शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2018 14:04 IST

राज्यातला महत्त्वाचा विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची निवड झाली आहे. या पदासाठी अनेक नावे चर्चेत होती.

पुणे- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांनी एकमताने निवड करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, फौजिया खान यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप वळसे पाटील यांनी सभेच्या कामकाजाला सुरुवात केली. मावळते अध्यक्ष सुनील तटकरे  यांनी जयंत पाटील यांच्या नावाची सूचना मांडली. या सूचनेला शशिकांत शिंदे, धनंजय मुंडे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर वळसे पाटील यांनी पाटील बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर केले. खजिनदारपदी हेमंत टकले यांची निवड करण्यात आली. प्रदेश सरचिटणीस पदावर शिवाजी गर्जे यांची निवड करण्यात आली.  त्यांच्या नावाची सूचना अनिल देशमुख यांनी केली तर राजेश टोपे यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदी नवाब मलिक यांनी निवड झाली असून त्यांच्यासाठी धनंजय मुंडे यांनी सूचना मांडली तर हसन मुश्रीफ यांनी अनुमोदन दिले. या बैठकीला पवार यांच्यासह अजित पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, जयंत पाटील, चित्रा वाघ. सुनील तटकरे, अनिल देशमुख आदींसह विविध भागातील नेते उपस्थित होते. 

सध्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा तीन वर्षांचा कालावधी यापूर्वीच संपुष्टात आलाय. परंतु गेल्या काही दिवसांतील राजकीय परिस्थिती पाहता या निवडीला उशीर झालाय. राज्यात भाजपाचे सरकार आल्यानंतर विरोधी पक्षात बसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसपेक्षा चांगला दबदबा निर्माण केलाय. विशेषतः नुकत्याच करण्यात आलेल्या हल्लाबोल आंदोलनात त्यांनी संपूर्ण राज्यात फिरून पक्षाची ताकद आजमावली. शिवाय सोशल मीडिया किंवा प्रत्यक्षातही राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या विरोधातल्या प्रत्येक मुद्द्यावर बोट ठेवत आहे. ग्रामीण भागासह शहरातही त्यांचे लक्ष असून तिथेही कार्यकर्त्यांना आक्रमक राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागाशी जोडलेला पण सुसंस्कृत आणि सुशिक्षित चेहऱ्याची पक्षाला गरज आहे.

अशातच जयंत पाटील आणि धनंजय मुंडे असे दोन आक्रमक चेहरे पक्षाकडे आहेत. राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षाच्या शर्यतीत या दोघांची नावे आघाडीवर असून, त्यांच्यापैकी जयंत पाटलांचं नाव निश्चित मानलं जातंय. सध्या मुंडे हे राष्ट्रवादीकडून विधान परिषदेत चोख विरोधी पक्षाची भूमिका मांडत आहेत. धनंजय मुंडेंनी प्रभावी वक्तृत्वाच्या जोरावर सरकारला अनेकदा धारेवर धरलं आहे. तसेच त्यांच्या भाषणांनाही सोशल मीडियावरही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तसेच जातीय समीकरणे जुळवण्यासाठी आणि ओबीसी मतपेटीसाठीही त्यांच्या नावाचा विचार गेला जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पाटील हे पक्षात अनुभवी असून त्यांचा राजकीय आणि प्रशासकीय अनुभव जास्त आहे. त्यामुळे त्यांचाही पर्याय खुला आहे. याशिवायही काही नावे डोळ्यांसमोर असून शरद पवार हे स्वतःच अंतिम निर्णय घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.  

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस