शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

पुणे जिल्ह्यातील अतिशोषित गावात ‘जलधरा निर्धारण’; लोकसहभागातून करणार व्यवस्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 15:13 IST

जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यामधून जिल्ह्यातील अतिशोषित गावांमधील भूजल पातळी वाढविण्यासाठी जलस्वराज्य प्रकल्प राबविण्यात येत असून भूजल पुनर्भरणाची कामे वाढविण्यासोबतच उपलब्ध पाण्याचे लोकसभागातून व्यवस्थापन करण्यात येणार आहे. 

ठळक मुद्देजागतिक बँकेच्या अर्थ सहाय्यामधून जानेवारी २०१५ पासून जलस्वराज्य-२ प्रकल्पाला सुरुवात२० ते २५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून लवकरच काढली जाणार कामाची निविदा

पुणे : जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यामधून जिल्ह्यातील अतिशोषित गावांमधील भूजल पातळी वाढविण्यासाठी जलस्वराज्य प्रकल्प राबविण्यात येत असून पुरंदर, शिरुर, खेड आणि आंबेगाव तालुक्यांमधील २२ गावांमध्ये ४ जलधरांचे निर्धारण (अ‍ॅक्विफर मॅपिंग) करण्यात आले आहे. भूजल पुनर्भरणाची कामे वाढविण्यासोबतच उपलब्ध पाण्याचे लोकसभागातून व्यवस्थापन करण्यात येणार आहे. जागतिक बँकेच्या अर्थ सहाय्यामधून जानेवारी २०१५ पासून जलस्वराज्य-२ प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली आहे. भूजलाचे अतिशोषण झालेल्या पुरंदर तालुक्यातील ९, शिरूरमधील ७, खेडमधील ५ आणि आंबेगाव तालुक्यातील १ अशा २२ गावांमध्ये जलधर निर्धारण आणि लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात येत आहे. या गावांमध्ये भूजल व्यवस्थापन समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. लोकसहभागातून आराखडा तयार करणे, पाण्याचे आॅडिट, कृत्रिम भूजल पुनर्भरणाच्या अल्प व दीर्घ मुदतीच्या उपाययोजना राबविणे, पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे बळकटीकरण, लोकसहभागातून भूजल वापर, त्यानुसार पीक पद्धती, सुक्ष्म जलसिंचनावर भर देऊन, उपलब्ध पाण्याचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे.या प्रकल्पाचा आराखडा तयार असून, भूजल पुनर्भरणासाठी रिचार्ज शाप्ट घेणे, चर खोदणे, डोंगरालगत गोलाकार चर खोदणे आदी कामांच्या निविदा प्रक्रिया अंतिम टप्यात असल्याचे वरिष्ठ भू वैज्ञानिक प्रमोद रेड्डी यांनी सांगितले. या प्रकल्पाद्वारे २२ गावातील लोकांना पिण्याचे पाणी कायमस्वरुपी उपलब्ध करुन देणे शक्य होणार आहे. त्यासाठी २० ते २५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून लवकरच कामाची निविदा काढली जाणार आहे. 

टॅग्स :Waterपाणीpurandarपुरंदरambegaonआंबेगाव