शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

'पाटील साहेब, तुम्ही टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करता, मनसेवाले टप्प्यात आणून करतात'

By महेश गलांडे | Updated: February 9, 2021 08:26 IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही वीज बिलाच्या मुद्द्यावरुन सरकारला लक्ष्य केले होते. मात्र, राज ठाकरेंचं वक्तव्य केवळ प्रसिद्धीसाठीच असल्याचं जयंत पाटील म्हणाले. त्यावरुन मनसे नेत्यांनी संताप व्यक्त केलाय.

ठळक मुद्देपाटील साहेब, तुम्ही टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम करता, पण मनसेवाले टप्प्यात आणून कार्यक्रम करतात. त्यामुळे, नको ती वक्तव्ये करण्यापेक्षा आपण सर्वसामान्यांच्या वीजबिलाचा प्रश्न मार्गी लावावा हीच विनंती,

मुंबई - मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सध्या प्रसिद्धीचीच गरज आहे, त्यामुळे ते राज्यातील वीजबिलाच्या प्रश्नावर बेछुट आरोप करतात, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला होता. त्यानंतर, मनसेतील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मनसेच्या पुणे शहराच्या महिलाध्यक्षा रुपाली पाटील ठोंबरे यांनी जयंत पाटलांना टोला लगावला आहे. राज ठाकरेंना प्रसिद्धीची गरज होती, म्हणूनच का खासदारकीच्या निवडणुकांवेळी त्यांनी एक सभा घ्यावी, म्हणून आपण प्रयत्न करत होतात, असे रुपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटले आहे. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही वीज बिलाच्या मुद्द्यावरुन सरकारला लक्ष्य केले होते. मात्र, राज ठाकरेंचं वक्तव्य केवळ प्रसिद्धीसाठीच असल्याचं जयंत पाटील म्हणाले. त्यावरुन मनसे नेत्यांनी संताप व्यक्त केलाय. ''जयंत पाटील आज मंत्री आहेत, ऊर्जा मंत्रीपदी आपल्या सरकारमधील मंत्री असताना, बीजबिलाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना लुबाडण्याचं काम होतं आहे. त्यामुळे, सरकार म्हणून तुम्हाला हा जाब विचारण्यात आला आहे. कोणाला प्रसिद्धीची गरज आहे, हे सर्व जनतेला माहिती आहे. पाटील साहेब, तुम्ही टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम करता, पण मनसेवाले टप्प्यात आणून कार्यक्रम करतात. त्यामुळे, नको ती वक्तव्ये करण्यापेक्षा आपण सर्वसामान्यांच्या वीजबिलाचा प्रश्न मार्गी लावावा हीच विनंती,'' असे मनसेच्या महिला नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी जयंत पाटलांना म्हटलंय.  

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे परिवार संवाद मेळाव्यासाठी रविवारी अकोल्यात आले होते. यावेळी सकाळी त्यांनी जलसंपदा विभागाचा आढावा घेतला व नंतर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, वीजबिलाच्या प्रश्नावर राज्य सरकार गंभीर आहे. मात्र, एवढया महत्त्वाच्या विषयावर राज ठाकरे यांनी शरद पवारांच्या घरी अदानी आले अन् वीजबिलाचा प्रश्न मागे पडला, असे विधान करणे हास्यास्पद आहे. सध्या राज ठाकरे यांना प्रसिद्धीची नितांत गरज आहे, त्यामुळेच त्यांनी असे विधान केले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला होता. त्यावरुन, मनसैनिक नाराज झाले असून आपला रोष व्यक्त करत आहेत.  

भाजप नेत्यांनी शहाणपणा शिकवू नये!इंधन दरवाढीवर केंद्राने कर कमी केल्यास दर नियंत्रणात येतील. केंद्र राज्याशी दुजाभाव करतं, अशावेळी भाजपच्या राज्यातील नेत्यांनी आम्हाला राज्याचे कर कमी करण्याचं शहाणपण शिकवू नये, असा टोला जयंत पाटील यांनी भाजपला लगावला. केंद्राने एक रूपया जरी कमी केला तर करात मोठा दिलासा मिळेल, असेही त्यांनी सुनावले होते.

‘फडणवीसांचे विधान गांभीर्याने घेत नाही’विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सध्याच्या राज्य सरकारमध्ये विनाशिडीचे फासे पलटवू, असे विधान केले होते. या संदर्भात जयंत पाटील यांना विचारले असता, फडणवीस यांना एक व्यक्ती म्हणून मी गांभीर्याने घेतो. मात्र, त्यांचे विधान गांभीर्याने घेत नाही, असा टोला लगावला होता. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलMNSमनसेPuneपुणेelectricityवीजRaj Thackerayराज ठाकरे