शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
2
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
16
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
17
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
18
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
19
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
20
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख

आयटीमध्ये काम करणारे ऐटीत नाहीत तर तणावात आहेत ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 16:49 IST

२०१७ साली करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार सुमारे ६६ टक्के आयटीतकाम करणारे कर्मचारी नैराश्याने आणि चिंतांनी ग्रासले आहेत. याचे प्रमाण २०१६पेक्षा  तब्बल १५ टक्क्यांनी वाढले आहे. या विचार करायला लावणाऱ्या आकडेवारी मागची कारणे आणि उपाय सांगणारी ही मालिका 

ठळक मुद्देवरवर सुखी दिसणाऱ्या आय टी क्षेत्रातील कर्मचारी तणावात !सुमारे ६७ टक्के कर्मचाऱ्यांना नैराश्य, दरवर्षी १५ टक्क्यांनी वाढ 

पुणे :  आय टी कंपनीत काम करून काही लाखात कमावणारे तरुण सुखी आणि समाधानी असतात असा तुमचा समज असेल तर ते चुकीचे आहे. आज आयटीतले कर्मचारी ऐटीत नाहीत तर तणावात असल्याचे समोर आले आहे. २०१७ साली करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार सुमारे ६६ टक्के आयटीतकाम करणारे कर्मचारी नैराश्याने आणि चिंतांनी ग्रासले आहेत. याचे प्रमाण २०१६पेक्षा  तब्बल १५ टक्क्यांनी वाढले आहे.आय टीमध्ये काम करणं म्हणजे चकचकीत ऑफिस, ए. सी. मध्ये बसून काम, लाखात पगार, शरीराला कष्ट नाहीत अशी संकल्पना अनेकांच्या मनात आहे. त्यामुळे या क्षेत्राबद्दल आजही तरुणांना आकर्षण आहे. पुण्यासारख्या शहरात तर अनेकजण फक्त याच क्षेत्रात काम करण्यासाठी येतात. पण इथे काम करणं आणि मुख्य म्हणजे टिकून राहणं दिवसेंदिवस अवघड बनत चाललं आहे. डॉ वंदना घोडके यांनी सध्या जवळपास दररोज निराश असलेले आय टीमध्ये काम करणारे तरुण येत असून हे अतिशय धक्कादायक असल्याचे नमूद केले. त्यातील अनेकांची शारीरिक स्थिती तर चिंताजनक आहेच पण मानसिक स्थिती अधिक भयंकर असल्याचे त्यांनी सांगितले. नैराश्यभावना आणि आत्मविश्वासाची कमतरता यांनी त्यांना ग्रासले असून हे अनेकांना समुदेशकाकडून तर काहींना मानसोपचार तज्ज्ञाकडून उपचार घेण्याची वेळ आल्याचे त्या म्हणाल्या. 

 

ही आहे सद्यस्थिती 

१ )या क्षेत्रात कॉस्ट कटिंग (कर्मचारी कमी करणे)याचे प्रमाण वाढत असल्यामुळे दररोज माझी नोकरी सुरक्षित नाही या भीतीखाली अनेकांना निद्रानाश आणि नैराश्याने पछाडले आहे.

२)घर किंवा गाडी अशा कारणांसाठी घेतलेले कर्ज, उच्च्भ्रू राहणी यामुळे अनेकांना दुसरीकडे नोकरी करण्याची कल्पनाही सहन होत नाहीये.

३) दुसरीकडे आठवड्यातले पाच दिवस कुटुंबासोबत संवाद नसल्याने एक प्रकारची दरी निर्माण होत आहे.त्यामुळे आपण एकटेच आहोत, सोबत कोणीही नाही अशा मनस्थितीचे प्रमाण वाढत आहे. 

४)नवराबायको दोघेही एकाच क्षेत्रात असतील तर त्यांचेही वैवाहिक जीवन अडचणीत येत असून घटस्फोटांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. केवळ संवादाच्या अभावामुळे वैवाहिक नाते  संपुष्टात येण्याच्या संख्येत वाढ. 

५)ऑफिसमधला ताण वाढत असून त्यातून रिलीफ मिळावा म्हणून अनेकजण सिगारेट, दारूसारख्या व्यसनांना जवळ करत आहेत.

 

उपाय :

१)स्वतःला वेळ न देण्याची गरज असून आठवड्यातून काही तास एखादा छंद जोपासा. त्यातून मानसिक शांती मिळते. 

२)कुटुंबात संवाद अतिशय महत्वाचा असून घरातील आई वडिलांपासून ते लहान मुलापर्यंत प्रत्येकाशी आवर्जून बोला. यातून अनेक प्रश्न सुटतील. 

३)तुमच्या जोडीदाराला दिवसभरात होणाऱ्या घटना, येणाऱ्या अडचणी, घुसमट सारे काही सांगा आणि त्याचे किंवा तिचेही अनुभव ऐका. यातून मित्रत्वाचे नाते निर्माण होईल. 

४)पबला जाणे किंवा हॉटेलमध्ये जेवायला जाणे या पलीकडे वीक एन्डचा प्लॅन करत कुटुंबासोबत सहलीला जाणे, मुलांना घेऊन सिनेमाला जाणे किंवा एकत्र दिवस घालवणे अशा दिसायला छोट्या पण आनंद देणाऱ्या गोष्टी करा. 

५)दररोज योगासन आणि त्यातही ध्यान-धारणा कराच. त्यामुळे मनःशांती मिळते. 

 

 

 

 

 

 

 

 

टॅग्स :PuneपुणेITमाहिती तंत्रज्ञानjobनोकरी