शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

गाय तुमच्याकडे ठेवा, आमचे मूलभूत प्रश्न सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 7:33 AM

गाय वाचविणे हा देशासमोरील सर्वात मोठा प्रश्न समजून त्यासाठी माणसे मारणाºयांनी आणि त्यांना पाठीशी घालणाºया सरकारांनी आपल्या या मातेला जरूर आपल्याजवळ ठेवावे

पुणे : गाय वाचविणे हा देशासमोरील सर्वात मोठा प्रश्न समजून त्यासाठी माणसे मारणाºयांनी आणि त्यांना पाठीशी घालणाºया सरकारांनी आपल्या या मातेला जरूर आपल्याजवळ ठेवावे. परंतु तत्पूर्वी दलित, अल्पसंख्य, महिला, गरिबांचे मूलभूत प्रश्न सोडवावेत, असे आवाहन आझादी कूच आंदोलनाचे नेते जिग्नेश मेवाणी यांनी मंगळवारी केले.हिंदी है, हिंदोस्तां हमारा परिषदेच्या वतीने रविवारी पुण्यात हिंसाचारविरोधी अमन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा फुले पेठेतील सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये अनोख्या पद्धतीने परिषदेचे उद्घाटन झाले. ‘सर्व त्या संविधानिक मार्गाने हिंसाचार रोखा,’ असे देशाच्या राष्ट्रपतींना आवाहन करणारे पत्र मेवाणी यांनी पोस्टपेटीच्या प्रतिकृतीत टाकले आणि परिषदेचे उद्घाटन झाले. या वेळी महिला नेत्या डॉ. मनीषा गुप्ते, हिंदोस्तां हमारा परिषदेचे नेते हुमायून मुरसल, निवृत्त कर्नल सुरेश पाटील, संयोजक नितीन पवार मंचावर उपस्थित होते. परिषदेच्या अध्यक्षस्थानी हाजी नदाफ होते.गेल्या वर्षी जुलैमध्येच उना, गुजरात येथे मेलेली जनावरे ओढण्याचे काम करणाºया चार दलित तरुणांना अमानुष मारहाण करण्यात आली. गाय मारल्याच्या संशयावरून या तरुणांना अर्धनग्न करून वाहनाला बांधून लोखंडी रॉड, पट्टे, काठ्यांनी कथित गोरक्षकांनी मारले. त्याविरुद्ध मेवाणी यांनी उभे केलेले प्रचंड आंदोलन देशभर गाजले. त्याचा संदर्भ देऊन मेवाणी म्हणाले, ‘‘उना आंदोलन हे स्वाभाविक प्रतिक्रिया म्हणून उभे राहिले. तरी गेले वर्षभर त्याच्या मूलभूत कारणांचा आम्ही शोध घेत होतो. त्या वेळी दलितांच्या हक्काच्या जमिनी त्यांच्या ताब्यात नसल्याचे पुढे आले. म्हणून उना घटनेच्या वर्षपूर्तीनिमित्त आम्ही जमिनीची मागणी करत आझादी कूच आंदोलन केले. परिणामी दलितांची हिसकावलेली हजारो एकर जमीन त्यांना परत मिळाली. आता जनावरे ओढण्याची आवश्यकता राहणार नाही. ते काम गोमातेच्या लेकरांनी करावे. पाणी, शिक्षण, रोजगार, वीज अशा मूलभूत प्रश्नांवर दलित, मुस्लिमांनी लढे उभे करावेत. कथित धर्मरक्षकांच्या हिंसेला हेच उत्तर आहे. त्यासाठी दलित मुस्लिमांनी एकजूट केली पाहिजे. जातीअंत हेच अंतिम उद्दिष्ट ठेवायला हवे.’’ मनीषा गुप्ते, हाजी मरसूल यांनी विचार व्यक्त केले. नितीन पवार यांनी प्रास्ताविक केले. विठ्ठल गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. सादिक लुकडे यांनी आभार मानले.