शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

JEE Exam| जेईई ॲडव्हान्स परीक्षेतील त्रुटींमुळे विद्यार्थी न्यायालयात; आज हाेणार सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 08:35 IST

दखल न घेतल्याने याचिका...

पुणे : आयआयटी मुंबईने नुकतीच जेईई ॲडव्हान्स परीक्षा घेतली. या परीक्षेत अनेक तांत्रिक त्रुटी आल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे फेरपरीक्षा घेण्यात यावी, या मागणीसाठी काही पालक आणि विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याची सुनावणी गुरुवारी म्हणजे आज हाेणार आहे.

आयआयटी मुंबईने २८ ऑगस्ट रोजी विविध केंद्रांवर जेईई ॲडव्हान्सची ऑनलाइन परीक्षा घेतली होती. या दरम्यान विद्यार्थ्यांना प्रश्न झूम इन होणे, परीक्षा सुरू असताना स्क्रीनवर एकही प्रश्न न दिसणे, माऊस व्यवस्थित न चालणे अशा अनेक अडचणी आल्या होत्या. अनेक तांत्रिक दोषांचाही सामना विद्यार्थ्यांना करावा लागला. त्या तक्रारी आयआयटीकडे केल्या तरी त्यांची कोणतीही दखल घेण्यात आली नव्हती. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

तांत्रिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित सोडविता आली नाहीत. परीक्षेवर लक्ष केंद्रीत करता आले नाही. त्यामुळे त्यांची चूक नसतानाही गुणांवर परिणाम हाेऊ शकताे, अशा तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या होत्या. जेईई ॲडव्हान्सची परीक्षा देशभरात एकाचवेळी घेण्यात आली हाेती व तिचा निकाल ११ सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना तांत्रिक दोषांअभावी पेपर सोडविता आला नाही, त्यांचे यात नुकसान होणार आहे. विद्यार्थ्यांचा कोणताही दोष नसताना त्यांना या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अशा तांत्रिक दोषांमुळे त्यांचे नुकसान झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न या पालकांनी विचारला आहे. त्याची सुनावणी होणार असल्याची माहिती डॉ. गोरख झेंडे या पालकांनी दिली.

दखल न घेतल्याने याचिका

नुकसान झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घ्यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. परीक्षा नियंत्रण समितीकडून कोणतीही दखल घेण्यात न आल्याने ५ सप्टेंबर रोजी ॲड. प्रांजल खटावकर यांच्यामार्फत उच्च न्यायालयात जनहितार्थ याचिका दाखल केली आहे.

टॅग्स :Puneपुणेexamपरीक्षाCourtन्यायालय