शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
4
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
5
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
6
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
7
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
8
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
9
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
10
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
11
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
12
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
13
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
14
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
15
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
16
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
17
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
18
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
19
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
20
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट

सात वर्षाच्या जय नहारचा डेंगीने मृत्यू; आळंदीतील अस्वच्छतेमुळे डासांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 13:44 IST

मरकळ (ता. खेड) येथे सात वर्षाच्या जय अमित नहार या चिमुरड्याचा डेंगीने मृत्यू झाला. व्यापारी लालचंद नहार यांचा जय हा नातू होता.

ठळक मुद्देआळंदी आणि परिसरात गेली दोन महिन्यांपासून डेंगीचा वाढला प्रादुर्भावआळंदी आणि परिसरात वाढत्या अस्वच्छतेमुळे डासांच्या संख्येत वाढ

शेलपिंपळगाव : मरकळ (ता. खेड) येथे अवघ्या सात वर्षाच्या जय अमित नहार या चिमुरड्याचा डेंगीने मृत्यू झाला.आळंदी आणि परिसरात गेली दोन महिन्यांपासून डेंगीचा प्रादुर्भाव वाढला आहे. शहरात अनेक जण डेंगी आणि डेंगीसदृष आजाराने त्रस्त आहेत. मरकळ येथील प्रसिद्ध व्यापारी लालचंद नहार यांचा जय हा नातू होता. ताप आला म्हणून त्याला भोसरी येथील लहान मुलांच्या खासगी रूग्णालयात उपचारासाठी भरती केले होते. त्यावेळी प्लेटलेट्सची संख्या ६६ हजार होती. तेथील उपचाराने जयच्या तब्येतीत सुधारणा न झाल्याने नातेवाईकांनी वाकड येथील दुसर्‍या खासगी रूग्णालयात दाखल केले. त्यावेळी प्लेटलेट्सची संख्या अवघी बत्तीस हजार झाली होती. मात्र त्यानंतर रक्तदाब कमी झाल्याने जयची प्रकृती अधिक खालावून त्याचा मृत्यू झाला. दरम्यान आळंदी आणि परिसरात वाढत्या अस्वच्छतेमुळे डासांच्या संख्येत वाढ झाली आहे. डेंगी, मलेरिया सारख्या तापाच्या आजाराने रूग्णांची संख्या बळावली होती. आळंदीत तर डेंगी आणि डेंगीसदृश तापाच्या रूग्णांची संख्या गेली दोन महिन्यात लक्षणीय वाढ झाली आहे. शहरातील खासगी दवाखाने आणि रूग्णालयातही उपचारासाठी येणार्‍या रूग्णांची संख्या वाढली आहे.

टॅग्स :Deathमृत्यूHealthआरोग्य