शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आयटीमध्ये काम करणारे ऐटीत नाहीत तर तणावात आहेत ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 16:49 IST

२०१७ साली करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार सुमारे ६६ टक्के आयटीतकाम करणारे कर्मचारी नैराश्याने आणि चिंतांनी ग्रासले आहेत. याचे प्रमाण २०१६पेक्षा  तब्बल १५ टक्क्यांनी वाढले आहे. या विचार करायला लावणाऱ्या आकडेवारी मागची कारणे आणि उपाय सांगणारी ही मालिका 

ठळक मुद्देवरवर सुखी दिसणाऱ्या आय टी क्षेत्रातील कर्मचारी तणावात !सुमारे ६७ टक्के कर्मचाऱ्यांना नैराश्य, दरवर्षी १५ टक्क्यांनी वाढ 

पुणे :  आय टी कंपनीत काम करून काही लाखात कमावणारे तरुण सुखी आणि समाधानी असतात असा तुमचा समज असेल तर ते चुकीचे आहे. आज आयटीतले कर्मचारी ऐटीत नाहीत तर तणावात असल्याचे समोर आले आहे. २०१७ साली करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार सुमारे ६६ टक्के आयटीतकाम करणारे कर्मचारी नैराश्याने आणि चिंतांनी ग्रासले आहेत. याचे प्रमाण २०१६पेक्षा  तब्बल १५ टक्क्यांनी वाढले आहे.आय टीमध्ये काम करणं म्हणजे चकचकीत ऑफिस, ए. सी. मध्ये बसून काम, लाखात पगार, शरीराला कष्ट नाहीत अशी संकल्पना अनेकांच्या मनात आहे. त्यामुळे या क्षेत्राबद्दल आजही तरुणांना आकर्षण आहे. पुण्यासारख्या शहरात तर अनेकजण फक्त याच क्षेत्रात काम करण्यासाठी येतात. पण इथे काम करणं आणि मुख्य म्हणजे टिकून राहणं दिवसेंदिवस अवघड बनत चाललं आहे. डॉ वंदना घोडके यांनी सध्या जवळपास दररोज निराश असलेले आय टीमध्ये काम करणारे तरुण येत असून हे अतिशय धक्कादायक असल्याचे नमूद केले. त्यातील अनेकांची शारीरिक स्थिती तर चिंताजनक आहेच पण मानसिक स्थिती अधिक भयंकर असल्याचे त्यांनी सांगितले. नैराश्यभावना आणि आत्मविश्वासाची कमतरता यांनी त्यांना ग्रासले असून हे अनेकांना समुदेशकाकडून तर काहींना मानसोपचार तज्ज्ञाकडून उपचार घेण्याची वेळ आल्याचे त्या म्हणाल्या. 

 

ही आहे सद्यस्थिती 

१ )या क्षेत्रात कॉस्ट कटिंग (कर्मचारी कमी करणे)याचे प्रमाण वाढत असल्यामुळे दररोज माझी नोकरी सुरक्षित नाही या भीतीखाली अनेकांना निद्रानाश आणि नैराश्याने पछाडले आहे.

२)घर किंवा गाडी अशा कारणांसाठी घेतलेले कर्ज, उच्च्भ्रू राहणी यामुळे अनेकांना दुसरीकडे नोकरी करण्याची कल्पनाही सहन होत नाहीये.

३) दुसरीकडे आठवड्यातले पाच दिवस कुटुंबासोबत संवाद नसल्याने एक प्रकारची दरी निर्माण होत आहे.त्यामुळे आपण एकटेच आहोत, सोबत कोणीही नाही अशा मनस्थितीचे प्रमाण वाढत आहे. 

४)नवराबायको दोघेही एकाच क्षेत्रात असतील तर त्यांचेही वैवाहिक जीवन अडचणीत येत असून घटस्फोटांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. केवळ संवादाच्या अभावामुळे वैवाहिक नाते  संपुष्टात येण्याच्या संख्येत वाढ. 

५)ऑफिसमधला ताण वाढत असून त्यातून रिलीफ मिळावा म्हणून अनेकजण सिगारेट, दारूसारख्या व्यसनांना जवळ करत आहेत.

 

उपाय :

१)स्वतःला वेळ न देण्याची गरज असून आठवड्यातून काही तास एखादा छंद जोपासा. त्यातून मानसिक शांती मिळते. 

२)कुटुंबात संवाद अतिशय महत्वाचा असून घरातील आई वडिलांपासून ते लहान मुलापर्यंत प्रत्येकाशी आवर्जून बोला. यातून अनेक प्रश्न सुटतील. 

३)तुमच्या जोडीदाराला दिवसभरात होणाऱ्या घटना, येणाऱ्या अडचणी, घुसमट सारे काही सांगा आणि त्याचे किंवा तिचेही अनुभव ऐका. यातून मित्रत्वाचे नाते निर्माण होईल. 

४)पबला जाणे किंवा हॉटेलमध्ये जेवायला जाणे या पलीकडे वीक एन्डचा प्लॅन करत कुटुंबासोबत सहलीला जाणे, मुलांना घेऊन सिनेमाला जाणे किंवा एकत्र दिवस घालवणे अशा दिसायला छोट्या पण आनंद देणाऱ्या गोष्टी करा. 

५)दररोज योगासन आणि त्यातही ध्यान-धारणा कराच. त्यामुळे मनःशांती मिळते. 

 

 

 

 

 

 

 

 

टॅग्स :PuneपुणेITमाहिती तंत्रज्ञानjobनोकरी