शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

जेजुरी गडकोटाची पडझड! २५० वर्षांत जीर्णोद्धार नाहीच : नंदी चौकापासून गाभाऱ्यापर्यंत दुरुस्त्यांची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 23:59 IST

गडकोटाची चढण चढताना पायरी मार्गाची संरक्षक भिंत ठिकठिकाणी ढासळू लागली आहे. मार्गावरील असणाऱ्या ५ ही कमानींची दुरवस्था झालेली दिसते. पायरीमार्ग व परिसरात एकूण ३०० दीपमाळा असल्याचे सांगण्यात येते.

जेजुरी : अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणारे तीर्थक्षेत्र जेजुरी, कुलदैवताच्या गडकोटाची दुरवस्था होऊ लागली आहे. ९व्या शतकापासून १७व्या शतकापर्यंत खंडोबाच्या गडकोटाची उभारणी झाल्याचे निदर्शनास येते. मात्र, त्यानंतर गेल्या २५० वर्षांत गडकोटाची दुरुस्ती, डागडुजी झालेलीच नाही.संपूर्ण गडकोटाची पाहणी केली असता पायथ्याच्या नंदी चौकापासून अगदी मुख्य गाभाऱ्यापर्यंत दुरुस्त्यांची गरज असल्याचे दिसते.

गडकोटाची चढण चढताना पायरी मार्गाची संरक्षक भिंत ठिकठिकाणी ढासळू लागली आहे. मार्गावरील असणाऱ्या ५ ही कमानींची दुरवस्था झालेली दिसते. पायरीमार्ग व परिसरात एकूण ३०० दीपमाळा असल्याचे सांगण्यात येते. यातील अनेक दीपमाळा नामशेष झालेल्या आहेत. आज ज्या काही उभ्या दीपमाळा आहेत त्यांची दुरुस्ती करावी लागणार आहे. गडकोटात ही मंदिरासमोरील चार आणि परिसरातील दोन दीपमाळा ही आता दुरुस्तीला आलेल्या आहेत. मंदिरासमोरील दीपमाळांवर दीप लावण्यासाठी घमेले ठेवावे लागते, अशीच परिस्थिती आहे.

गडकोटातील नगारखान्याच्या ओवºयांचा स्लॅब निखळण्याच्या स्थितीत आहे. गडकोटाची दक्षिण बाजूच्या तटबंदीच्या दगडांनी ही जागा सोडलेली आहे. त्याची दुरुस्ती किंवा दर्जा भराव्या लागणार आहेत. दिवसेंदिवस भाविकांची वाढती गर्दी पाहता मुख्य गाभाºयात हवा खेळती ठेवण्यासाठी वातानुकूलित यंत्रणेचीही गरज आहे. याशिवाय आपत्कालीन परिस्थितीत गडकोटावर पोहोचण्यासाठी एखादा मार्ग असणे तेवढेच महत्त्वाचे बनलेले आहे.यासंदर्भात विश्वस्त संदीप जगताप यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही वस्तुस्थिती मान्य केली आहे. गेल्या अडीचशे वर्षांपासून गडकोटाचा जीर्णोद्धार झालेला नसल्याने आज गडाची दुरवस्था दिसत असल्याचे सांगितले. मागील काही विश्वस्त मंडळाने किरकोळ दुरुस्त्या केल्या आहेत. गडकोट हा पुरातत्त्व विभागाच्या अख्यत्यारीत येत असल्याने गडाच्या कोणत्याही दुरुस्त्या करता येत नसल्याचे विश्वस्त शिवराज झगडे यांनी सांगितले. यासाठी विश्वस्त मंडळाकडून पुरातत्त्व विभागाशी वारंवार संपर्क साधूनही प्रतिसाद मिळत नसल्याचेही त्यांनी सांगितले.पुरातत्त्व विभागाने याबाबतांभीर्याने विचार करणे आता गरजेचे बनले आहे; अन्यथा भविष्य कदाचित कोणालाच माफ करणार नाही, अशी चर्चा मात्र भाविकांतून होत आहे.

टॅग्स :JejuriजेजुरीFortगडRainपाऊस