शहरं
Join us  
Trending Stories
1
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
2
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
3
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
4
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
5
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
6
'पाश्चिमात्य दबावातही भारत-रशिया संबंध मजबूत', अमेरिकेचा उल्लेख करत रशियाची मोठी प्रतिक्रिया
7
Nashik: येवल्यात छगन भुजबळांच्या 'पंच'मुळे उद्धवसेना 'सलाइन'वर, 'शिंदेसेने'लाही दिला शह
8
एकनाथ शिंदेंच्या तक्रारीनंतर अमित शाहांकडून रवींद्र चव्हाणांची पाठराखण; "पक्षबांधणी सुरूच ठेवा..."
9
२० दिवसापूर्वीच थार घेतलेली, कोकणात फिरण्यासाठी निघाले होते, चौघांचा मृतदेह सापडला, दोनजण बेपत्ता; ओळख पटली, नाव आली समोर
10
Pune Hit And Run: टेम्पोने उडवले, सात वर्षाच्या अनुरागने जागेवरच सोडला जीव, आजोबा आणि भाऊ थोडक्यात बचावले
11
इंग्रज ढासळले...! ब्रिटिश इंडियन्स, उद्योजक ब्रिटन सोडू लागले! अब्जाधीश हरमन नरुला दुबईला स्थायिक होणार
12
“मनसेचा आघाडीचा प्रस्ताव नाही, आम्हाला महाराष्ट्र धर्म शिकवू नये”; काँग्रेस नेत्यांचे उत्तर
13
निवडणूक न लढताच 'जीन्स-शर्ट'मधील तरुणाने घेतली मंत्रिपदाची शपथ! कोण आहेत दीपक प्रकाश?
14
IND vs SA: रोहित-विराट पुन्हा संघात दिसणार, बुमराह बाहेर जाणार; 'या' खेळाडूचाही पत्ता कट?
15
IIT दिल्लीमध्ये देशातील पहिल्या ‘Gen-Z पोस्ट ऑफिस’ची सुरुवात; Wifi, QR द्वारे पार्सल बुकिंग
16
"आता मैदान मोकळं, बघू कोण येतंय!"; संरक्षणातील पोलिसांना परत पाठवत जरांगेंचे आव्हान
17
Tesla Model Y सेफ्टी टेस्टमध्ये 'Pass' की 'Fail'? 5-स्टार रेटिंगमध्ये किती पॉइंट्स मिळाले? जाणून घ्या
18
“बिहारने जंगलराज नाकारून विकासाला मत दिले”; शिंदेंनी केले PM मोदी-नितीश कुमारांचे अभिनंदन
19
Metaचे मोठे पाऊल! WhatsApp मध्ये लवकरच येणार 'हे' जबरदस्त फीचर; वारंवार लॉग-इन करण्याची कटकट संपणार
20
मुलांच्या भविष्यासाठी सोने की SIP? 'या' दोन्ही पर्यायांचे फायदे-तोटे समजून घ्या आणि योग्य गुंतवणूक निवडा!
Daily Top 2Weekly Top 5

'पाटील साहेब, तुम्ही टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करता, मनसेवाले टप्प्यात आणून करतात'

By महेश गलांडे | Updated: February 9, 2021 08:26 IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही वीज बिलाच्या मुद्द्यावरुन सरकारला लक्ष्य केले होते. मात्र, राज ठाकरेंचं वक्तव्य केवळ प्रसिद्धीसाठीच असल्याचं जयंत पाटील म्हणाले. त्यावरुन मनसे नेत्यांनी संताप व्यक्त केलाय.

ठळक मुद्देपाटील साहेब, तुम्ही टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम करता, पण मनसेवाले टप्प्यात आणून कार्यक्रम करतात. त्यामुळे, नको ती वक्तव्ये करण्यापेक्षा आपण सर्वसामान्यांच्या वीजबिलाचा प्रश्न मार्गी लावावा हीच विनंती,

मुंबई - मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सध्या प्रसिद्धीचीच गरज आहे, त्यामुळे ते राज्यातील वीजबिलाच्या प्रश्नावर बेछुट आरोप करतात, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला होता. त्यानंतर, मनसेतील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मनसेच्या पुणे शहराच्या महिलाध्यक्षा रुपाली पाटील ठोंबरे यांनी जयंत पाटलांना टोला लगावला आहे. राज ठाकरेंना प्रसिद्धीची गरज होती, म्हणूनच का खासदारकीच्या निवडणुकांवेळी त्यांनी एक सभा घ्यावी, म्हणून आपण प्रयत्न करत होतात, असे रुपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटले आहे. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही वीज बिलाच्या मुद्द्यावरुन सरकारला लक्ष्य केले होते. मात्र, राज ठाकरेंचं वक्तव्य केवळ प्रसिद्धीसाठीच असल्याचं जयंत पाटील म्हणाले. त्यावरुन मनसे नेत्यांनी संताप व्यक्त केलाय. ''जयंत पाटील आज मंत्री आहेत, ऊर्जा मंत्रीपदी आपल्या सरकारमधील मंत्री असताना, बीजबिलाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना लुबाडण्याचं काम होतं आहे. त्यामुळे, सरकार म्हणून तुम्हाला हा जाब विचारण्यात आला आहे. कोणाला प्रसिद्धीची गरज आहे, हे सर्व जनतेला माहिती आहे. पाटील साहेब, तुम्ही टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम करता, पण मनसेवाले टप्प्यात आणून कार्यक्रम करतात. त्यामुळे, नको ती वक्तव्ये करण्यापेक्षा आपण सर्वसामान्यांच्या वीजबिलाचा प्रश्न मार्गी लावावा हीच विनंती,'' असे मनसेच्या महिला नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी जयंत पाटलांना म्हटलंय.  

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे परिवार संवाद मेळाव्यासाठी रविवारी अकोल्यात आले होते. यावेळी सकाळी त्यांनी जलसंपदा विभागाचा आढावा घेतला व नंतर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, वीजबिलाच्या प्रश्नावर राज्य सरकार गंभीर आहे. मात्र, एवढया महत्त्वाच्या विषयावर राज ठाकरे यांनी शरद पवारांच्या घरी अदानी आले अन् वीजबिलाचा प्रश्न मागे पडला, असे विधान करणे हास्यास्पद आहे. सध्या राज ठाकरे यांना प्रसिद्धीची नितांत गरज आहे, त्यामुळेच त्यांनी असे विधान केले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला होता. त्यावरुन, मनसैनिक नाराज झाले असून आपला रोष व्यक्त करत आहेत.  

भाजप नेत्यांनी शहाणपणा शिकवू नये!इंधन दरवाढीवर केंद्राने कर कमी केल्यास दर नियंत्रणात येतील. केंद्र राज्याशी दुजाभाव करतं, अशावेळी भाजपच्या राज्यातील नेत्यांनी आम्हाला राज्याचे कर कमी करण्याचं शहाणपण शिकवू नये, असा टोला जयंत पाटील यांनी भाजपला लगावला. केंद्राने एक रूपया जरी कमी केला तर करात मोठा दिलासा मिळेल, असेही त्यांनी सुनावले होते.

‘फडणवीसांचे विधान गांभीर्याने घेत नाही’विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सध्याच्या राज्य सरकारमध्ये विनाशिडीचे फासे पलटवू, असे विधान केले होते. या संदर्भात जयंत पाटील यांना विचारले असता, फडणवीस यांना एक व्यक्ती म्हणून मी गांभीर्याने घेतो. मात्र, त्यांचे विधान गांभीर्याने घेत नाही, असा टोला लगावला होता. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलMNSमनसेPuneपुणेelectricityवीजRaj Thackerayराज ठाकरे