शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

IT च्या तरुणानं 30 एकर खडकाळ जमिनीचं केलं नंदनवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 13:37 IST

शेतीत काम करायला मजुर मिळत नाहीत, रासायनिक खते, औषधांचा होणारा अव्वाच्यासव्वा खर्च, प्रचंड कष्ट व हजारो रुपये खर्च करून बाजारात दर मिळण्याची खात्री नाही. यामुळे आजचा शेतकरी रासायनिक शेतीला कंटाळला आहे.

सुषमा नेहरकर-शिंदे/पुणे - शेतीत काम करायला मजुर मिळत नाहीत, रासायनिक खते, औषधांचा होणारा अव्वाच्यासव्वा खर्च, प्रचंड कष्ट व हजारो रुपये खर्च करून बाजारात दर मिळण्याची खात्री नाही. यामुळे आजचा शेतकरी रासायनिक शेतीला कंटाळला आहे. ग्राहकदेखील पैसे मोजून विषयुक्तच भाजी-पाला विकत घेतो. याला एकच पर्याय म्हणून शून्य खर्चाची विषमुक्त नैसर्गिक शेती करण्याकडे शेतक-यांचा कल वाढत आहे. दौंड तालुक्यातील बोरीऐंदी येथील खडकाळ माळरानावर आयटी क्षेत्रात काम करणा-या एका तरुणाने तब्बल 30 एकरमध्ये या प्रकारची शेती सुरू केली आहे.

माधव घुले हा तरुण सॉफ्टवेअर इंजिनिअर असून गेल्या दोन वर्षांपासून झिरो बजेट शेती करत आहे. दौंड तालुक्यातील 30 एकर खडकाळ माळरानावर गवत उगवणे कठीण असताना आज कृषीतज्ज्ञ सुभाष पाळेकर यांच्या तंत्रज्ञानानुसार नैसर्गिक शेती पद्धतीनं येथे बाजरी, ऊस, शेवगा, तुर, मका, भुईमुग, केळी, गहू आदी सर्वच प्रकारची पिके जोमात उभी आहेत. गाईचे शेण व गोमूत्र या माध्यमातून पिकांवर येणा-या रोगराईवर पूर्णपणे नियंत्रण केले. एकाच पिकामध्ये वेगवेगळी पिके घेऊन आंतर पिकांचा प्रयोगदेखील यशस्वी केला. यामुळे पद्धतीनं नैसर्गिक शेती केल्याने एका आठवड्यात शंभर-शंभर किलो शेवगा, अर्धा एकरमध्ये 8 पोती बाजरी, गहू, ऊसचे पिक देखील शून्य खर्चात भरघोस उत्पन्न मिळाले असल्याचे घुले यांनी सांगितले.

घुले यांनी सांगितले की,  मेडिकल क्षेत्राशी संबंधित एक सॉफ्टवेअरचे काम करताना सध्याच्या रासायनिक शेतीमुळे माणसांच्या शरीरावर होणारे प्रचंड दुष्परिणामाची जाणीव झाली. यामुळेच मी विषमुक्त व नैसर्गिक शेतीकडे वळलो. आज आम्ही घरात लागणारे सर्व कडधान्य, भाजी-पाला आमच्या शेतातील पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीनं उत्पादन केलेले खातो. माझ्यासह अन्य काही शेतकरी मित्रदेखील याच पद्धतीनं शेती करतात. घरात वापरून क्षिल्लक राहिलेला शेतीमाल पुण्यात विविध सोसायटींमध्ये विक्रीसाठी 'व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप'च्या माध्यमातून विक्रीसाठी पाठवतो. परंतु सध्या स्वत: ला, मुलांना व कुटुंबातील व्यक्ती व काही ग्राहकांना तरी किमान विषमुक्त कडधान्य व भाजीपाल आपण देऊ शकतो यांचे समानध असल्याचे घुले सांगतात.

तथाकथित आधुनिक शेतीचे गंभीर दुष्परिणाम आज आपल्याला भेडसावत आहेत. शेती करण्याचा खर्च दिवसागणिक वाढत आहे. त्या प्रमाणात उत्पादन घटत चालले आहे. याला एकच पर्याय म्हणजे सुभाष पाळेकर यांची शून्य खचार्ची नैसर्गिक शेती हा आहे. या शेती तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन स्वत: पाळेकर देशात तसेच परदेशात शिबिरांच्या माध्यमातून करत आहेत. शेतक-यांपर्यंत शून्य खर्चाची नैसर्गिक शेती पोचवून प्रत्येकाला विषमुक्त अन्न मिळेल. तसेच कॅन्सरमुक्त व व्याधीमुक्त गावे करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करत आहेत. याचाच एक भाग म्हणून आम्ही हा झीरो बजेट व विषमुक्त शेतीचा प्रयोग सुरू केला आहे. जिल्ह्यातील अन्य शेतक-यांनीदेखील प्रत्यक्ष येऊन हा प्रयोग पहावा व त्याचा अवलंब करावा, असे माधव  घुले म्हणालेत.