शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जेजुरी गडकोटाची पडझड! २५० वर्षांत जीर्णोद्धार नाहीच : नंदी चौकापासून गाभाऱ्यापर्यंत दुरुस्त्यांची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 23:59 IST

गडकोटाची चढण चढताना पायरी मार्गाची संरक्षक भिंत ठिकठिकाणी ढासळू लागली आहे. मार्गावरील असणाऱ्या ५ ही कमानींची दुरवस्था झालेली दिसते. पायरीमार्ग व परिसरात एकूण ३०० दीपमाळा असल्याचे सांगण्यात येते.

जेजुरी : अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणारे तीर्थक्षेत्र जेजुरी, कुलदैवताच्या गडकोटाची दुरवस्था होऊ लागली आहे. ९व्या शतकापासून १७व्या शतकापर्यंत खंडोबाच्या गडकोटाची उभारणी झाल्याचे निदर्शनास येते. मात्र, त्यानंतर गेल्या २५० वर्षांत गडकोटाची दुरुस्ती, डागडुजी झालेलीच नाही.संपूर्ण गडकोटाची पाहणी केली असता पायथ्याच्या नंदी चौकापासून अगदी मुख्य गाभाऱ्यापर्यंत दुरुस्त्यांची गरज असल्याचे दिसते.

गडकोटाची चढण चढताना पायरी मार्गाची संरक्षक भिंत ठिकठिकाणी ढासळू लागली आहे. मार्गावरील असणाऱ्या ५ ही कमानींची दुरवस्था झालेली दिसते. पायरीमार्ग व परिसरात एकूण ३०० दीपमाळा असल्याचे सांगण्यात येते. यातील अनेक दीपमाळा नामशेष झालेल्या आहेत. आज ज्या काही उभ्या दीपमाळा आहेत त्यांची दुरुस्ती करावी लागणार आहे. गडकोटात ही मंदिरासमोरील चार आणि परिसरातील दोन दीपमाळा ही आता दुरुस्तीला आलेल्या आहेत. मंदिरासमोरील दीपमाळांवर दीप लावण्यासाठी घमेले ठेवावे लागते, अशीच परिस्थिती आहे.

गडकोटातील नगारखान्याच्या ओवºयांचा स्लॅब निखळण्याच्या स्थितीत आहे. गडकोटाची दक्षिण बाजूच्या तटबंदीच्या दगडांनी ही जागा सोडलेली आहे. त्याची दुरुस्ती किंवा दर्जा भराव्या लागणार आहेत. दिवसेंदिवस भाविकांची वाढती गर्दी पाहता मुख्य गाभाºयात हवा खेळती ठेवण्यासाठी वातानुकूलित यंत्रणेचीही गरज आहे. याशिवाय आपत्कालीन परिस्थितीत गडकोटावर पोहोचण्यासाठी एखादा मार्ग असणे तेवढेच महत्त्वाचे बनलेले आहे.यासंदर्भात विश्वस्त संदीप जगताप यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही वस्तुस्थिती मान्य केली आहे. गेल्या अडीचशे वर्षांपासून गडकोटाचा जीर्णोद्धार झालेला नसल्याने आज गडाची दुरवस्था दिसत असल्याचे सांगितले. मागील काही विश्वस्त मंडळाने किरकोळ दुरुस्त्या केल्या आहेत. गडकोट हा पुरातत्त्व विभागाच्या अख्यत्यारीत येत असल्याने गडाच्या कोणत्याही दुरुस्त्या करता येत नसल्याचे विश्वस्त शिवराज झगडे यांनी सांगितले. यासाठी विश्वस्त मंडळाकडून पुरातत्त्व विभागाशी वारंवार संपर्क साधूनही प्रतिसाद मिळत नसल्याचेही त्यांनी सांगितले.पुरातत्त्व विभागाने याबाबतांभीर्याने विचार करणे आता गरजेचे बनले आहे; अन्यथा भविष्य कदाचित कोणालाच माफ करणार नाही, अशी चर्चा मात्र भाविकांतून होत आहे.

टॅग्स :JejuriजेजुरीFortगडRainपाऊस