शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
2
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
3
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
4
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
5
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
6
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
7
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
8
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
9
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
10
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
11
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
12
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
13
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
15
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
17
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
18
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
19
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
20
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार

आयटीमध्ये काम करणारे ऐटीत नाहीत तर तणावात आहेत ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 16:49 IST

२०१७ साली करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार सुमारे ६६ टक्के आयटीतकाम करणारे कर्मचारी नैराश्याने आणि चिंतांनी ग्रासले आहेत. याचे प्रमाण २०१६पेक्षा  तब्बल १५ टक्क्यांनी वाढले आहे. या विचार करायला लावणाऱ्या आकडेवारी मागची कारणे आणि उपाय सांगणारी ही मालिका 

ठळक मुद्देवरवर सुखी दिसणाऱ्या आय टी क्षेत्रातील कर्मचारी तणावात !सुमारे ६७ टक्के कर्मचाऱ्यांना नैराश्य, दरवर्षी १५ टक्क्यांनी वाढ 

पुणे :  आय टी कंपनीत काम करून काही लाखात कमावणारे तरुण सुखी आणि समाधानी असतात असा तुमचा समज असेल तर ते चुकीचे आहे. आज आयटीतले कर्मचारी ऐटीत नाहीत तर तणावात असल्याचे समोर आले आहे. २०१७ साली करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार सुमारे ६६ टक्के आयटीतकाम करणारे कर्मचारी नैराश्याने आणि चिंतांनी ग्रासले आहेत. याचे प्रमाण २०१६पेक्षा  तब्बल १५ टक्क्यांनी वाढले आहे.आय टीमध्ये काम करणं म्हणजे चकचकीत ऑफिस, ए. सी. मध्ये बसून काम, लाखात पगार, शरीराला कष्ट नाहीत अशी संकल्पना अनेकांच्या मनात आहे. त्यामुळे या क्षेत्राबद्दल आजही तरुणांना आकर्षण आहे. पुण्यासारख्या शहरात तर अनेकजण फक्त याच क्षेत्रात काम करण्यासाठी येतात. पण इथे काम करणं आणि मुख्य म्हणजे टिकून राहणं दिवसेंदिवस अवघड बनत चाललं आहे. डॉ वंदना घोडके यांनी सध्या जवळपास दररोज निराश असलेले आय टीमध्ये काम करणारे तरुण येत असून हे अतिशय धक्कादायक असल्याचे नमूद केले. त्यातील अनेकांची शारीरिक स्थिती तर चिंताजनक आहेच पण मानसिक स्थिती अधिक भयंकर असल्याचे त्यांनी सांगितले. नैराश्यभावना आणि आत्मविश्वासाची कमतरता यांनी त्यांना ग्रासले असून हे अनेकांना समुदेशकाकडून तर काहींना मानसोपचार तज्ज्ञाकडून उपचार घेण्याची वेळ आल्याचे त्या म्हणाल्या. 

 

ही आहे सद्यस्थिती 

१ )या क्षेत्रात कॉस्ट कटिंग (कर्मचारी कमी करणे)याचे प्रमाण वाढत असल्यामुळे दररोज माझी नोकरी सुरक्षित नाही या भीतीखाली अनेकांना निद्रानाश आणि नैराश्याने पछाडले आहे.

२)घर किंवा गाडी अशा कारणांसाठी घेतलेले कर्ज, उच्च्भ्रू राहणी यामुळे अनेकांना दुसरीकडे नोकरी करण्याची कल्पनाही सहन होत नाहीये.

३) दुसरीकडे आठवड्यातले पाच दिवस कुटुंबासोबत संवाद नसल्याने एक प्रकारची दरी निर्माण होत आहे.त्यामुळे आपण एकटेच आहोत, सोबत कोणीही नाही अशा मनस्थितीचे प्रमाण वाढत आहे. 

४)नवराबायको दोघेही एकाच क्षेत्रात असतील तर त्यांचेही वैवाहिक जीवन अडचणीत येत असून घटस्फोटांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. केवळ संवादाच्या अभावामुळे वैवाहिक नाते  संपुष्टात येण्याच्या संख्येत वाढ. 

५)ऑफिसमधला ताण वाढत असून त्यातून रिलीफ मिळावा म्हणून अनेकजण सिगारेट, दारूसारख्या व्यसनांना जवळ करत आहेत.

 

उपाय :

१)स्वतःला वेळ न देण्याची गरज असून आठवड्यातून काही तास एखादा छंद जोपासा. त्यातून मानसिक शांती मिळते. 

२)कुटुंबात संवाद अतिशय महत्वाचा असून घरातील आई वडिलांपासून ते लहान मुलापर्यंत प्रत्येकाशी आवर्जून बोला. यातून अनेक प्रश्न सुटतील. 

३)तुमच्या जोडीदाराला दिवसभरात होणाऱ्या घटना, येणाऱ्या अडचणी, घुसमट सारे काही सांगा आणि त्याचे किंवा तिचेही अनुभव ऐका. यातून मित्रत्वाचे नाते निर्माण होईल. 

४)पबला जाणे किंवा हॉटेलमध्ये जेवायला जाणे या पलीकडे वीक एन्डचा प्लॅन करत कुटुंबासोबत सहलीला जाणे, मुलांना घेऊन सिनेमाला जाणे किंवा एकत्र दिवस घालवणे अशा दिसायला छोट्या पण आनंद देणाऱ्या गोष्टी करा. 

५)दररोज योगासन आणि त्यातही ध्यान-धारणा कराच. त्यामुळे मनःशांती मिळते. 

 

 

 

 

 

 

 

 

टॅग्स :PuneपुणेITमाहिती तंत्रज्ञानjobनोकरी