शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
3
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
5
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
6
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
7
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
8
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
9
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
10
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
11
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
12
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
13
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
14
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
15
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
16
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
17
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
18
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
19
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
20
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2018 14:04 IST

राज्यातला महत्त्वाचा विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची निवड झाली आहे. या पदासाठी अनेक नावे चर्चेत होती.

पुणे- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांनी एकमताने निवड करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, फौजिया खान यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप वळसे पाटील यांनी सभेच्या कामकाजाला सुरुवात केली. मावळते अध्यक्ष सुनील तटकरे  यांनी जयंत पाटील यांच्या नावाची सूचना मांडली. या सूचनेला शशिकांत शिंदे, धनंजय मुंडे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर वळसे पाटील यांनी पाटील बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर केले. खजिनदारपदी हेमंत टकले यांची निवड करण्यात आली. प्रदेश सरचिटणीस पदावर शिवाजी गर्जे यांची निवड करण्यात आली.  त्यांच्या नावाची सूचना अनिल देशमुख यांनी केली तर राजेश टोपे यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदी नवाब मलिक यांनी निवड झाली असून त्यांच्यासाठी धनंजय मुंडे यांनी सूचना मांडली तर हसन मुश्रीफ यांनी अनुमोदन दिले. या बैठकीला पवार यांच्यासह अजित पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, जयंत पाटील, चित्रा वाघ. सुनील तटकरे, अनिल देशमुख आदींसह विविध भागातील नेते उपस्थित होते. 

सध्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा तीन वर्षांचा कालावधी यापूर्वीच संपुष्टात आलाय. परंतु गेल्या काही दिवसांतील राजकीय परिस्थिती पाहता या निवडीला उशीर झालाय. राज्यात भाजपाचे सरकार आल्यानंतर विरोधी पक्षात बसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसपेक्षा चांगला दबदबा निर्माण केलाय. विशेषतः नुकत्याच करण्यात आलेल्या हल्लाबोल आंदोलनात त्यांनी संपूर्ण राज्यात फिरून पक्षाची ताकद आजमावली. शिवाय सोशल मीडिया किंवा प्रत्यक्षातही राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या विरोधातल्या प्रत्येक मुद्द्यावर बोट ठेवत आहे. ग्रामीण भागासह शहरातही त्यांचे लक्ष असून तिथेही कार्यकर्त्यांना आक्रमक राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागाशी जोडलेला पण सुसंस्कृत आणि सुशिक्षित चेहऱ्याची पक्षाला गरज आहे.

अशातच जयंत पाटील आणि धनंजय मुंडे असे दोन आक्रमक चेहरे पक्षाकडे आहेत. राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षाच्या शर्यतीत या दोघांची नावे आघाडीवर असून, त्यांच्यापैकी जयंत पाटलांचं नाव निश्चित मानलं जातंय. सध्या मुंडे हे राष्ट्रवादीकडून विधान परिषदेत चोख विरोधी पक्षाची भूमिका मांडत आहेत. धनंजय मुंडेंनी प्रभावी वक्तृत्वाच्या जोरावर सरकारला अनेकदा धारेवर धरलं आहे. तसेच त्यांच्या भाषणांनाही सोशल मीडियावरही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तसेच जातीय समीकरणे जुळवण्यासाठी आणि ओबीसी मतपेटीसाठीही त्यांच्या नावाचा विचार गेला जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पाटील हे पक्षात अनुभवी असून त्यांचा राजकीय आणि प्रशासकीय अनुभव जास्त आहे. त्यामुळे त्यांचाही पर्याय खुला आहे. याशिवायही काही नावे डोळ्यांसमोर असून शरद पवार हे स्वतःच अंतिम निर्णय घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.  

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस