शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रभक्तीचा नवा अध्याय, सत्तेसाठी भाजप+एमआयएम अकोट पॅटर्न”; ठाकरे गटाच्या नेत्यांची टीका
2
कल्याणमध्ये २१ वर्षीय एअर होस्टेसचा प्रियकराकडून छळ; ६ वर्षांच्या प्रेमाचा असा झाला भीषण शेवट, आरोपी अजूनही मोकाट?
3
आईच्या पिंडदानाची तयारी सुरू होती, तेवढ्यात फोन खणखणला अन्...; असं काही घडलं की सगळेच झाले हैराण!
4
Wife सोबत मिळून पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये करा गुंतवणूक; महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
5
इराणच्या खामेनी विरोधात बंड पुकारणं पडणार महागात! 'या' २६ वर्षीय तरुणाला दिली जाणार फाशी?
6
टॅरिफविरोधात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला तर अमेरिका संपली...; डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी भीती
7
११ वर्षांनी अद्भूत योगात मकरसंक्रांती २०२६: संक्रमण पुण्य काल कधी? पाहा, महत्त्व-मान्यता
8
चांदीची ऐतिहासिक भरारी! २.६८ लाखांचा टप्पा पार; आता ३ लाखांचे लक्ष्य? खरेदीची संधी की नफावसुलीची वेळ?
9
अमेरिकेने व्हेनेझुएलावर अज्ञात शस्त्र वापरले, मादुरोंचा गार्ड म्हणाला, "नाक-तोंडातून रक्त येत होतं आणि..."
10
IMPS द्वारे पैसे पाठवणं महागणार; 'या' दिग्गज सरकारी बँकेनं कोट्यवधी ग्राहकांना दिला मोठा झटका
11
PNB मध्ये जमा करा ₹२,००,०००, मिळेल ₹८१,५६८ चं फिक्स व्याज; जाणून घ्या संपूर्ण स्कीम
12
इथे कंपन्यांना सर्व्हिस सेंटर उघडता येईनात...! मारुती पेट्रोल पंपावरच कार सर्व्हिस करून देणार...
13
तातडीने इराण सोडा, आर्मेनिया किंवा तुर्कीमार्गे बाहेर पडा! अमेरिकेचे आपल्या नागरिकांना आदेश
14
प्रसिद्ध हॉलिवूड स्टारने व्यक्त केली शाहरुख खानसोबत काम करण्याची इच्छा; म्हणाला, 'त्याने मला...'
15
मराठी मुलांना नोकरी देण्यास उद्योगपतीचे स्वागत केले; गैर काय? फडणवीस यांचा ठाकरेंवर हल्लाबोल
16
इराणसोबत व्यापार कराल तर २५% टॅरिफ द्यावा लागेल...! ट्रम्प यांची पुन्हा धमकी; या देशांवर होणार थेट परिणाम
17
२०२६ची पहिली षट्तिला एकादशी: अनंत कृपा लाभेल, काही कमी पडणार नाही; ‘असे’ करा व्रत पूजन!
18
Stock Market Holidays: गुरुवार १५ जानेवारीला शेअर बाजाराचं कामकाम राहणार बंद; काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या
19
६ दिवसांत ५ ग्रहांचे गोचर: ७ राशींची संक्रांत संपणार, लक्षणीय लाभ; पैशांचा ओघ, सुखाचा काळ!
20
आजचे राशीभविष्य, १३ जानेवारी २०२६: नोकरी, व्यवसायात लाभ, नशिबाची साथ; अनुकूल दिवस
Daily Top 2Weekly Top 5

'पाटील साहेब, तुम्ही टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करता, मनसेवाले टप्प्यात आणून करतात'

By महेश गलांडे | Updated: February 9, 2021 08:26 IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही वीज बिलाच्या मुद्द्यावरुन सरकारला लक्ष्य केले होते. मात्र, राज ठाकरेंचं वक्तव्य केवळ प्रसिद्धीसाठीच असल्याचं जयंत पाटील म्हणाले. त्यावरुन मनसे नेत्यांनी संताप व्यक्त केलाय.

ठळक मुद्देपाटील साहेब, तुम्ही टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम करता, पण मनसेवाले टप्प्यात आणून कार्यक्रम करतात. त्यामुळे, नको ती वक्तव्ये करण्यापेक्षा आपण सर्वसामान्यांच्या वीजबिलाचा प्रश्न मार्गी लावावा हीच विनंती,

मुंबई - मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सध्या प्रसिद्धीचीच गरज आहे, त्यामुळे ते राज्यातील वीजबिलाच्या प्रश्नावर बेछुट आरोप करतात, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला होता. त्यानंतर, मनसेतील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मनसेच्या पुणे शहराच्या महिलाध्यक्षा रुपाली पाटील ठोंबरे यांनी जयंत पाटलांना टोला लगावला आहे. राज ठाकरेंना प्रसिद्धीची गरज होती, म्हणूनच का खासदारकीच्या निवडणुकांवेळी त्यांनी एक सभा घ्यावी, म्हणून आपण प्रयत्न करत होतात, असे रुपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटले आहे. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही वीज बिलाच्या मुद्द्यावरुन सरकारला लक्ष्य केले होते. मात्र, राज ठाकरेंचं वक्तव्य केवळ प्रसिद्धीसाठीच असल्याचं जयंत पाटील म्हणाले. त्यावरुन मनसे नेत्यांनी संताप व्यक्त केलाय. ''जयंत पाटील आज मंत्री आहेत, ऊर्जा मंत्रीपदी आपल्या सरकारमधील मंत्री असताना, बीजबिलाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना लुबाडण्याचं काम होतं आहे. त्यामुळे, सरकार म्हणून तुम्हाला हा जाब विचारण्यात आला आहे. कोणाला प्रसिद्धीची गरज आहे, हे सर्व जनतेला माहिती आहे. पाटील साहेब, तुम्ही टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम करता, पण मनसेवाले टप्प्यात आणून कार्यक्रम करतात. त्यामुळे, नको ती वक्तव्ये करण्यापेक्षा आपण सर्वसामान्यांच्या वीजबिलाचा प्रश्न मार्गी लावावा हीच विनंती,'' असे मनसेच्या महिला नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी जयंत पाटलांना म्हटलंय.  

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे परिवार संवाद मेळाव्यासाठी रविवारी अकोल्यात आले होते. यावेळी सकाळी त्यांनी जलसंपदा विभागाचा आढावा घेतला व नंतर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, वीजबिलाच्या प्रश्नावर राज्य सरकार गंभीर आहे. मात्र, एवढया महत्त्वाच्या विषयावर राज ठाकरे यांनी शरद पवारांच्या घरी अदानी आले अन् वीजबिलाचा प्रश्न मागे पडला, असे विधान करणे हास्यास्पद आहे. सध्या राज ठाकरे यांना प्रसिद्धीची नितांत गरज आहे, त्यामुळेच त्यांनी असे विधान केले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला होता. त्यावरुन, मनसैनिक नाराज झाले असून आपला रोष व्यक्त करत आहेत.  

भाजप नेत्यांनी शहाणपणा शिकवू नये!इंधन दरवाढीवर केंद्राने कर कमी केल्यास दर नियंत्रणात येतील. केंद्र राज्याशी दुजाभाव करतं, अशावेळी भाजपच्या राज्यातील नेत्यांनी आम्हाला राज्याचे कर कमी करण्याचं शहाणपण शिकवू नये, असा टोला जयंत पाटील यांनी भाजपला लगावला. केंद्राने एक रूपया जरी कमी केला तर करात मोठा दिलासा मिळेल, असेही त्यांनी सुनावले होते.

‘फडणवीसांचे विधान गांभीर्याने घेत नाही’विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सध्याच्या राज्य सरकारमध्ये विनाशिडीचे फासे पलटवू, असे विधान केले होते. या संदर्भात जयंत पाटील यांना विचारले असता, फडणवीस यांना एक व्यक्ती म्हणून मी गांभीर्याने घेतो. मात्र, त्यांचे विधान गांभीर्याने घेत नाही, असा टोला लगावला होता. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलMNSमनसेPuneपुणेelectricityवीजRaj Thackerayराज ठाकरे