनी सांगितले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या, आंतरराष्ट्रीय संबंध व परराष्ट्र धोरण विषयातील तज्ज्ञ डॉ. शांतीश्री पंडित यांची नुकतीच नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती झाल्याबददल त्यांचा सत्कार केंद्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य, निवृत्त परराष्ट्र अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी नामवंत विधिज्ञ व शिक्षण प्रसारक मंडळी, पुणेचे अध्यक्ष ॲड. एस. के. जैन, एकता मासिक फाऊंडेशनचे अध्यक्ष रवींद्र घाटपांडे, एकताचे संपादक मनोहर कुलकर्णी उपस्थित होते. डॉ. पंडित यांचा हा पुण्यातील पहिलाच जाहीर सत्कार होता. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या.

त्या म्हणाल्या, विश्वगुरू होण्याची सर्वांत मोठी संधी जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाला आहे. कारण भारतातील हे पहिल्या क्रमांकाचे विश्वविद्यालय आहे. भारतातील विविधता या विद्यापीठात दिसून येते. आंतरराष्ट्रीय स्तरावर या विद्यापीठाला पहिल्या शंभर क्रमांकात स्थान आहे. या विद्यापीठाने भारताला अनेक मंत्री दिले आहेत. भारतातील 60 टक्के प्रशासकीय अधिकारी या विद्यापीठातून आले आहेत. या सरकारमध्ये स्वप्न सत्यात उतरविण्याची क्षमता आहे.

डॉ. ज्ञानेश्वर मुळे म्हणाले, भारताला भाषांची मोठी विरासत लाभली आहे. परंतु दुर्दैवाने हे आपण विसरायला लागलो आहोत. जशी आपण आपल्या मालमत्तेची काळजी घेतो तशीच आपल्या भाषेची काळजी घेतली पाहिजे. भाषा ही सामूहिक विद्वता आणि जाणिवांचे स्वरूप आहे.

ॲड. जैन म्हणाले, तत्त्वाशी तडजोड न करताही तुम्ही मोठे होऊ शकता याचे डॉ. शांतीश्री पंडित या उत्तम उदाहरण आहेत. कुटुंब, गाव, शहर, राष्ट्र याचा विचार करणारे शिक्षण पुढील पिढीला देणे गरजेचे आहे. अमोल दामले यांनी प्रास्ताविक केले. रुपाली भुसारी यांनी सूत्रसंचालन तर मनोहर कुलकर्णी यांनी आभार मानले.

टॅग्स :Puneपुणेjnu - jawaharlal nehru universityजेएनयूPune universityपुणे विद्यापीठ